शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

लॉकडाऊनला पर्याय ठरला कामेरीचा ‘तिरंगी पास’ पॅटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 22:37 IST

घरटी एकच पास दिल्याने कामापुरतेच लोक रस्त्यावर आले. होम क्वारंटाईन घरावर ग्रामपंचायतीने लाल रंगाचा फलक लावला, त्यामुळे त्यांचे आपोआपच विलगीकरण झाले, शिवाय तेथील रहिवासीही समाजापासून दूर राहिले. क्वारंटाईनचा कालावधी संपताच ग्रामपंचायतीने तो फलक काढून घेतला.

ठळक मुद्दे रस्त्यावरील-बाजारपेठेतील गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयोग यशस्वी काटेकोर नियोजन : सहा दिवस बाजारपेठ खुली, रविवारी संपूर्ण जनता संचारबंदी

संतोष भिसे ।सांगली : लांबलेल्या लॉकडाऊनमध्ये घरात सक्तीने कोंडून घ्यावे लागल्याने प्रत्येकजण मेटाकुटीला आला आहे. पण कामेरी (ता. वाळवा) ग्रामपंचायतीने लॉकडाऊन सांभाळतानाच ते सुसह्य ठरावे यासाठी ‘तिरंगी पास’चा पॅटर्न वापरला. त्यातून ग्रामस्थांची कोंडमाऱ्यातून सुटका तर झालीच, शिवाय व्यापारउदीमही सुरू राहिला.

२५ एप्रिलरोजी गावात कोरोनाबाधित रुग्ण सापडला. त्यानंतर कोरोना प्रतिबंधित बफर झोन निश्चित केले. दैनंदिन व्यवहारांसाठी फक्त बफर झोनमधील रहिवाशांना परवानगी दिली. गावाची लोकसंख्या सुमारे २२ हजार आहे. सर्वजणएकाचवेळी बाहेर पडले तर, लॉकडाऊनचा फज्जा उडेल, हे लक्षात घेऊन तिरंगी पासचे नियोजन केले. या क्लृप्तीमुळे गर्दीवर नियंत्रण आले. दररोज फक्त हजारभर लोकच रस्त्यावर येत राहिले. अत्यावश्यकदुकाने दररोजच उघडी राहिल्याने ग्रामस्थही निर्धास्त राहिले. लॉकडाऊनसोबतच लोकांची दैनंदिनीही सुरू राहिली. घरटी एकच पास दिल्याने कामापुरतेच लोक रस्त्यावर आले. होम क्वारंटाईन घरावर ग्रामपंचायतीने लाल रंगाचा फलक लावला, त्यामुळे त्यांचे आपोआपच विलगीकरण झाले, शिवाय तेथील रहिवासीही समाजापासून दूर राहिले. क्वारंटाईनचा कालावधी संपताच ग्रामपंचायतीने तो फलक काढून घेतला.

या नियोजनामुळे महामार्गालगत असूनही कामेरी गाव कोरोनाच्या फैलावापासून दूर राहिले. गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, सरपंच स्वप्नाली जाधव, पोलीस पाटील बाळासाहेब पाटील, डॉ. साकेत पाटील, सुनंदा पाटील, सुनील पाटील, दि. बा. पाटील, दिनेश जाधव, नंदकुमार पाटील, रणजित पाटील, जयराज पाटील, के शव पाटील, ग्रामसेवक आनंदराव चव्हाण, तानाजी माने, विजय जाधव आदींच्या संकल्पनेतून पॅटर्न राबवला.

अशी झाली अंमलबजावणीग्रामपंचायतीने पिवळा, गुलाबी व निळ््या रंगांचे तीन हजार पास छापले. घरटी एक दिला. पिवळ््या पासधारकांना सोमवारी व गुरुवारी बाहेर पडण्याची परवानगी दिली. गुलाबी पासधारकांना मंगळवारी, शुक्रवारी, तर निळ््या पासधारकांना बुधवारी, शनिवारी परवानगी दिली. रविवारी संपूर्ण संचारबंदी ठेवली. याची काटेकोर अंमलबजावणी केली. त्यामुळे अत्यावश्यक कामापुरतेच व मर्यादित संख्येने ग्रामस्थ बाहेर आले.

 

शंभर टक्के लॉकडाऊनमुळे ग्रामस्थांची गैरसोय होऊन अर्थचक्रही थंडावणार होते. हे लक्षात घेऊन तीनरंगी पासचा पॅटर्न वापरला. लोकांनीही प्रामाणिक अनुकरण केले. प्रसंगी ड्रोनद्वारे देखरेख ठेवली. याचे चांगले परिणाम दिसले. - शशिकांत शिंदे, गटविकास अधिकारी, वाळवा

टॅग्स :Sangliसांगलीcorona virusकोरोना वायरस बातम्या