शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
2
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
3
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
4
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
5
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
6
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
7
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
8
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
9
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
10
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
11
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
12
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
13
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
14
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
15
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
16
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
17
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
18
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
20
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड

बनावट नोटांचे ‘कनेक्शन’ पश्चिम बंगालपर्यंत आंतरराज्य टोळी : सूत्रधाराचे नाव निष्पन्न; पथक मुंबईस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 11:44 PM

सांगली : दोन हजाराच्या बनावट नोटा चलनात आणून देशाची आर्थिक व्यवस्था ढासळण्याचा प्रयत्न करणाऱ्या कल्याण टोळीचे पश्चिम बंगालपर्यंत ‘कनेक्शन’ असल्याचे गुरुवारी तपासात निष्पन्न झाले. राणा शेख हा या टोळीचा मुख्य सूत्रधार आहे. त्याच्या शोधासाठी शहर पोलिसांचे पथक मुंबईला रवाना झाले आहे. ही टोळी पश्चिम बंगालमधून दोन हजाराच्या नोटा मागवून त्या ...

सांगली : दोन हजाराच्या बनावट नोटा चलनात आणून देशाची आर्थिक व्यवस्था ढासळण्याचा प्रयत्न करणाऱ्या कल्याण टोळीचे पश्चिम बंगालपर्यंत ‘कनेक्शन’ असल्याचे गुरुवारी तपासात निष्पन्न झाले. राणा शेख हा या टोळीचा मुख्य सूत्रधार आहे. त्याच्या शोधासाठी शहर पोलिसांचे पथक मुंबईला रवाना झाले आहे. ही टोळी पश्चिम बंगालमधून दोन हजाराच्या नोटा मागवून त्या राज्यभर चलनात आणत होती, अशी माहितीही तपासातून पुढे आली आहे.

सांगलीत दोन हजाराच्या बनावट नोटा खपविणाºया राज राजकुमार उज्जेनवाल सिंह (वय २८) यास गेल्या आठवड्यात पकडण्यात आले होते. त्याचे साथीदार प्रेमविष्णू रोगा राफा (२६) व नरेंद्र आशापाल ठाकूर (३३, तिघे रा. कल्याण) यांनाही अटक करण्यात यश आले होते. सध्या तिघेही पोलीस कोठडीत आहेत. त्यांची कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून टोळीचा सूत्रधार राणा शेख याचे नाव निष्पन्न झाले आहे. तो मूळचा पश्चिम बंगालमधील आहे. त्याच्यामार्फतच ही टोळी दोन हजाराच्या बनावट नोटा मागवून घेत होती. त्यानंतर ते राज्यातील विविध शहरात जाऊन या नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करीत होते. सांगलीतही ते आठ दिवसांपासून तळ ठोकून होते. या काळात त्यांनी अनेक ठिकाणी या बनावट नोटा चलनात आणल्या. पण मुख्य बसस्थानकाजवळ एका चिरमुरे दुकानात नोट खपविताना सापडले होते.पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे तपास करीत आहेत.

शिंदे यांचे पथक तपासासाठी चार दिवसांपूर्वी कल्याणला जाऊन आले आहे. आता राणा शेख याचे नाव निष्पन्न झाल्याने त्याला ताब्यात घेण्यासाठी पथक गुरुवारी सायंकाळी पुन्हा मुंबईला रवाना झाले आहे. एका दोन हजाराच्या नोटेमागे टोळीतील प्रत्येक सदस्याला घसघशीत कमिशन मिळत होते. ही नोटही हुबेहूब असल्याने अजिबात संशय येत नव्हता. त्यामुळे टोळीचा हा उद्योग बिनदिक्कतपणे सुरु होता. राणा शेख सापडल्यास यामागील मोठ्या टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. 

पुन्हा तेच...सांगली, मिरजेत बनावट नोटा चलतान आणण्याचा प्रयत्न करीत असताना अनेकदा टोळ्या सापडल्या आहेत. या टोळ्यांचे ‘कनेक्शन’ पश्चिम बंगाल निघाले होते. आताच्या प्रकरणातही हेच कनेक्शन निघाले आहे. गरज पडल्यास पोलिसांचे पथक तपासासाठी पश्चिम बंगालला रवाना होणार आहे. सध्याच्या तपासात मुंबई व कल्याण पोलिसांचीही मदत घेण्यात आली आहे.

टॅग्स :SangliसांगलीMONEYपैसाPoliceपोलिसfraudधोकेबाजी