शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

टेंभू सिंचन योजनेची १४.८९ कोटी विक्रमी पाणीपट्टी वसुली; ६३ हजारावर हेक्टर क्षेत्र आलं ओलिताखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 16:42 IST

योजना साधारणपणे सहा महिने चालते. दर महिन्याला ६ ते ७ कोटी रुपये वीजबिल येते. एकंदरीत ६ महिन्यांचे ४० कोटी रुपये वीजबिल भरावे लागते. ८१ /१९ फॉर्म्युल्याप्रमाणे ८१ टक्के वीजबिल राज्य शासन भरते तर १९ टक्के वीजबिल शेतकऱ्यांकडून वसूल केले जाते.

प्रताप महाडिककडेगाव : टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभागाने सिंचन वर्ष २०२१-२२ मध्ये टेंभू, कृष्णा कालवा, आरफळ कालवा प्रकल्पातून ८.७० टीएमसी पाणी उचलले. या याेजनांमधून सध्या ६३ हजार ४०३ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. यासाठी सिंचन व बिगर सिंचनाचे एकूण १२.३२ कोटी रुपये पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट होते. मात्र प्रत्यक्षात १४.८९ कोटी रुपये विक्रमी वसुली करून व्यवस्थापनाने उद्दिष्टाच्या १२१ टक्के वसुली केली आहे.टेंभू उपसा सिंचन योजना ५ टप्प्यांमध्ये कार्यान्वित आहे. कृष्णा कालवा व आरफळ कालवा गुरुत्व पद्धतीने चालणाऱ्या योजना आहेत. यामुळे या योजनांसाठी वीज बिलाचा प्रश्न उद्भवत नाही. मात्र टेंभू योजनेसाठी एकूण ५ टप्प्यांमध्ये पाणी उचलून ४५० किलाेमीटर लांबीच्या कालव्याद्वारे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यापर्यंत पोहोचविले जाते. यासाठी वीजबिलाचा खर्चही मोठा आहे.योजना साधारणपणे सहा महिने चालते. दर महिन्याला ६ ते ७ कोटी रुपये वीजबिल येते. एकंदरीत ६ महिन्यांचे ४० कोटी रुपये वीजबिल भरावे लागते. ८१ /१९ फॉर्म्युल्याप्रमाणे ८१ टक्के वीजबिल राज्य शासन भरते तर १९ टक्के वीजबिल शेतकऱ्यांकडून वसूल केले जाते. वीजबिलाच्या थकबाकीमुळे महावितरणकडून योजनेचा वीजपुरवठा खंडित हाेण्याची नामुष्की ओढवू शकते. हा पूर्वानुभव लक्षात घेऊन या वर्षी योजनेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाणीपट्टी वसुलीवर अधिक भर दिला.कृष्णा प्रकल्पांतर्गत कण्हेर धरणापासून निघणारा डावा कालवा कृष्णा नदीस जेथे छेदतो तेथून पुढे आरफळ कालवा चालू होतो. त्याची एकूण लांबी १९२ किलाेमीटर आहे. या विभागाकडे आरफळ कालव्याचे १०२ ते १९२ किलाेमीटर व पलूस शाखा कालव्याचे १ ते ३३ किलाेमीटरपर्यंतचे सिंचन व्यवस्थापन आहे. आरफळ कालव्यांतर्गत सांगली जिल्ह्यातील खानापूर, पलूस, तासगाव व कडेगाव तालुक्यांना ३.८३ टीएमसी पाणीवापर प्रस्तावित आहे. त्यानुसार निर्मित सिंचन क्षेत्र १५९८६ हेक्टर आहे.कृष्णा कालव्याची खोडशी फुगवटा व वसगडे बंधाऱ्यासह एकूण लांबी ८६ किलाेमीटर आहे. याद्वारे सातारा व सांगली जिल्ह्यातील कराड, वाळवा, पलूस, तासगाव तालुक्यांना २.७० टीएमसी पाणी मिळते. त्यानुसार निर्मित सिंचन क्षेत्र १३ हजार ३६६ हेक्टर आहे. येथेही पाणीपट्टी आकारणी व वसुली सक्षमपणे होत आहे.

३५ टक्के कर्मचारी; १२१ टक्के उद्दिष्टपूर्ती

टेंभू, कृष्णा कालवा आणि आरफळ या तीनही प्रकल्पांच्या व्यवस्थापनासाठी एकूण मंजूर पदांपैकी फक्त 30 ते ३५ टक्केच कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. यामुळे उपलब्ध यंत्रणेवर मोठा ताण आहे. तरीही कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विक्रमी पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यात यश मिळविले.

साखर कारखान्यांचे सहकार्य : राजन रेड्डीयार

टेंभू उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रामध्ये एकूण ९ मोठे साखर कारखाने आहेत. पाणीपट्टी वसुलीसाठी या कारखान्यांकडून मोठे सहकार्य होत आहे, हे साखर कारखाने शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून टेंभू योजनेची पाणीपट्टी कपात करून रक्कम योजनेकडे वर्ग करतात. यामुळे योजना सक्षमपणे चालविण्यास मदत होत आहे, असे कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीFarmerशेतकरी