शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएसटी’ प्रणालीमुळे व्यवहारात सुसूत्रता : एस. ए. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 23:23 IST

यापूर्वी करदात्यांना तीन वेगवेगळ्या विभागाकडे कर भरण्यासाठी जावे लागत होते

ठळक मुद्देगतवर्षीच्या तुलनेत आयकर भरण्यात वाढ; आठ महिन्यात करदातेही वाढले

यापूर्वी करदात्यांना तीन वेगवेगळ्या विभागाकडे कर भरण्यासाठी जावे लागत होते. मात्र जीएसटी आल्यानंतर वेगवेगळे करभरणा, विवरणपत्र, करनिर्धारण, लेखापरीक्षण तसेच वेगवेगळ्या विभागाचा त्रास कमी झाला आहे. भविष्यात सर्व व्यवहार सुरळीत होतील. जीएसटी करप्रणाली निश्चितपणे चांगली आहे. यासंदर्भात सांगलीतील कर सल्लागार एस. ए. पाटील यांच्याशी साधलेला हा थेट संवाद...प्रश्न : जीएसटी लागू झाल्यानंतर या आठ ते नऊ महिन्यांमध्ये कर भरण्यामध्ये काय फरक पडला?उत्तर : व्यापार वाढीसाठी व योग्यप्रकारे नियोजन, पारदर्शकता, संगणकीकरण, भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी ‘एक देश, एक कर’ कायद्याची आवश्यकता होतीच. या करप्रणालीमुळे व्यवहारात सुसूत्रता आली आहे. संगणकीकरणामुळे मानवी हस्तक्षेप कमी झाला आहे. यातून भ्रष्टाचाराला आळा बसेल. जीएसटी खरोखरच काळाची गरज आहे. दि. १ एप्रिल २0१८ पासून ई-वे बिल कर प्रणाली आंतरराज्य व्यवहारासाठी बंधनकारक करण्यात आलेली आहे. त्यामुळे कर चुकवेगिरीला मोठ्या प्रमाणात आळा बसण्याची शक्यता आहे. परंतु त्यासाठी संगणकाच्या तांत्रिक अडचणी दूर झाल्या पाहिजेत, तरच व्यापाऱ्यांना त्याचा त्रास होणार नाही. जीएसटी लागू झाल्यानंतर या आठ ते नऊ महिन्यांमध्ये कर भरणा व करदात्यांमध्ये वाढ झाली आहे. जीएसटी दरामध्ये सुरुवातीला मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे लोकांना त्याचा त्रास झाला. लहान-मोठ्या व्यापारांना दरमहा जीएसटीआर रिटर्न भरावे लागत आहे. सरकारने लहान-मोठ्या व्यापाºयांचे वर्गीकरण न करता सर्वांना दरमहा जीएसटीआर भरणे आवश्यक आहे. लहान-मोठ्या व्यापाºयांच्या वर्गीकरणांची दक्षता सरकारने घेतली असती, तर लहान व्यापाºयांना दरमहाऐवजी तिमाही कर भरता आला असता. त्यामुळे संगणक प्रणालीवर अनावश्यक भार पडला नसता.प्रश्न : जीएसटी कर प्रणालीत कोणत्या त्रुटी आढळून आल्या? त्याचा काय परिणाम झाला?उत्तर : जीएसटी करप्रणालीत सुरुवातीला बºयाच तांत्रिक त्रुटी आढळून आल्याने करदात्यांना उशिरा शुल्क भरावे लागल्याने खूप त्रास झाला. शासनाला उशिरा का होईना जाग आली. शासनाने सुधारणा करून पहिल्या तीन महिन्याचे उशिरा शुल्क माफ केले. पुढील महिन्यासाठी उशिरा शुल्क कमी केले. सुरुवातीला प्रतिदिवस तीनशे रुपये उशिरा शुल्क होते, सध्या प्रतिदिवस पन्नास रुपये उशिरा शुल्क आकारले जात आहे.प्रश्न : कर विभाग, कर सल्लागार आणि ग्राहक सर्वजण सध्या संभ्रमावस्थेत दिसतात. हा संभ्रम दूर होणार का? आणि कधी होणार?उत्तर : सध्या कर विभाग व कर सल्लागार यांच्यातील संभ्रम बºयाचअंशी कमी झाला आहे. फक्त ग्राहकांमध्ये संभ्रम जाणवतो. हळूहळू जीएसटी कायदा सर्वांना सोपा असल्याचे जाणवत जाईल. त्यानंतर हा संभ्रम आपोआप दूर होईल.प्रश्न : एकूणच करप्रणालीत सुलभता आली आहे का? मार्चअखेरीस आयकर प्रणालीत काय फरक जाणवतो?उत्तर : निश्चितच नव्या करप्रणालीमुळे ग्राहकांमध्ये काही प्रमाणात द्विधा मन:स्थिती सुरुवातीच्या काळात होती. मात्र आता ग्राहकांनाही प्रणाली समजली आहे. एकूणच कर प्रणालीत सुलभता आली आहे. जीएसटी करदात्यांमध्ये वाढ झाल्याने आयकर प्रणालीद्वारे गतवर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात आयकर भरण्यामध्ये वाढ होत आहे.- सचिन लाड, सांगली

टॅग्स :SangliसांगलीGSTजीएसटी