शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
3
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
4
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
5
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
6
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
7
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
8
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
9
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
10
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
11
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
12
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
13
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
14
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
15
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
16
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
17
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
18
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
19
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
20
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान

Lok Sabha Election 2019 लोकसभेच्या प्रचारात नगरसेवकांची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 11:26 PM

शीतल पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. प्रचारासाठी तीनच दिवस उरले ...

शीतल पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. प्रचारासाठी तीनच दिवस उरले असताना, महापालिकेच्या नगरसेवकांनी जोर लावण्यास सुरूवात केली आहे. ‘स्वाभिमानी’साठी काँग्रेस व राष्ट्रवादीचे नगरसेवक सक्रिय झाले आहेत, तर भाजपच्या नगरसेवकांनीही प्रभागात बैठका, पदयात्रांवर भर दिला आहे. मात्र उन्हाच्या तडाख्यामुळे प्रचारात जोर कमी आहे.महापालिकेत भाजपचे ४१ व दोन सहयोगी असे ४३ नगरसेवक आहेत, तर काँग्रेसचे २० व राष्ट्रवादीचे १५ नगरसेवक आहेत. आठ महिन्यांपूर्वीच महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी केली, तर भाजप स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरा गेला होता. महापालिका क्षेत्रात काँग्रेस आघाडीला ३६ टक्के, तर भाजपला ३५ टक्के मते मिळाली होती. शिवसेनेला दीड टक्का मते मिळाली. यावेळी लोकसभेची जागा स्वाभिमानी पक्षाकडे असली तरी, उमेदवार मात्र काँग्रेसच्या घरातील आहे. त्यामुळे प्रचाराच्या सुरूवातीपासूनच काँग्रेसचे नगरसेवक सक्रिय झाले होते. त्यात महापालिकेत मदनभाऊ पाटील यांना मानणाऱ्या नगरसेवकांची संख्या अधिक आहे. मदनभाऊ-विशाल पाटील गटातील मतभेद विसरून सारेच कामाला लागले.प्रचाराच्या दुसºया आठवड्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाग घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवकही स्वाभिमानीच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. सध्या काँग्रेस व राष्ट्रवादीचे नगरसेवक एकत्र येऊन शहरात प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, मदनभाऊ पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरात प्रचार सुरू आहे. पदयात्रा, मेळावे, बैठका घेऊन पाटील यांनी प्रचारात रंगत आणली आहे.दुसरीकडे भाजपमध्ये काहीकाळ शांतता होती. काही मोजकेच नगरसेवक प्रचारात दिसत होते. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नगरसेवकांची बैठक घेतली. त्यानंतर मात्र भाजपचे नगरसेवकही प्रचारात उतरले आहेत. आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली प्रभागात बैठका, पदयात्रांवर भर दिला जात आहे.काहीजण तळ्यात-मळ्यातदोन्ही बाजूंचे काही नगरसेवक अद्यापही तळ्यात-मळ्यात आहेत. वंचित आघाडीने उमेदवार दिल्याने या नगरसेवकांनी प्रचारापासून दूर राहणेच पसंत केले आहे. त्यात रसद मिळाली नसल्यानेही काहीजण लांब आहेत. नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत खर्च अधिक झाला आहे. त्यात निवडणुका म्हटल्या की मतदारांच्या अपेक्षा असतात. वरून रसद न आल्याने त्यांच्या अपेक्षा कशा पूर्ण करायच्या? असा सवाल करीत काहीजणांनी रसद आल्यानंतर बघू, अशी भूमिका घेतली आहे.महाआघाडी, महायुतीचा अपक्षांशी संपर्कमहापालिका निवडणुकीत सर्वच पक्षांत बंडखोरीला उधाण आले होते. त्यात काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडी झाल्याने या पक्षात मोठी बंडखोरी झाली होती. अपक्ष उमेदवारांना एकूण मतदानाच्या १६ टक्के मते मिळाली होती. त्यामुळे काँग्रेस व भाजपने प्रभागात दोन हजारपेक्षा जादा मते मिळालेल्या अपक्षांशी संपर्क साधला आहे. महापालिका निवडणुकीतील त्यांची नाराजी दूर करून त्यांनाही प्रचारात सक्रिय केले जात आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक