शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

‘वायफळे’त भारनियमनाने द्राक्षबागा संकटात

By admin | Updated: December 26, 2015 00:14 IST

रब्बीही धोक्यात : शेतकऱ्यांना दिवसभरात चार तासच वीज पुरवठा

प्रवीण पाटील --सावळज -वायफळेसह परिसरात यावर्षी पडलेल्या अत्यल्प पावसामुळे शेतीसाठी पाण्याची चणचण भासत असतानाच गेल्या काही दिवसांपासून महावितरणने २० तास भारनियमन सुरु केल्याने, जे काही थोडेफार पाणी आहे तेही शेतीसाठी देणे अवघड झाले आहे. त्यामुळे काही ठिकाणी पाणी असूनदेखील फक्त ४ तासात द्राक्षबागा व रब्बीच्या पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.आठवड्यात मंगळवार वगळता तीन दिवस रात्री व तीन दिवस दिवसा ८ तास शेती पंपासाठी वीज देण्यात येत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून शुक्रवार ते रविवार फक्त ४ तासच वीज चालू करण्यात येते. त्यामध्येही अनेकवेळा विजेचा लपंडाव सुरु असतो. त्यामुळे फक्त ४ तासात द्राक्षबागांसह गहू, मका, हरभरा यासह चारा पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. पाणी असून देखील पिके वाळण्याची वेळ आली आहे.द्राक्षबागा सध्या ऐन भरात असल्यामुळे बागांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे. या भागामध्ये कोणत्याही शासकीय योजनेचे पाणी येत नसल्यामुळे कूपनलिका व विहिरी याद्वारे शेतीला पाणी पुरवठा केला जातो. मात्र फक्त चार तासात शेतीला पाणी देणे शक्य होत नाही. अगोदरच दुष्काळाने मेटाकुटीस आलेला शेतकरी भारनियमनामुळे हतबल झाला आहे. पूर्वीप्रमाणे ८ तास व सुरळीतपणे महावितरणने वीज पुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिनायावर्षी द्राक्ष बागायतदारांना हवामानाने चांगली साथ दिली आहे. त्यामुळे द्राक्षबागांवर रोगांचा कमी फै लाव आहे. मात्र अगोदरच दुष्काळामुळे पाणीटंचाई व त्यातच वीस-वीस तास भारनियमन, यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. भारनियमन म्हणजे शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना झाला आहे.