शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
3
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
4
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
5
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
6
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
7
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
8
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
9
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
10
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
11
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
13
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
14
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
15
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
16
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
17
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
18
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
19
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
20
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल

Sangli: माळीण, वायनाड झाले; उद्या भाष्टेवस्ती, कोकणेवाडी नको

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 13:33 IST

२०१९ पासून पुनर्वसनाचा प्रश्न रेंगाळला

विकास शहाशिराळा : शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरातील आरळापैकी, भाष्टेवस्ती तसेच कोकणेवाडी ही वस्ती माळीण, वायनाडसारख्या दुर्घटनेच्या छायेखाली असून, वाडीलगतच्या डोंगरांना भेगा पडून डोंगर खचू लागले आहेत. अतिवृष्टी झाली तर याठिकाणी मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.शासनाकडून येथील नागरिकांचे कायमस्वरूपी स्थलांतर होणार का? अशीच परिस्थिती पश्चिम भागातील अनेक वाड्या-वस्त्यांवर आहे. माळीण, वायनाडसारख्या घटनेचे सावट आणि भीती येथील नागरिकांत आहे. स्थलांतरासाठी जागा निवडल्या. सर्वकाही प्रस्ताव पाठवण्यात आला आणि त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी स्थलांतराच्या ठिकाणी किती खर्च येणार याचे अंदाजपत्रक मागितले आहे. आता स्थलांतराचा चेंडू पंचायत समितीकडे आहे; मात्र प्रत्येकाला जागा कोठे, किती देणार? याचे नियोजन नाही, आर्किटेक्ट नेमणूक त्यानंतर प्रस्ताव, मंजुरी आदी यामुळे स्थलांतरही रेंगाळले आहे.

याठिकाणी भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पहाणी केली असून, कोकणेवाडी येथील डोंगर केव्हाही ढासळू शकतो, असा निष्कर्ष काढला होता. याबाबत वरिष्ठ कार्यालयास ११ नोव्हेंबर २०१९ला माहितीही कळविली होती. या प्रश्नाबाबत आमदार मानसिंगराव नाईक, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या वारंवार याबाबत बैठक झाल्या. यानंतर जिल्हाधिकारी दयानिधी यांनी जागेची निवड करून पाहणी करावी, असे सांगितले. यानंतर प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, अमित रंजन गुप्ता, तहसीलदार शामला खोत-पाटील, प्रशिक्षणार्थी तहसीलदार संतोष आठरे यांनी भेट देऊन पाहणी केली होती.स्थलांतरासाठी जागा पाहणी झाली याबाबत प्रस्ताव पाठविला. प्रस्ताव पाठविल्यानंतर आराखडा व खर्चाचे अंदाजपत्रक करून पाठविण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी तहसीलदारांना कळविले. यावरून तहसीलदार शामला खोत-पाटील यांनी पंचायत समितीकडे याबाबत प्रस्ताव करावा, असे कळविले आहे. या नागरिकांना किती जागा देणार, सोईसुविधा कशा द्यायच्या अशा अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे हे पुनर्वसन रेंगाळले आहे. २०१९ पासून पुनर्वसनाचा प्रश्न रेंगाळला आहे. माळीण झाली, आज वायनाड झाले अशी घटना येथे घडली तर काय? अशा भीतीच्या छायेखाली येथील नागरिक वावरत आहेत.

शिराळा पश्चिम भागात भूस्खलनाचे संकटतालुक्याच्या पश्चिम भागातील मिरुखेवाडी, कोकणेवाडी, भाष्टेवाडी, काळोखेवाडी, सावंतवाडी, भिसेवाडी या डोंगराच्या पायथ्याला तर जाधववाडी ढाणकेवाडी, सावंतवाडी, येसलेवाडी, गुंडेवाडी या डोंगर पठारावर वसलेल्या वाड्या-वस्त्या आहेत. जळकेवाडी, बेर्डेवाडी, खोतवाडी परिसरातही थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती आहे. या ठिकाणी दरवर्षी तीन ते पाच हजार मिलिमीटर पाऊस पडतो. दोन-तीन वर्षांपासून येथे पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे भूस्खलनाचे संकट आहे.

पुनर्वसन होणारे कुटुंब व लोकसंख्या-कोकणेवाडी कुटुंब १०१ (पुरुष-१५२, स्त्री १५४) एकूण ३०६-भाष्टेवस्ती-कुटुंब २८ (पुरुष -३८, स्त्री ३८) एकूण ७६-धामणकरवस्ती -कुटुंब १८ (पुरुष-२४, स्त्री २९) एकूण ५३-मिरुखेवाडी - कुटुंब ११९ (पुरुष १८० महिला १७३ ) एकूण एकूण ३५२

टॅग्स :Sangliसांगलीshirala-acशिराळा