शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
3
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
4
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
5
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
6
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
7
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
8
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
9
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
10
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
11
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
20
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा बँकेत शेती कर्जाचा ‘एनपीए’ ६२ कोटी : वर्षअखेर १00 कोटीचा पल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 01:00 IST

कर्जमाफीच्या आशेने थकीत होत असलेल्या कृषी कर्जामुळे राज्यातील सर्वच जिल्हा बँकांसमोर आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत. त्यासाठीच राज्य सहकारी बँकेने नाबार्ड आणि केंद्रीय अर्थखात्याकडे शेती कर्जाची थकबाकी एनपीएमध्ये समाविष्ट न करण्याबाबत सवलत मिळावी, म्हणून प्रस्ताव दिला आहे.

ठळक मुद्देराज्य बँकेच्या मागणीस पाठिंबा; कर्जवसुलीत बँक प्रशासनासमोर अडचणी

सांगली : नैसर्गिक आपत्तीने पिचलेला शेतकरी आणि कर्जमाफीच्या आशेने थकीत ठेवलेले कर्ज, यामुळे शेतकऱ्यांसह आता जिल्हा बँकेसमोरील अडचणीही वाढल्या आहेत. सध्या बँकेचा शेतीकर्जाचा एनपीए ६२ कोटी इतका असून, मार्चअखेरीस तो १00 कोटीवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे थकीत शेतीकर्ज ‘एनपीए’मध्ये समाविष्ट न करण्याबाबत राज्य बँकेने नाबार्ड व केंद्रीय अर्थमंत्रालयाकडे केलेल्या मागणीस जिल्हा बँकेने पाठिंबा दर्शविला आहे.

कर्जमाफीच्या आशेने थकीत होत असलेल्या कृषी कर्जामुळे राज्यातील सर्वच जिल्हा बँकांसमोर आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत. त्यासाठीच राज्य सहकारी बँकेने नाबार्ड आणि केंद्रीय अर्थखात्याकडे शेती कर्जाची थकबाकी एनपीएमध्ये समाविष्ट न करण्याबाबत सवलत मिळावी, म्हणून प्रस्ताव दिला आहे. त्याचबरोबर ३१ आॅगस्ट २0१९ ही कर्जमाफीची ‘कट आॅफ डेट’ ठेवावी, अशीही मागणी सरकारकडे केली आहे. या मागणीस सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने पाठिंबा दर्शविला आहे.

आपत्तीच्या दुष्टचक्रात सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकरी उद्ध्वस्त होत असताना, कृषी क्षेत्राचा मुख्य कणा असलेल्या जिल्हा बँकेच्या अर्थचक्रालाही फटका बसत आहे. एकीकडे नैसर्गिक आपत्ती आणि दुसरीकडे कर्जमाफीच्या आशेने शेतकऱ्यांनी कर्जाची थकबाकी भरण्यास दाखविलेली असमर्थता, यामुळे जिल्हा बँकेच्या अडचणी वाढत आहेत. जिल्हा बँकेने १ लाख ५१ हजार २८४ शेतकºयांना २0१८-१९ या आर्थिक वर्षात अल्प व दीर्घ मुदतीच्या १ हजार १४७ कोटी ७६ लाख रुपयांच्या कर्जाचे वाटप केले आहे. ३0 जूनअखेर यातील कर्जाची थकबाकी ३७९ कोटी १४ लाख इतकी आहे. एनपीएचा विचार केल्यास, सद्यस्थितीत केवळ कृषी कर्जाचा एनपीए ६२ कोटीच्या घरात आहे. त्याबाबत नाबार्ड किंवा केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून कोणताही दिलासादायक निर्णय न झाल्यास हा एनपीए १00 कोटीवर जाण्याची शक्यता आहे.

कृषी क्षेत्राला जिल्हा बँकेवर विसंबून राहावे लागते. त्यामुळे एकूण पीक कर्जापैकी सर्वाधिक वाटा जिल्हा बँकेचा असतो. तो वाटा जवळपास ७0 टक्के इतका आहे. बँकेने १ एप्रिल २0१९ ते ३0 सप्टेंबर २0१९ या काळात ९३ हजार ६२४ कर्जदारांना ५९ हजार ४२४ हेक्टरसाठी ५८४ कोटी ५३ लाखाचा कर्जपुरवठा केला आहे. यातील ४0 टक्के शेतकºयांना अवकाळी पावसाने उद्ध्वस्त केल्याचा अंदाज आहे. त्यामुळे सुमारे २३0 ते २५0 कोटी रुपयांची वसुली बाधित होणार आहे.

दरवर्षी बँकेस : ३२ कोटीचा तोटाशेतीकर्जातून बँकेला कधीही फायदा होत नाही. दरवर्षी ३२ ते ३४ कोटी रुपये शेतीकर्जातून नुकसान होत असते. तरीही शेतकऱ्यांची बॅँक म्हणून शेतीकर्जाची सेवा ती बजावत असते. बँकेचा सध्याचा एनपीए (नॉन प्रोडक्टीव्ह असेट्स) ५३६ कोटींचा असून, त्यात पीक कर्जाचे ६२ कोटी आहेत. याची टक्केवारी ११.८३ टक्के असून, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांबरोबर बँकेच्या एनपीएलाही मोठा दणका बसणार आहे.जिल्ह्यातील सोसायट्यांकडील कर्जाची थकबाकी वाढलीजिल्ह्यातील सोसायट्यांकडे ८४ हजार ३५६ शेतकºयांची ६८० कोटी रुपयांची थकबाकी आहे. व्याजासहीत ही रक्कम मार्चअखेरीस १ हजार कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोसायट्यांच्या अडचणीही वाढल्या आहेत.

 

जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत. त्यामुळे आम्ही संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली होती; मात्र शेती कर्जाच्या थकबाकीचा डोंगर वाढत असल्याने जिल्हा बँकेबाबत दिलासादायक निर्णयही सरकारने घेतला पाहिजे. शेतकरी अडचणीत आल्याने सोसायट्या आणि पर्यायाने जिल्हा बँकेच्या अडचणीही वाढतात. त्यामुळे कट आॅफ डेट निश्चित करून थकीत शेतीकर्ज एनपीएत समाविष्ट न करण्याबाबत निर्णय घ्यावा. राज्य बॅँकेने केलेली मागणी योग्य आहे. - दिलीपतात्या पाटील, अध्यक्ष, सांगली जिल्हा बॅँक

टॅग्स :bankबँकMONEYपैसा