शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

प्रधान मंत्री किसान सन्मान योजनेसाठी ग्रामस्तरीय समितीशी संपर्क साधावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 3:43 PM

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कमाल जमीन धारणेची अट रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित खातेदारांनी बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक, भ्रमण ध्वनी क्रमांक इत्यादि माहितीसह ग्रामस्तरीय समितीकडे ३० जूनपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. ​

ठळक मुद्देप्रधान मंत्री किसान सन्मान योजनेसाठी ग्रामस्तरीय समितीशी संपर्क साधावाकमाल जमीन धारणेची अट रद्द, बँक खाते, आधार क्रमांक देणे आवश्यक

सांगली : शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कमाल जमीन धारणेची अट रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित खातेदारांनी बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक, भ्रमण ध्वनी क्रमांक इत्यादि माहितीसह ग्रामस्तरीय समितीकडे ३० जूनपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.जिल्हा प्रशासनाकडून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना मोहीम स्वरूपात राबवण्यात येत असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, या योजनेतून प्रति शेतकरी कुटुंबाला वर्षाला ६ हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यापूर्वी एकूण कमाल जमीन धारणा २ हेक्टर पर्यंत असेल, त्याच शेतकऱ्यांना ही योजना लागू होती. त्यामध्ये केंद्र शासनाने ७ जून २०१९ रोजी सुधारणा करून कमाल जमीन धारणेची अट काढून टाकली आहे. त्यामुळे अधिकाधिक खातेदारांना याचा लाभ घेता येईल, असे ते म्हणाले.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत ग्राम स्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. तलाठी हे या समितीचे प्रमुख असतील. त्याशिवाय ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी, कृषि सहाय्यक, विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव हे या समितीचे सदस्य आहेत.

या समितीने संबंधित पात्र खातेदारांची संख्या निश्चित करायची आहे. त्यासाठी संबंधित खातेदारांनी बँक खाते पासबुकची छायांकित प्रत, आधार क्रमांक, भ्रमण ध्वनी क्रमांक इत्यादि माहिती या समितीकडे जमा करावयाची आहे. ज्या शेतकरी खातेदारांचे सामाईक खाते असेल व खात्यामध्ये आणेवारी निश्चित झाली नसेल, अशा बाबतीत सदरच्या खात्यातील व्यक्तिंनी ग्रामस्तरीय समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, या योजनेंतर्गत पात्र लाभार्थींच्या याद्या ग्रामस्तरीय समितीने ग्रामपातळीवर प्रसिद्ध केलेल्या आहेत. त्यावर काही हरकती असल्यास त्यावर ग्रामस्तरीय समितीने निर्णय घ्यावा. हा निर्णय मान्य नसल्यास संबंधित खातेदाराला तालुकास्तरीय समितीकडे दाद मागता येईल, असे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, जमीन धारण करणारी संस्था, संवैधानिक पद धारण करणारी आजी - माजी व्यक्ती, आजी झ्र माजी मंत्री, खासदार, आमदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष केंद्र व राज्य शासन, शासन अंगिकृत निमशासकीय संस्था, स्वायत्त संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था यांचे कार्यरत व निवृत्त कर्मचारी, गत आर्थिक वर्षात आयकर भरलेल्या व्यक्ती, १० हजार पेक्षा जास्त कायम निवृत्तीवेतन असलेल्या व्यक्ती, नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक, वकील, अभियंता, सनदी लेखापाल, वास्तुशास्त्रज्ञ इत्यादि हे या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत.

टॅग्स :Farmerशेतकरीcollectorजिल्हाधिकारीSangliसांगली