शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

सांगली जिल्ह्यात चारही प्रमुख पक्ष अस्वस्थ; काँग्रेस मात्र स्वस्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 18:42 IST

जिल्ह्यातील समीकरणे बदलण्याची चिन्हे

सांगली : राज्याच्या राजकीय घडामोडींचे थेट परिणाम जिल्ह्यातील राजकारणावर झाले आहेत. पक्षांतर्गत बदलत्या वातावरणाने भाजप, शिवसेनेचे दोन्ही गट व राष्ट्रवादी या पक्षातील नेते, कार्यकर्ते सध्या अस्वस्थ दिसत आहेत. दुसरीकडे नेत्यांची एकजूट व राज्यातील राजकीय गोंधळापासून दूर राहिल्याने काँग्रेस स्वस्थ आहे. पुढील सहा महिन्यांत आणखी वेगवान राजकीय घडामोडी होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील समीकरणे बदलू शकतात.वर्षभरापूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली. शिंदे गट व ठाकरे गट अशी विभागणी झाली. राज्याप्रमाणे जिल्ह्यातही दोन्ही गटांत पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे विभाजन झाले. त्यामुळे चारऐवजी पाच पक्ष जिल्ह्याच्या पटलावर दिसू लागले. राज्यातील सत्ताधारी शिंदे गट व भाजपच्या सरकारला वर्षपूर्ती झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच राष्ट्रवादीत फूट पडली. अद्याप नवा गट जिल्ह्याच्या राजकीय पटावर दिसत नसला तरी तो दिसण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. सांगली, मिरजेतील अनेक पदाधिकारी नव्या गटाच्या संपर्कात आहेत. त्यामुळे हा गटही लवकरच अस्तित्वात येऊ शकतो. त्यामुळे पुढील निवडणुकांमध्ये सहा पक्षांचे अस्तित्व दिसेल.पक्षांतर्गत वातावरणाचा विचार केल्यास सध्या जिल्ह्यातील काँग्रेस वगळता सर्व पक्ष अस्वस्थ आहेत. राष्ट्रवादीच्या आगमनामुळे मंत्रिपदाच्या शर्यतीतून जिल्ह्यातील इच्छुक भाजप नेत्यांचा पत्ता कापला गेल्याने त्यांच्यात कमालीची अस्वस्थता आहे. ज्या राष्ट्रवादीविरोधात आंदोलने केली, आरोप केले त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ राज्यात आली आहे. त्याबद्दल जिल्ह्यातील निष्ठावंत गटात नाराजी आहे. अशा राजकारणाला त्यांचा पाठिंबा नाही. त्यामुळे आधीच गटबाजीने त्रस्त असलेल्या भाजपला पक्षांतर्गत नाराजीचा सामना करावा लागेल.राष्ट्रवादीच्या वाट्याला अनेक मंत्रिपदे गेल्याने शिंदे गटाला असुरक्षित वाटत आहे. जिल्ह्यात आमदार अनिल बाबर यांना मंत्रिपद मिळण्याच्या शक्यतेवर राष्ट्रवादीच्या सत्तेतील सहभागाने पाणी पडले. सत्तेतील वाटेकरी वाढल्याने शिंदे गटही अस्वस्थ आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेसह भविष्यातील सर्व निवडणुकांसाठी आता दोनऐवजी तीन पक्षांत जागावाटप होणार असल्याने शिंदे गटाची दावेदारी कमकुवत होऊ शकते.

राजकीय अस्थिरतेचा फायदा काँग्रेसला?केवळ गटबाजीची चिंता घेऊन वाटचाल करणाऱ्या काँग्रेसमधील नेत्यांनी गटबाजीचा प्रश्नही संपविला आहे. जिल्ह्यात पक्षाचे सारे नेते एकवटले आहेत. राज्याच्या राजकारणात काँग्रेसला अशा पद्धतीच्या फुटीचा सामना करावा लागला नाही. त्यामुळे राज्यासह जिल्ह्यातील अस्थिरतेचा फायदा काँग्रेस घेण्याच्या तयारीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेस