शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
2
पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा
3
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
4
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
5
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
6
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
7
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
8
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

शेट्टी-खोत यांच्या भूमिकेवर कार्यकर्त्यांत संशयाचे धुके, संघटनेच्या अस्तित्वाचा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2022 5:37 PM

जयंत पाटील आणि शेट्टी यांच्यात दरी निर्माण झाली आहे. याचाच फायदा सदाभाऊ खोत उठविण्याचा प्रयत्न करत आहेत.

अशोक पाटील

इस्लामपूर : गत लोकसभा निवडणुकीपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था निर्माण होऊ लागली आहे. सध्या रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनीही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी जवळीक साधली आहे. त्यामुळे खोत व शेट्टी यांच्या भूमिकेवर कार्यकर्त्यांमध्ये संशय निर्माण होऊ लागला आहे.

मागील लोकसभा निवडणूक हातकणंगले लोकसभा मतदारसंघ राजू शेट्टी यांनी साखरसम्राटांचे नेते जयंत पाटील यांच्याशी समझौता करून लढविली होती. त्यानंतर महाआघाडीशी सलोख्याचे संबंध निर्माण केले होते. त्यामुळे विधान परिषदेत राष्ट्रवादीच्या कोट्यातून एकनाथ खडसे आणि राजू शेट्टी यांना आमदारकी मिळणार होती. परंतु, राज्यपालांनी यादीकडे शेवटपर्यंत टाळाटाळ केल्याने आमदारकी गळ्यात पडू शकली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या शेट्टी यांनी आपली भूमिका बदलत ऐन ऊस हंगामात एफआरपीच्या विषयावरून सरकारविरोधातच आघाडी उघडली. त्यातही त्यांना पूर्णत: यश मिळाले नाही.

सरकारने एफआरपीचे दोन तुकडे केल्याने शेट्टी तोंडघशी पडले. यावरही त्यांनी आपली भूमिका मवाळ केली. सध्या विजेच्या प्रश्नावर आक्रमक झाले आहेत. यामुळेच आता जयंत पाटील आणि शेट्टी यांच्यात दरी निर्माण झाली आहे. याचाच फायदा सदाभाऊ खोत उठविण्याचा प्रयत्न करत आहेत. इस्लामपूर येथील पालिकेच्या प्रशासकीय कार्यक्रमात जयंत पाटील व खोत एकत्र आल्याचे इस्लामपुरकरांनी पाहिले. दोघांनी परस्परांची वारेमाप स्तुती केली. गेल्या पाच वर्षांत सदाभाऊंनी स्वत:च्याच नेतृत्वाखालील पालिकेतील तत्कालीन सत्ताधारी विकास आघाडीच्या कामाचा जाहीर पंचनामा केला. जयंत पाटील यांच्या साक्षीने बोभाटे काढले. एकंदरीत, जयंत पाटील व सदाभाऊ यांची वाढती जवळीक आणि शेट्टी यांच्याशी दुरावा या दुटप्पी भूमिकेवर कार्यकर्त्यांत मात्र संशयाचे धुके निर्माण झाले आहे.

आमची जवळीक पूर्वीपासूनची

जयंत पाटील आणि माझी जवळीक पूर्वीपासून आहे. राजारामबापू पाटील यांच्या आशीर्वादासह आमचे घराणे यापूर्वी कार्यरत होते. मरळनाथपूर येथे दूध संस्था सुरू केली होती. जनता पक्षात गेल्यानंतर त्यांच्याच विचाराने आम्ही राजकीय वाटचाल केली होती. सध्या जयंत पाटील व आमची विचारधारा पूर्णत: वेगळी आहे. त्यामुळे जवळ आलो म्हणून बिघडले कोठे, त्यांच्याशी लगेच हातमिळवणी केली असा अर्थ काढू नये.

टॅग्स :SangliसांगलीRaju Shettyराजू शेट्टीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाSadabhau Khotसदाभाउ खोत Jayant Patilजयंत पाटील