शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Sangli: येळावी येथे एसटीच्या अपघातात सतरा जखमी, दैव बलवत्तर म्हणून वाचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 16:21 IST

येळावी : येळावी (ता. तासगाव) येथे येळावी-पलूस मार्गावर तासगाव डेपोतील चिंचवड-तासगाव या एसटीचा दुपारच्या दरम्यान अपघात झाला. यात १७ ...

येळावी : येळावी (ता. तासगाव) येथे येळावी-पलूस मार्गावर तासगाव डेपोतील चिंचवड-तासगाव या एसटीचा दुपारच्या दरम्यान अपघात झाला. यात १७ प्रवासी जखमी झाले. जखमींवर येळावीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. यातील तिघांना पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिलला पाठविण्यात आले आहे.मंगळवार, दि. १७ रोजी दुपारी साडेबाराच्या दरम्यान चालक ए.जे. सुतार व वाहक सुरेश भानुदास शेंडगे (वय ५८, रा.हातनूर) हे चिंचवडहून तासगावकडे एसटी घेऊन जात असताना येळावी येथील पेट्रोलपंपाच्या शेजारील वळणावर ट्रॅक्टरला पास करताना ब्रेक मारल्याने व पावसामुळे रस्त्यावर दलदल झाल्याने एसटीवरील ताबा सुटून ती रानात शिरली. एसटीत एकूण ३२ प्रवासी प्रवास करत होते. यात १७ प्रवासी जखमी झाले आहेत. संबंधित प्रवाशांवर येळावी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम उपचार करून १४ जणांना घरी पाठवण्यात आले आहे. तर इतर तिघांना सांगली सिव्हिलला पाठविण्यात आले आहे. सांगली सिव्हिलला पाठवलेल्यांत पूजा संदीप माळी (वय २७, तासगाव), रेश्मा प्रकाश माळी (वय २०, तासगाव), सुमन बबनराव जाधव (वय ५९, पुणे) असून, किरकोळ जखमींमध्ये श्वेता विजय मानकर (वय २१, रा.तासगाव), प्राजक्ता विजय मानकर (वय २४, रा. तासगाव), मनीषा प्रशांत शिंदे (वय ४५, रा.तासगाव), रामसिंग मोहनराव पाटील (वय ४४, रा.तासगाव), राणी अमोल सुतार (वय ३८, रा.पाटण), योगिता रविराज कोकरे (वय ३३, रा. कराड), अनिल शिवलिंग मिरजकर (वय ६२, रा.तासगाव), सीताराम गोपाळ खाडे (वय ६०, रा.किलोस्करवाडी), शालन अण्णा माळी (वय ६०, रा.तासगाव), संदीप अण्णा माळी (वय ३५, रा.तासगाव), मनीषा गणेश पवार (वय ४५, रा.धनगाव), रविराज यशवंत कोकरे (वय ४२, रा.कराड), शोभा प्रकाश मंडले (वय ४३, रा.मिरज) व अनुराधा कुमार सारापुरे (वय ६०, रा.तासगाव) यांचा समावेश आहे.

दैव बलवत्तर म्हणून वाचलेबस गटार पार करून रानात शिरली. ज्या ठिकाणी थांबली तिथून फक्त दोन फुटावर जवळपास पन्नास फुट बाय ४० फुट घेराची विहीर असून, त्या विहिरीला लागूनच दुसरी त्याच क्षेत्रफळाची विहीर आहे. बस अजून दोन फुट जरी पुढे गेली असती तर वेगळा अनर्थ घडला असता. हे दृश्य पाहून अनेक प्रवासी व आलेले नागरिक भीती व्यक्त करत होते.