शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

मानवतेचा मळा फुलविण्यात साहित्याचे योगदान : महावीर जोंधळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 00:10 IST

समाजातील एकरूपता नष्ट होत प्रत्येक समाज स्वाभिमानी होत आहे. प्रत्येकाला राष्टशी देणे-घेणे नसून केवळ समाजाशी बांधिलकी जपण्याची नवी घातक परंपरा निर्माण होत आहे.

ठळक मुद्देकर्नाळमध्ये विद्यार्थी साहित्य संमेलन उत्साहात जिल्ह्यातील विद्यार्थी, शिक्षकांचा सहभाग

सांगली : समाजातील एकरूपता नष्ट होत प्रत्येक समाज स्वाभिमानी होत आहे. प्रत्येकाला राष्टशी देणे-घेणे नसून केवळ समाजाशी बांधिलकी जपण्याची नवी घातक परंपरा निर्माण होत आहे.

त्यामुळेच समाजात समतावादाचे संस्कार पेरण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाचन करणे आवश्यक असून, घातक रूढींना मूठमाती देत मानवतेचा मळा फुलविण्यात साहित्याचे योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक महावीर जोंधळे यांनी गुरूवारी कर्नाळ (ता. मिरज) येथे केले.जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था व दक्षिण महाराष्ट साहित्य सभा कोल्हापूर यांच्यावतीने कर्नाळ येथे आयोजित पाचव्या विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी संमेलनाची अध्यक्षा तेजश्री पाटील, स्वागताध्यक्ष मयूर पाटील या विद्यार्थ्यांसह जिल्हाभरातील साहित्यप्रेमी शिक्षक उपस्थित होते.

जोंधळे म्हणाले, देशाची संस्कृती आणि परंपरा सर्वसमावेशक असताना, आजची घातक परंपरा त्यास मोडीत काढत आहे. विचार मारून टाकत, नव्या विचारांचे आक्रमण केले जात आहे. अशा काळात मानवतावादी व समतावादी दृष्टिकोनाची समाजाला गरज आहे. वाचनातूनच हा दृष्टिकोन निर्माण होत असल्याने विद्यार्थ्यांनी वाचनास प्राधान्य द्यावे. समाजात बदल घडविण्याची ताकद साहित्य, नाट्य चळवळीत असते. लेखकाचे आडनाव वाचून कविता, कथा वाचू नका, तर जे जे सकस मिळेल, ते साहित्य वाचण्यास विद्यार्थ्यांनी प्राधान्य द्यावे.

सांगली जिल्ह्याला साहित्याची मोठी परंपरा असून साहित्यिकांच्या गावांची तीर्थस्थळेच झाली पाहिजेत. प्रत्येक विद्यार्थी, शिक्षकांनी साहित्यिकांच्या गावांना भेट देऊन इतिहास जाणून घेतला पाहिजे. विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून नव्या पिढीचे दर्शन घडत असून साहित्य चळवळ वृध्दिंगत होण्यासाठी याची आवश्यकता आहे.

यावेळी डायटचे प्राचार्य डॉ. विकास सलगर, संमेलनाचे निमंत्रक मुश्ताक पटेल, शिक्षण अधिकारी नामदेव माळी, रघुनाथराव पाटील, दयासागर बन्ने, कृष्णात पाटोळे, बजरंग संकपाळ, नीलम माणगावे, मच्छिंद्र ऐनापुरे यांच्यासह शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, साहित्यप्रेमी उपस्थित होते.मोबाईल नको पुस्तक द्याजोंधळे म्हणाले, आजचे पालक विद्यार्थ्यांना मोबाईल घेऊन देतात. या मुलांना मोबाईलची काहीही गरज नसून त्यांना पुस्तकांची जास्त गरज आहे. घरामध्ये पुस्तक वाचनासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण होणार आहे. पुस्तकाशिवाय माणूस घडत नाही, हा विचार विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्यास शिक्षकांनी प्राधान्य द्यावे. 

सातव्या वेतन आयोगाचा सदुपयोग कराजोंधळे म्हणाले, शिक्षकांना आता सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. याचा उपयोग आपल्या मुलांच्या जडणघडणीसाठी करा. त्यांना घरात एक स्वतंत्र वाचनालय तयार करून पुस्तके आणून द्या, संगणक उपलब्ध करून द्या. आव्हाने स्वीकारण्यासाठी आवश्यक विविध विषयांवरील पुस्तक वाचनात आपल्या पाल्यांना त्यांना रमू द्या. अशाप्रकारे वाढलेल्या पगाराचा सदुपयोग करा.

 

टॅग्स :SangliसांगलीTeacherशिक्षक