शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 13:50 IST

मिरज पॅटर्नमुळे विजय झाल्याचे सुरेश खाडे यांचे मत

सदानंद औंधे

मिरज : मिरजेत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे शहराध्यक्ष व माजी नगरसेवक संजय मेंढे यांनी आपला पक्ष बाजूला सोडून मला मदत केली, असा गौप्यस्फोट भाजपचे आमदार सुरेश खाडे यांनी केला. मिरज पॅटर्नमुळेच विजयाचे गणित साकारले गेल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मिरजेत संजय मेंढे यांच्या प्रभागात ओढ्यावरील संरक्षण भिंतीच्या कामासाठी खाडे यांनी निधी मंजूर केला आहे. त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना खाडे यांनी विधानसभा निवडणुकीत मेंढे यांनी मदत केल्याचा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, मी खरे बोलतो त्यामुळे सर्वांना समाधान वाटते. त्यात वावगे काहीच नाही. बापू हे भाऊबरोबर असावेत असे सर्वांनाच वाटते. खाडे यांच्या वक्तव्यावर संजय मेंढे यांनी काहीही मत मांडले नाही. यावेळी सुरेश आवटी, करण जामदार, बबिता मेंढे उपस्थित होते.

खाडे यांच्या दाव्यात तथ्य नाही : मेंढे

याबाबत विचारणा केल्यानंतर संजय मेंढे म्हणाले, आ.खाडे बोलले म्हणून आम्ही त्यांचे काम केले असे होत नाही. यापूर्वीही आ.खाडे यांनी विरोधी उमेदवार मीच निवडतो, असे सांगितले होते. माझा व त्यांचा पक्ष वेगळा आहे, मी त्यांना निवडणुकीत मदत केली या दाव्यात तथ्य नाही.

नेत्यांची मदत नाही, जनतेची झाली

शिवसेनेचे उमेदवार तानाजी सातपुते म्हणाले, आमची निवडणुकीत काँग्रेससोबत युती असल्याने काही बोलता आले नाही. मी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. या नेत्यांनी मला मदत केली नसली तरीही जनतेने सहकार्य केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

काँग्रेसच्या बैठकीत वाद

काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय मेंढे हे मिरजेत शिवसेनेच्या व सांगलीत अपक्ष उमेदवाराच्या प्रचारात होते. त्यांनी सांगलीत अपक्ष उमेदवाराचा प्रचार केल्याचा मुद्दा मिरजेत काही दिवसापूर्वी झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत उपस्थित झाला. यावरुन त्यांचा व जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा वाद झाला होता. आता मिरजेत ते सोबत असल्याच्या आ. खाडे यांनी केलेल्या खुलाशामुळे काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकांऱ्यात खळबळ उडाली आहे.

खाडे यांच्या वक्तव्यामुळे संशयकल्लोळ

मिरज विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी नेत्यांनी यावेळी बदल घडविणारच असा निर्धार केला होता. परंतु, महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या मित्र पक्षांनी काँग्रेस नेत्यांवर विश्वास ठेवला व नेहमीप्रमाणे दगाफटका झाल्याचा संशय आमदार खाडे यांच्या वक्तव्यामुळे बळावला आहे. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी विरोधकांसोबत हातमिळवणी केली तरीही कार्यकर्त्यांनी प्रामाणिक काम केल्याने शहरात भाजपला केवळ ९०० मताधिक्य मिळाल्याचेही गणित मांडले जात आहे

टॅग्स :SangliसांगलीBJPभाजपाcongressकाँग्रेस