शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
7
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
10
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
11
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
12
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
13
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
14
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
15
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
16
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
17
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
18
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
19
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
20
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?

सांगली जिल्हा बँकेत शेती कर्जाचा ‘एनपीए’ ६२ कोटी : वर्षअखेर १00 कोटीचा पल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 01:00 IST

कर्जमाफीच्या आशेने थकीत होत असलेल्या कृषी कर्जामुळे राज्यातील सर्वच जिल्हा बँकांसमोर आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत. त्यासाठीच राज्य सहकारी बँकेने नाबार्ड आणि केंद्रीय अर्थखात्याकडे शेती कर्जाची थकबाकी एनपीएमध्ये समाविष्ट न करण्याबाबत सवलत मिळावी, म्हणून प्रस्ताव दिला आहे.

ठळक मुद्देराज्य बँकेच्या मागणीस पाठिंबा; कर्जवसुलीत बँक प्रशासनासमोर अडचणी

सांगली : नैसर्गिक आपत्तीने पिचलेला शेतकरी आणि कर्जमाफीच्या आशेने थकीत ठेवलेले कर्ज, यामुळे शेतकऱ्यांसह आता जिल्हा बँकेसमोरील अडचणीही वाढल्या आहेत. सध्या बँकेचा शेतीकर्जाचा एनपीए ६२ कोटी इतका असून, मार्चअखेरीस तो १00 कोटीवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे थकीत शेतीकर्ज ‘एनपीए’मध्ये समाविष्ट न करण्याबाबत राज्य बँकेने नाबार्ड व केंद्रीय अर्थमंत्रालयाकडे केलेल्या मागणीस जिल्हा बँकेने पाठिंबा दर्शविला आहे.

कर्जमाफीच्या आशेने थकीत होत असलेल्या कृषी कर्जामुळे राज्यातील सर्वच जिल्हा बँकांसमोर आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत. त्यासाठीच राज्य सहकारी बँकेने नाबार्ड आणि केंद्रीय अर्थखात्याकडे शेती कर्जाची थकबाकी एनपीएमध्ये समाविष्ट न करण्याबाबत सवलत मिळावी, म्हणून प्रस्ताव दिला आहे. त्याचबरोबर ३१ आॅगस्ट २0१९ ही कर्जमाफीची ‘कट आॅफ डेट’ ठेवावी, अशीही मागणी सरकारकडे केली आहे. या मागणीस सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने पाठिंबा दर्शविला आहे.

आपत्तीच्या दुष्टचक्रात सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकरी उद्ध्वस्त होत असताना, कृषी क्षेत्राचा मुख्य कणा असलेल्या जिल्हा बँकेच्या अर्थचक्रालाही फटका बसत आहे. एकीकडे नैसर्गिक आपत्ती आणि दुसरीकडे कर्जमाफीच्या आशेने शेतकऱ्यांनी कर्जाची थकबाकी भरण्यास दाखविलेली असमर्थता, यामुळे जिल्हा बँकेच्या अडचणी वाढत आहेत. जिल्हा बँकेने १ लाख ५१ हजार २८४ शेतकºयांना २0१८-१९ या आर्थिक वर्षात अल्प व दीर्घ मुदतीच्या १ हजार १४७ कोटी ७६ लाख रुपयांच्या कर्जाचे वाटप केले आहे. ३0 जूनअखेर यातील कर्जाची थकबाकी ३७९ कोटी १४ लाख इतकी आहे. एनपीएचा विचार केल्यास, सद्यस्थितीत केवळ कृषी कर्जाचा एनपीए ६२ कोटीच्या घरात आहे. त्याबाबत नाबार्ड किंवा केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून कोणताही दिलासादायक निर्णय न झाल्यास हा एनपीए १00 कोटीवर जाण्याची शक्यता आहे.

कृषी क्षेत्राला जिल्हा बँकेवर विसंबून राहावे लागते. त्यामुळे एकूण पीक कर्जापैकी सर्वाधिक वाटा जिल्हा बँकेचा असतो. तो वाटा जवळपास ७0 टक्के इतका आहे. बँकेने १ एप्रिल २0१९ ते ३0 सप्टेंबर २0१९ या काळात ९३ हजार ६२४ कर्जदारांना ५९ हजार ४२४ हेक्टरसाठी ५८४ कोटी ५३ लाखाचा कर्जपुरवठा केला आहे. यातील ४0 टक्के शेतकºयांना अवकाळी पावसाने उद्ध्वस्त केल्याचा अंदाज आहे. त्यामुळे सुमारे २३0 ते २५0 कोटी रुपयांची वसुली बाधित होणार आहे.

दरवर्षी बँकेस : ३२ कोटीचा तोटाशेतीकर्जातून बँकेला कधीही फायदा होत नाही. दरवर्षी ३२ ते ३४ कोटी रुपये शेतीकर्जातून नुकसान होत असते. तरीही शेतकऱ्यांची बॅँक म्हणून शेतीकर्जाची सेवा ती बजावत असते. बँकेचा सध्याचा एनपीए (नॉन प्रोडक्टीव्ह असेट्स) ५३६ कोटींचा असून, त्यात पीक कर्जाचे ६२ कोटी आहेत. याची टक्केवारी ११.८३ टक्के असून, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांबरोबर बँकेच्या एनपीएलाही मोठा दणका बसणार आहे.जिल्ह्यातील सोसायट्यांकडील कर्जाची थकबाकी वाढलीजिल्ह्यातील सोसायट्यांकडे ८४ हजार ३५६ शेतकºयांची ६८० कोटी रुपयांची थकबाकी आहे. व्याजासहीत ही रक्कम मार्चअखेरीस १ हजार कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोसायट्यांच्या अडचणीही वाढल्या आहेत.

 

जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत. त्यामुळे आम्ही संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली होती; मात्र शेती कर्जाच्या थकबाकीचा डोंगर वाढत असल्याने जिल्हा बँकेबाबत दिलासादायक निर्णयही सरकारने घेतला पाहिजे. शेतकरी अडचणीत आल्याने सोसायट्या आणि पर्यायाने जिल्हा बँकेच्या अडचणीही वाढतात. त्यामुळे कट आॅफ डेट निश्चित करून थकीत शेतीकर्ज एनपीएत समाविष्ट न करण्याबाबत निर्णय घ्यावा. राज्य बॅँकेने केलेली मागणी योग्य आहे. - दिलीपतात्या पाटील, अध्यक्ष, सांगली जिल्हा बॅँक

टॅग्स :bankबँकMONEYपैसा