शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

लॉकडाऊनला पर्याय ठरला कामेरीचा ‘तिरंगी पास’ पॅटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 22:37 IST

घरटी एकच पास दिल्याने कामापुरतेच लोक रस्त्यावर आले. होम क्वारंटाईन घरावर ग्रामपंचायतीने लाल रंगाचा फलक लावला, त्यामुळे त्यांचे आपोआपच विलगीकरण झाले, शिवाय तेथील रहिवासीही समाजापासून दूर राहिले. क्वारंटाईनचा कालावधी संपताच ग्रामपंचायतीने तो फलक काढून घेतला.

ठळक मुद्दे रस्त्यावरील-बाजारपेठेतील गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयोग यशस्वी काटेकोर नियोजन : सहा दिवस बाजारपेठ खुली, रविवारी संपूर्ण जनता संचारबंदी

संतोष भिसे ।सांगली : लांबलेल्या लॉकडाऊनमध्ये घरात सक्तीने कोंडून घ्यावे लागल्याने प्रत्येकजण मेटाकुटीला आला आहे. पण कामेरी (ता. वाळवा) ग्रामपंचायतीने लॉकडाऊन सांभाळतानाच ते सुसह्य ठरावे यासाठी ‘तिरंगी पास’चा पॅटर्न वापरला. त्यातून ग्रामस्थांची कोंडमाऱ्यातून सुटका तर झालीच, शिवाय व्यापारउदीमही सुरू राहिला.

२५ एप्रिलरोजी गावात कोरोनाबाधित रुग्ण सापडला. त्यानंतर कोरोना प्रतिबंधित बफर झोन निश्चित केले. दैनंदिन व्यवहारांसाठी फक्त बफर झोनमधील रहिवाशांना परवानगी दिली. गावाची लोकसंख्या सुमारे २२ हजार आहे. सर्वजणएकाचवेळी बाहेर पडले तर, लॉकडाऊनचा फज्जा उडेल, हे लक्षात घेऊन तिरंगी पासचे नियोजन केले. या क्लृप्तीमुळे गर्दीवर नियंत्रण आले. दररोज फक्त हजारभर लोकच रस्त्यावर येत राहिले. अत्यावश्यकदुकाने दररोजच उघडी राहिल्याने ग्रामस्थही निर्धास्त राहिले. लॉकडाऊनसोबतच लोकांची दैनंदिनीही सुरू राहिली. घरटी एकच पास दिल्याने कामापुरतेच लोक रस्त्यावर आले. होम क्वारंटाईन घरावर ग्रामपंचायतीने लाल रंगाचा फलक लावला, त्यामुळे त्यांचे आपोआपच विलगीकरण झाले, शिवाय तेथील रहिवासीही समाजापासून दूर राहिले. क्वारंटाईनचा कालावधी संपताच ग्रामपंचायतीने तो फलक काढून घेतला.

या नियोजनामुळे महामार्गालगत असूनही कामेरी गाव कोरोनाच्या फैलावापासून दूर राहिले. गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, सरपंच स्वप्नाली जाधव, पोलीस पाटील बाळासाहेब पाटील, डॉ. साकेत पाटील, सुनंदा पाटील, सुनील पाटील, दि. बा. पाटील, दिनेश जाधव, नंदकुमार पाटील, रणजित पाटील, जयराज पाटील, के शव पाटील, ग्रामसेवक आनंदराव चव्हाण, तानाजी माने, विजय जाधव आदींच्या संकल्पनेतून पॅटर्न राबवला.

अशी झाली अंमलबजावणीग्रामपंचायतीने पिवळा, गुलाबी व निळ््या रंगांचे तीन हजार पास छापले. घरटी एक दिला. पिवळ््या पासधारकांना सोमवारी व गुरुवारी बाहेर पडण्याची परवानगी दिली. गुलाबी पासधारकांना मंगळवारी, शुक्रवारी, तर निळ््या पासधारकांना बुधवारी, शनिवारी परवानगी दिली. रविवारी संपूर्ण संचारबंदी ठेवली. याची काटेकोर अंमलबजावणी केली. त्यामुळे अत्यावश्यक कामापुरतेच व मर्यादित संख्येने ग्रामस्थ बाहेर आले.

 

शंभर टक्के लॉकडाऊनमुळे ग्रामस्थांची गैरसोय होऊन अर्थचक्रही थंडावणार होते. हे लक्षात घेऊन तीनरंगी पासचा पॅटर्न वापरला. लोकांनीही प्रामाणिक अनुकरण केले. प्रसंगी ड्रोनद्वारे देखरेख ठेवली. याचे चांगले परिणाम दिसले. - शशिकांत शिंदे, गटविकास अधिकारी, वाळवा

टॅग्स :Sangliसांगलीcorona virusकोरोना वायरस बातम्या