शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मार्ग शक्तिपीठाचा, हानी पर्यावरणाची: झाडे तोडताना घाई, नवी लागवड मात्र नाही

By संतोष भिसे | Updated: April 29, 2025 16:19 IST

पश्चिम घाटातील जैवविविधता धोक्यात : कवलापूर, सांगलीवाडीचे पर्यावरणही संकटात

संतोष भिसेसांगली : शक्तिपीठ महामार्गामुळे वनराईचा मोठा विनाश सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांत होण्याची शक्यता आहे. या तालुक्यांतील २५ गावे पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून घोषित झाली आहेत. केंद्रीय पर्यावरण व जलवायू परिवर्तन मंत्रालयाने न्यायालयाच्या आदेशांनुसार तसे जाहीर केले आहे. या घोषणेचे उल्लंघन करून शक्तिपीठसाठी वृक्षतोडीची चिन्हे आहेत.या भागात मोठ्या प्रमाणात वृक्षतोडीमुळे जैवविविधता धोक्यात आली आहे. वन्यजीव व त्यांचे भ्रमणमार्ग, अधिवास संपुष्टात येत आहेत. त्यामुळे तेथे शक्तिपीठ महामार्गाला मोठा विरोध होत आहे. २२ एप्रिलरोजी केंद्राने निर्बंधांची अधिसूचना जारी केली. त्याआधारे स्थानिकांकडून शक्तिपीठला विरोध सुरू झाला आहे. या आदेशामुळे त्यांच्या लढ्याला बळ मिळाले आहे. या निर्णयामुळे वृक्षतोडीला पूर्णत: बंदी आली आहे. मात्र, शक्तिपीठ महामार्ग रेटण्याच्या मानसिकतेत असलेल्या शासनाकडून या अधिसूचनेतून चोरवाट काढली जाण्याची शक्यताच अधिक आहे.शक्तिपीठ महामार्ग पश्चिम घाटातील जैवविविधतेसाठी मारक ठरणार असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. वन्यजीव मोठ्या प्रमाणात विस्थापित होणार आहेत. त्याचा उपद्रव शेतीला होणार आहे. टस्कर हत्ती, गवे, हरणे, रानडुक्कर यासह विविध पक्ष्यांचा उदरनिर्वाह चालणाऱ्या झाडांवर कुऱ्हाड चालवण्याने हे प्राणी-पक्षी शेतीकडे वळण्याची भीती आहे. सध्या हे संकट मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यांतील शेतकरी अनुभवत आहेत. त्यांच्या द्राक्षबागा, फळबागायती व भाजीपाला शेतीमध्ये वन्यप्राण्यांची घुसखोरी वाढली आहे. शक्तिपीठनंतर त्याची तीव्रता आणखी वाढणार आहे.

येथे होणार झाडांची कत्तलकोल्हापूर जिल्ह्यात सध्या आंबा परिसरात रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी शेकडो झाडे तोडण्यात आली आहेत. आता शक्तिपीठसाठी नव्याने झाडे काढून टाकावी लागणार आहेत. सांगली जिल्ह्यात सावळज, मणेराजुरी, गव्हाण, कवलापूर, बुधगाव, माधवनगर, कर्नाळ, पद्माळे, सांगलीवाडी या परिसरात शेकडो वर्षे जुनी झाडे आहेत. शक्तिपीठसाठी त्यांची कत्तल होण्याची चिन्हे आहेत.

झाडे लावली जात नाहीत हेच दुखणेविकास हवा, तर झाडे तोडण्याशिवाय पर्याय नाही असा युक्तिवाद केला जातो. पर्यावरणप्रेमींचा विकासाला विरोध नाही; पण तोडलेल्या झाडांच्या मोबदल्यात झाडे लावली जात नाहीत, लावली तरी त्यांचे संगोपन केले जात नाही हे मूळ दुखणे आहे. एकदा का रस्ता झाला की, त्याच्या दुतर्फा झाडे लावायची आहेत, याचाच विसर पडून जातो. शक्तिपीठसाठी महामार्ग प्राधिकरणाने पर्यावरण मंत्रालयाची परवानगी मागितली आहे. ती मिळेलदेखील. मात्र परवानगी देताना घातलेल्या अटींचे पालन होत असल्याची काळजी कोण घेणार? हा कळीचा प्रश्न आहे.

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्गGovernmentसरकारenvironmentपर्यावरणShaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्ग