शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

सांगली जिल्ह्यात साठ ग्रामपंचायतींवर सर्वच पक्षांची करडी नजर, तुल्यबळ लढती होणारी गावे जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 13:25 IST

ग्रामपंचायतींवर वर्चस्व ठेवण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, बाळासाहेबांची शिवसेना व शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्यांनी कंबर कसली आहे.

सांगली : थेट सरपंचपदामुळे मोठ्या लोकसंख्येच्या ६० ग्रामपंचायतींवर वर्चस्व ठेवण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, बाळासाहेबांची शिवसेनाशिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. सर्वच स्थानिक आघाड्यांनी सरपंचपदाचे तुल्यबळ उमेदवार दिले असून आर्थिक रसदही पुरविली जात आहे. यामुळे ग्रामपंचायत निवडणुका लक्षवेधी होत आहेत. सध्या प्रचार शिगेला पोहोचला आहे.जिल्ह्यातील ४४७ ग्रामपंचायतींसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका घोषित केल्या होत्या. यापैकी पाच गावांतील निवडणुकांना स्थगिती मिळाली असून २८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. कडेगाव तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींनी निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. यामुळे सध्या ४१२ ग्रामपंचायतींसाठी रणधुमाळी सुरू आहे. जिल्ह्यातील ६० ग्रामपंचायतींच्या निवडणुका सर्वच पक्षांच्या नेत्यांनी प्रतिष्ठेच्या केल्या आहेत.

निवडणुकांच्या दृष्टीने ही निर्णायक गावेमाधवनगर, बुधगाव, दिघंची, खरसुंडी, वायफळे, मणेराजुरी, वाळवा, बागणी, अंकलखोप, बाेरगाव, कामेरी, वांगी, कडेपूर, डफळापूर, वाळेखिंडी, उमेदी, संख, कोकरुड, मांगले या सर्वाधिक मोठ्या ग्रामपंचायती असून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या दृष्टीने ही निर्णायक गावे आहेत. यामुळे राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, बाळासाहेबांची शिवसेना व शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्यांनी या गावांतील निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या आहेत.

जयंत पाटील यांच्याच गटांमध्ये लढती

वाळवा तालुक्यातील बाेरगाव आणि कामेरीत सरपंचपदाची निवडणूक तर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य लढवत आहेत. वाळवा येथील बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचे मोठे आव्हान हुतात्मा संकुलासमोर आहे. वाळवा तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप, तर काही गावांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याच गटांमध्ये लढती होत आहेत.

नेत्यांचे तगडे आव्हानशिराळा, कडेगाव, पलूस, तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज, जत तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादीत चुरस आहे. खानापूर, आटपाडी तालुक्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आमदार अनिल बाबर यांच्या माध्यमातून तयारीत आहे. या गटाला खानापूर, आटपाडी तालुक्यांत भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या नेत्यांनी तगडे आव्हान दिले आहे.

या ठिकाणच्या लढतींकडे लक्षमिरज तालुका : बेडग, कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, सोनी, बुधगाव, माधवनगर, सलगरे, बामणोली, समडोळी. 

खानापूर : लेंगरे, आळसंद. 

आटपाडी : दिघंची, झरे, खरसुंडी. 

तासगाव : अंजनी, मणेराजुरी, सावर्डे, वायफळे. 

कवठेमहांकाळ : आरेवाडी, शिरढोण, रांजणी, बोरगाव, नागज. 

पलुस : दुधोंडी, बुर्ली, अंकलखोप, ब्रह्मनाळ. 

वाळवा : कासेगाव, वाटेगाव, नेर्ले, येडेमच्छिंद्र, ताकारी, बोरगाव, पेठ, रेठरे धरण, ऐतवडे बुद्रुक, चिकुर्डे, कुरळप, येडेनिपाणी, कणेगाव, वाळवा, गोटखिंडी, कोरेगाव, शिगाव, बागणी, 

कडेगाव : वांगी, देवराष्ट्रे, कडेपूर, तडसर. 

जत : डफळापूर, वाळेखिंडी, माडग्याळ, उमदी, संख. 

शिराळा : आरळा, कोकरुड, सागाव, मांगले.

गृहभेटींवर उमेदवारांचा भरप्रत्यक्ष मतदारांच्या घरी भेट देण्यावर उमेदवार भर देत आहेत. पॅनलचे सर्व सदस्य गावातील प्रत्येक घर पिंजून काढत आहेत. त्यामुळे, ग्रामीण भागात सध्या यात्रेचे स्वरूप आले आहे. एक उमेदवार गेल्यानंतर दुसरा उमेदवार त्याच भागात येत असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Sangliसांगलीgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस