शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

CoronaVirus Lockdown : लॉकडाऊनमध्ये बदल ;पुढील पंधरवडा जिल्ह्यासाठी आव्हानात्मक : अभिजित चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 12:32 PM

जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती सध्या नियंत्रणात असली तरी, पुढील पंधरवडा जिल्ह्यासाठी आव्हानात्मक ठरणार असल्याने, प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले.

ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये बदल ;पुढील पंधरवडा जिल्ह्यासाठी आव्हानात्मक : अभिजित चौधरी बाहेरून येणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढल्याने अधिक काळजी

सांगली : परजिल्ह्यांतून व परराज्यांतून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढत आहे. बाहेरून येणाऱ्यांचे जिल्ह्यात स्वागतच असले तरी, त्यांनी रितसर आपली तपासणी करून घेऊन यावे. तसेच क्वारंटाईनचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. तरीही अनेकजण त्याचे पालन करत नाहीत.

जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती सध्या नियंत्रणात असली तरी, पुढील पंधरवडा जिल्ह्यासाठी आव्हानात्मक ठरणार असल्याने, प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले.कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पाश्­र्वभूमीवर प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, बाहेरून जिल्ह्यात येणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असली तरी, यंत्रणा पूर्णपणे सक्षम आहे.

जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येकाने आपली तपासणी करून घेणे आवश्यक आहे. शिवाय होम क्वारंटाईनचे पालन करावे. क्वारंटाईनचे जे पालन करणार नाहीत, त्यांना थेट इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील पंधरा दिवस अधिक आव्हानात्मक असल्याने, गरज असेल तरच बाहेर पडा. तसेच मास्कचा वापर, वारंवार हात धुण्यासह नियमांचे पालन करावे.राज्य शासनाच्या निर्देशानुसार उद्या, शुक्रवारपासून लॉकडाऊनमध्येही काही बदल होत आहेत. यापूर्वी रेड,आॅरेंज, ग्रीन असे तीन झोन होते, आता दोनच झोन असणार आहेत. त्यात सांगलीचा नॉनरेड झोनमध्ये समावेश आहे. सध्या बंद असलेली दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. शिवाय जिल्हांतर्गत बससेवाही सुरू करण्यात येणार आहे. बससेवा सुरू करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन बंधनकारक असणार आहे.तसेच खुल्या मैदानावर गर्दी न करता व्यायाम करण्यास परवानगी असणार आहे. विवाहास ५० लोकांच्या उपस्थितीत, तर अंत्यविधीलाही ५० लोकांच्या उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे.पान दुकाने सुरू, पण पार्सल सेवाचजिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, शुक्रवारपासून जिल्ह्यातील पान दुकाने सुरू करण्यासही परवानगी असेल. मात्र, केवळ पार्सल सेवाच पुरविण्याची असून, ग्राहक जर तिथेच पान खाऊन थुंकल्याचे निदर्शनास आले, तर दुकान बंद करण्याची कारवाई करण्याबरोबरच त्या व्यक्तीलाही ५०० रूपयांचा दंड करण्यात येणार आहे. त्यामुळे पान दुकानदारांनी केवळ पार्सल सेवा पुरवावी.परस्पर निर्णय नकोतअनेक गावात परस्पर गावातील रस्ते बंद करण्यासह लॉकडाऊन पाळण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येत आहेत. हे पूर्णपणे चुकीचे असून यामुळे अडवणूक होत आहे. असे परस्पर निर्णय घेणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीSangliसांगली