शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
2
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
3
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
5
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
6
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
7
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
8
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
9
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
10
बीड महामार्ग भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात
11
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
12
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
13
मार्कशीटमधील खाडाखोड कळली अन् बापाची सटकली; ९ वर्षांच्या मुलीला क्रूरपणे संपवलं, नंबर १ चा होता अट्टहास
14
रंगांचा खेळ! रेड, ग्रीन तर माहितीय पण फूड पॅकेजिंगवरील ब्लू, येलो मार्कचा नेमका अर्थ काय?
15
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
16
तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही...
17
थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...
18
Firoza Khatun : जेलमध्ये जुळलं सूत! प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; जेलर फिरोजा खातूनने केलं कैद्यासोबत लग्न
19
राज्यपालांना दोनदा भेटले तरीही विजय यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण नाही, राज्यघटनेत काय म्हटलंय?
20
Sangeetha Sornalingam: तृषा कृष्णनपेक्षा श्रीमंत आहे थलपति विजयची पत्नी संगीता, अभिनेत्रीपेक्षा ५ पट प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत गॅस्ट्रोचे १९ रुग्ण

By admin | Updated: November 25, 2014 23:48 IST

घरोघरी सर्व्हे सुरू : पाण्याचे नमुने तपासणी, औषध फवारणी सुरू

सांगली : मिरजेपाठोपाठ सांगलीतही गॅस्ट्रोचे रुग्ण आढळू लागल्याने महापालिकेची आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. आतापर्यंत शहरात गॅस्ट्रोचे १९ रुग्ण आढळले आहेत. यातील १४ रुग्णांवर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, हा साथीचा आजार पसरु नये, यासाठी आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन सर्व्हे सुरु केला आहे. पाण्याचे नमुने घेऊन तपासणी, तसेच विविध भागात औषध फवारणी केली जात आहे.
शहरातील संजयनगर, अभयनगर, शंभरफुटी रस्ता, खणभाग, जमदाडे गल्ली, यशवंतनगर, माधवनगर रस्त्यावरील चिंतामणीनगर या परिसरात राहणाऱ्या काहीजणांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. या १९ रुग्णांपैकी १४ रुग्णच रुग्णालयात दाखल आहेत. उर्वरित चार रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. गेल्या आठ दिवसांपासून या रुग्णांना ताप, उलटी व जुलाबाचा त्रास सुरु होता. खासगी रुग्णालयात त्यांनी औषधोपचार घेतले. मात्र त्यांची प्रकृती खालावतच गेली. यामुळे ते शासकीय रुग्णालयात दाखल झाले. मिरजेतही गेल्या चार दिवसांपासून गॅस्ट्रोच्या आजाराने थैमान घातले आहे. आतापर्यंत सातजणांचा बळी गेला आहे. अनेक रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सांगलीतही त्याची सुरुवात झाल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामीण भागातही गॅस्ट्रोचे रुग्ण आढळत आहेत. दूषित पाण्याचा ग्रामीण भागात पुरवठा होत आहे. यामुळे ग्रामपंचायतीकडून गावात पाणी उकळून पिण्याचे आवाहन केले जात आहे. शासकीय रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांवर प्रथम अतिदक्षता विभागात उपचार केले जात आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना वॉर्डात हलविले जात आहे. शहरातील खासगी रुग्णालयातही ताप, उलटी व जुलाबाचे रुग्ण दाखल होत आहेत. त्यांची माहितीही जिल्हा आरोग्य विभागाकडून घेतली जात आहे. कवलापूर, कवठेएकंद येथेही गॅस्ट्रोचे रुग्ण आढळत आहेत. (प्रतिनिधी)

जुलाब, उलट्या
चक्कर येणे,
डोळे खोलवर जाणे,
अंग थंडगार पडणे,
थंडी वाजून येणे
काय काळजी घ्यावी...
पाणी उकळून प्यावे
घर व परिसर स्वच्छ ठेवावा
विहीर व कूपनलिकेतील पाणी पिऊ नये
जुलाब, उलट्या झाल्यास तातडीने औषध घ्यावे

सांगलीत आज बैठकीचे आयोजन
महापालिका क्षेत्रामध्ये गॅस्ट्रो व कॉलऱ्याने गंभीर स्वरूप धारण केले असून, यावर उपाययोजना करण्यासाठी तातडीने उद्या (बुधवार) वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी दिली. या बैठकीत तातडीने उपाययोजना करण्याबाबत निर्णय घेण्यात येतील, अशी माहितीही त्यांनी दिली.गेल्या आठ दिवसांपासून सांगली-मिरजेत गॅस्ट्रो-कॉलऱ्याने थैमान घातले आहे. सुमारे साडेतीनशेहून अधिक रुग्ण आढळले असून, चौघांचा बळी गेला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी आज (मंगळवार) शासकीय रुग्णालय, मिरज व सांगली येथे भेट दिली. याबाबत उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होत आहे.