शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

सांगली जिल्ह्यात रस्ते अपघातात पन्नास दिवसांत ५८ ठार : आलेख वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 01:01 IST

सांगली : वाहनांची वाढती संख्या, खराब व अरुंद रस्ते, तसेच वाहतूक नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने गेल्या काही वर्षांत अपघात आणि त्यामध्ये बळी जाणाºयांची

ठळक मुद्दे१३९ गंभीर जखमी; दररोज एकाचा अपघातात मृत्यूदहा तालुक्यांच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची संख्या कमी

सचिन लाड ।सांगली : वाहनांची वाढती संख्या, खराब व अरुंद रस्ते, तसेच वाहतूक नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने गेल्या काही वर्षांत अपघात आणि त्यामध्ये बळी जाणाºयांची संख्या प्रचंड वाढली आहे. २०१८ या नवीन वर्षात अपघातांची मालिकाच सुरूच आहे. १ जानेवारी ते २० फेब्रुवारीअखेर जिल्ह्यात ९४ अपघात होऊन ५८ जणांचा बळी गेला, तर १३९ जण जखमी झाले आहेत.

पुणे-बंगळूर राष्टÑीय महामार्गावरील जिल्ह्यातील कणेगाव ते कासेगाव ही २८ किलोमीटरची हद्द येते. मिरज-पंढरपूर असे दोन राष्टÑीय, तर सांगली ते तासगाव, मिरज-विजापूर, वसगडेमार्गे कºहाड, सांगली ते पेठ, सांगली ते कोल्हापूर असे पाच राज्य महामार्ग आहेत. या प्रत्येक महामार्गावर नेहमी अपघात होतात. मात्र कुठेही पोलीस चौकी नाही. रस्त्यावर वाहतूक प्रचंड वाढली आहे. वाहतूक नियमांचे पालन करण्याकडे प्रत्येकाचे दुर्लक्ष होत असल्याचे वाढत्या अपघातांवरून दिसून येते. जिल्ह्यात दरवर्षी सहाशेहून अधिक अपघात होत आहेत. यामध्ये तीनशे ते सव्वातीनशे लोकांचा बळी जात आहे. कासेगाव-कणेगाव, सांगली-इस्लामपूर, सांगली-तासगाव, विटा-पलूस-कºहाड, अंकली-मिरज, मिरज-पंढरपूर या मार्गांवर अपघाताचे प्रमाण जास्त आहे. खराब रस्त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण दोन टक्के आहे.'जिल्ह्यातील ३९ ठिकाणे : धोकादायकजिल्ह्यात वर्षानुवर्षे होणाºया अपघातांची कारणे शोधून काढण्यासाठी त्यावर उपाययोजना राबविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन व पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वी घेतला. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे, एसटी महामंडळ व सार्वजनिक रस्ते बांधकाम विभागातील अधिकाºयांनी संयुक्त समिती स्थापन करून अपघातस्थळांचा सर्व्हे केला. यामध्ये पाचपेक्षा जास्त बळी व जखमी झाले आहेत, याचा शोध घेण्यात आला. जिल्ह्यात अशी ३९ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. नागज फाटा, येलूर फाटा, इटकरेफाटा, वाघवाडी फाटा, लक्ष्मी फाटा, पेठ नाका, आष्टा नाका, महाराजा हॉटेल, कुची, तासगाव फाटा, शिरढोण- कुची- कवठेमहांकाळ फाटा, कामेरी, तांदूळवाडी, येडेनिपाणी फाटा, सिद्धेश्वर मंदिर, कवलापूर, केरेवाडी, शेळकेवाडी व भोसे आदी ठिकाणांचा समावेश आहे.पोलिसांची संख्या अपुरीजिल्ह्यात लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या अत्यंत अपुरी आहे. ७०५ गावे आणि २५ लाखांहून अधिक लोकसंख्या आहे. आज प्रत्येक घरात दुचाकी आहे. वाहनांची संख्या वाढत असताना रस्त्यांची लांबी, रुंदी मात्र अपवाद वगळता तेवढीच राहिली आहे. सांगली, मिरज, कुपवाड ही तीन प्रमुख शहरे वगळली, तर दहा तालुक्यांच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची संख्या कमी असल्याचे दिसून येते.कारणांचा शोधसमितीने अपघाताच्या ठिकाणांची पाहणी करून कारणे कोणती, तेथील त्रुटी, तसेच उपाययोजनांचा अभ्यास केला. यातून त्यांना रस्त्यावर दुभाजक नाहीत, अपघाताचा इशारा देणारे फलक नाहीत, रस्ता कुठे संपतो ते दर्शविणारे फलक नाहीत. धोकादायक वळणे या बाबी प्रकर्षाने जाणविल्या आहेत.