शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

सांगली जिल्ह्यात रस्ते अपघातात पन्नास दिवसांत ५८ ठार : आलेख वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 01:01 IST

सांगली : वाहनांची वाढती संख्या, खराब व अरुंद रस्ते, तसेच वाहतूक नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने गेल्या काही वर्षांत अपघात आणि त्यामध्ये बळी जाणाºयांची

ठळक मुद्दे१३९ गंभीर जखमी; दररोज एकाचा अपघातात मृत्यूदहा तालुक्यांच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची संख्या कमी

सचिन लाड ।सांगली : वाहनांची वाढती संख्या, खराब व अरुंद रस्ते, तसेच वाहतूक नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने गेल्या काही वर्षांत अपघात आणि त्यामध्ये बळी जाणाºयांची संख्या प्रचंड वाढली आहे. २०१८ या नवीन वर्षात अपघातांची मालिकाच सुरूच आहे. १ जानेवारी ते २० फेब्रुवारीअखेर जिल्ह्यात ९४ अपघात होऊन ५८ जणांचा बळी गेला, तर १३९ जण जखमी झाले आहेत.

पुणे-बंगळूर राष्टÑीय महामार्गावरील जिल्ह्यातील कणेगाव ते कासेगाव ही २८ किलोमीटरची हद्द येते. मिरज-पंढरपूर असे दोन राष्टÑीय, तर सांगली ते तासगाव, मिरज-विजापूर, वसगडेमार्गे कºहाड, सांगली ते पेठ, सांगली ते कोल्हापूर असे पाच राज्य महामार्ग आहेत. या प्रत्येक महामार्गावर नेहमी अपघात होतात. मात्र कुठेही पोलीस चौकी नाही. रस्त्यावर वाहतूक प्रचंड वाढली आहे. वाहतूक नियमांचे पालन करण्याकडे प्रत्येकाचे दुर्लक्ष होत असल्याचे वाढत्या अपघातांवरून दिसून येते. जिल्ह्यात दरवर्षी सहाशेहून अधिक अपघात होत आहेत. यामध्ये तीनशे ते सव्वातीनशे लोकांचा बळी जात आहे. कासेगाव-कणेगाव, सांगली-इस्लामपूर, सांगली-तासगाव, विटा-पलूस-कºहाड, अंकली-मिरज, मिरज-पंढरपूर या मार्गांवर अपघाताचे प्रमाण जास्त आहे. खराब रस्त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण दोन टक्के आहे.'जिल्ह्यातील ३९ ठिकाणे : धोकादायकजिल्ह्यात वर्षानुवर्षे होणाºया अपघातांची कारणे शोधून काढण्यासाठी त्यावर उपाययोजना राबविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन व पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वी घेतला. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे, एसटी महामंडळ व सार्वजनिक रस्ते बांधकाम विभागातील अधिकाºयांनी संयुक्त समिती स्थापन करून अपघातस्थळांचा सर्व्हे केला. यामध्ये पाचपेक्षा जास्त बळी व जखमी झाले आहेत, याचा शोध घेण्यात आला. जिल्ह्यात अशी ३९ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. नागज फाटा, येलूर फाटा, इटकरेफाटा, वाघवाडी फाटा, लक्ष्मी फाटा, पेठ नाका, आष्टा नाका, महाराजा हॉटेल, कुची, तासगाव फाटा, शिरढोण- कुची- कवठेमहांकाळ फाटा, कामेरी, तांदूळवाडी, येडेनिपाणी फाटा, सिद्धेश्वर मंदिर, कवलापूर, केरेवाडी, शेळकेवाडी व भोसे आदी ठिकाणांचा समावेश आहे.पोलिसांची संख्या अपुरीजिल्ह्यात लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या अत्यंत अपुरी आहे. ७०५ गावे आणि २५ लाखांहून अधिक लोकसंख्या आहे. आज प्रत्येक घरात दुचाकी आहे. वाहनांची संख्या वाढत असताना रस्त्यांची लांबी, रुंदी मात्र अपवाद वगळता तेवढीच राहिली आहे. सांगली, मिरज, कुपवाड ही तीन प्रमुख शहरे वगळली, तर दहा तालुक्यांच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची संख्या कमी असल्याचे दिसून येते.कारणांचा शोधसमितीने अपघाताच्या ठिकाणांची पाहणी करून कारणे कोणती, तेथील त्रुटी, तसेच उपाययोजनांचा अभ्यास केला. यातून त्यांना रस्त्यावर दुभाजक नाहीत, अपघाताचा इशारा देणारे फलक नाहीत, रस्ता कुठे संपतो ते दर्शविणारे फलक नाहीत. धोकादायक वळणे या बाबी प्रकर्षाने जाणविल्या आहेत.