शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अब्दुल करीम खाँ यांच्या स्मारकासाठी ८० वर्षे संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 12:07 IST

किराना घराण्याचे अध्वर्यू, संगीतरत्न अब्दुल करीम खाँ यांनी चाळीस वर्षे मिरजेत वास्तव्य केलेला ह्यगवई बंगलाह्ण ही वास्तू किराना घराण्यातील गायकांचे श्रध्दास्थान आहे. मात्र गवई बंगल्यात खाँसाहेबांचे स्मारक उभारण्यासाठी गेली ८० वर्षे त्यांच्या शिष्यांचा संघर्ष सुरू आहे.

ठळक मुद्देखाँसाहेबांचे वास्तव्य असलेल्या गवई बंगल्याचा स्मारकासाठी प्रस्ताव देशातील नामवंत गायकांची मागणीस्मारकाच्या मागणीसाठी शिष्यांकडून पाठपुरावा सुरुगवई बंगला स्मृती मंडळाची स्थापना

सदानंद औंधे

मिरज , दि. २६ : किराना घराण्याचे अध्वर्यू, संगीतरत्न अब्दुल करीम खाँ यांनी चाळीस वर्षे मिरजेत वास्तव्य केलेला गवई बंगला ही वास्तू किराना घराण्यातील गायकांचे श्रध्दास्थान आहे. मात्र गवई बंगल्यात खाँसाहेबांचे स्मारक उभारण्यासाठी गेली ८० वर्षे त्यांच्या शिष्यांचा संघर्ष सुरू आहे.

अब्दुल करीम खाँ यांची मिरज ही कर्मभूमी. उत्तर प्रदेशातील कैराना येथील खाँसाहेब मिरजेशी एकरूप झाले होते. किराना घराण्यातील काले खाँ यांच्या घरात १८७२ रोजी त्यांचा जन्म झाला. घरातील वातावरण संगीताला पोषक असल्याने त्यांनी लहान वयातच गायन कला आत्मसात केली.

अवघ्या सहाव्या वर्षापासून गायन कला आत्मसात करण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेत पंधराव्या वर्षी त्यांनी गानप्रभुत्व मिळविले. संगीतातील अनेक गोष्टी आत्मसात केल्यानंतर त्यांनी देशात भ्रमण केले. म्हैसूर, गुजरात दौऱ्यात गानमाधुर्याने त्यांनी लोकांची मने जिंकली. बडोद्याचे कलाप्रेमी राजे श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी खाँसाहेबांना दरबारी गायक म्हणून नियुक्त केले.

बडोद्यात चार वर्षे त्यांनी मोठा लौकिक मिळविल्यानंतर १८९८ मध्ये खाँसाहेब मिरजेस आले. मिरजेत त्यांना प्लेगचा आजार झाल्याने त्यांनी मीरासाहेब दर्ग्यात जाऊन गानसेवा केली. यामुळे ते पूर्ण बरे झाल्याने मीरासाहेबांवर त्यांची श्रध्दा होती.

मीरासाहेबांच्या प्रत्येक उरूसात खाँसाहेब उरूसादिवशी दर्ग्याच्या आवारातील झाडाखाली बसून गायन करीत. सुमारे चाळीस वर्षे हे व्रत त्यांनी पाळले होते. मद्रासच्या दौऱ्यावर गेल्यानंतर दि. २७ आॅक्टोबर १९३७ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर मीरासाहेब दर्ग्याच्या आवारात दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या स्मृतिनिमित्त १९३८ पासून दर्गा उरूसात मोठी संगीत सभा आयोजित करण्यात येते.

दर्गा संगीत सभेत देशातील किराना घराण्याचे दिग्गज गायक-वादक हजेरी लावतात. १९३८ मध्ये दर्गा उरूसातील पहिल्या स्मृती संगीत सभेचे आॅल इंडिया रेडिओवरून प्रक्षेपण केले होते.

अब्दुल करीम खाँ यांनी सवाई गंधर्व, पं. भीमसेन जोशी, सुरेशबाबू माने, बाळकृष्ण कपिलेश्वर, दशरथ मुळे, रोशनआरा बेगम, गंगूबाई हनगल, शंकरराव सरनाईक, कैवल्यकुमार यासारखा मोठा शिष्यसंप्रदाय निर्माण केला. या शिष्यांनी किराना घराण्याच्या गायकीचा पूर्ण देशात प्रसार केला. खाँसाहेबांची कन्या हिराबाई बडोदेकर यांच्या पुढाकाराने मिरजेत स्मृती स्मारक मंदिर उभारले.

 

गवई बंगला स्मृती मंडळाची स्थापनाखाँसाहेबांच्या निधनानंतर गवई बंगला इतरांकडे हस्तांतरित झाला. भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रचारासाठी व कलाकारांना प्रेरणा देण्यासाठी गवई बंगल्यात खाँसाहेबांचे स्मारक उभारण्याची देशातील नामवंत गायकांची मागणी आहे. कलाकारांनी गवई बंगला स्मृती मंडळाची स्थापना करून स्मारकाच्या मागणीसाठी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. मात्र गेल्या ८० वर्षांत मागणीची दखल घेण्यात आलेली नाही.

टॅग्स :musicसंगीतSangliसांगली