शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
3
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
4
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
5
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
6
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
7
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
8
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
9
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
10
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
11
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
12
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
13
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
14
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
15
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
16
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
17
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

कवठेमहांकाळमध्ये दुष्काळ जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 11:32 PM

तालुक्यात यावर्षी कमी प्रमाणात पाऊस पडला आहे. पाऊस पडेल या आशेवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणी केली होती. परंतु पावसाने हुलकावणी दिल्याने पिके पूर्ण वाया गेली आहेत.

ठळक मुद्देतालुका काँग्रेसची मागणी-तहसील कार्यालयावर मोर्चा

कवठेमहांकाळ : तालुक्यात यावर्षी कमी प्रमाणात पाऊस पडला आहे. पाऊस पडेल या आशेवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणी केली होती. परंतु पावसाने हुलकावणी दिल्याने पिके पूर्ण वाया गेली आहेत. शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट असताना, शासनाने कोणत्याही प्रकारची बियाणे, खते याचा पुरवठा करण्याचे नियोजन केले नाही. शासनाने फेरसर्वेक्षण करून त्वरित दुष्काळ जाहीर करावा, आदी मागण्यांसाठी कवठेमहांकाळ तालुका काँग्रेसतर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात म्हैसाळ व टेंभू योजनेचे पाणी सोडले आहे. त्यामुळे तालुक्यातील पाझर तलाव, लघुपाटबंधारे तलाव, तसेच अग्रणी नदीवरील बंधारे भरण्यात यावेत. तालुक्यात खरीप हंगाम वाया गेला असल्याने तीव्र चारा टंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे मागेल त्या ठिकाणी जनावरांच्या चारा छावण्या सुरू करण्याची मागणी केली आहे.आप्पासाहेब शिंदे, बाळासाहेब गुरव, जालिंदर देसाई, माणिक भोसले, उदय शिंदे, भीमसेन भोसले, विजय ओलेकर आदींसह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

शैक्षणिक शुल्क माफ कराकवठेमहांकाळ तालुक्यात पशुव्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. पशुधन वाचविण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत लाळ व खुरकत या रोगांच्या लसी त्वरित उपलब्ध करून द्याव्यात. दुष्काळी स्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे. तसेच वीज बिलेही माफ करावीत, अशीही मागणी करण्यात आली आहे.

कवठेमहांकाळ येथे तालुुक्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसतर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आंदोलनात आप्पासाहेब शिंदे, माणिकराव भोसले आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी