शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
4
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
5
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
Daily Top 2Weekly Top 5

१२६ प्राणांतिक वाहन

By admin | Updated: December 1, 2014 00:06 IST

चौपदरीकरणाची मागणी : जिल्ह्यात घडलेल्या अपघातानंतर बोध घ्या

प्रकाश वराडकर - रत्नागिरी -जिल्ह्यात गेल्या दहा महिन्यांच्या काळात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग व जिल्ह्यातील इतर मार्गांवर झालेल्या १२६ प्राणांतिक वाहन अपघातात १४३ जणांचा मृत्यू झाला. मुंबई - गोवा महामार्गावर सर्वाधिक ७६ अपघात झाले असून, त्यात ९२ जणांना प्राण गमवावा लागल्याने हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यामुळे या महामार्गाचे लवकरात लवकर चौपदरीकरण होण्याची मागणी सुरू झाली आहे.
राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी अरुंद पूल, अरूंद रस्ते तसेच तीव्र चढ-उतारांबरोबरच धोकादायक वळणे, रस्त्यावर असलेले खड्डे यामुळे या रस्त्याची माहिती नसलेल्या तसेच बेदरकारपणे वाहने हाकणाऱ्या चालकांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. राष्ट्रीय महामार्गावर जानेवारी २०१४ ते आॅक्टोबर २०१४ या दहा महिन्यांत झालेल्या ७६ अपघातात ७० पुरुष व २२ महिला मिळून ९२ जणांचा मृत्यू झाला, तर ७९ अपघातात २४० पुरुष व ६५ महिलांसह ३०५ जण गंभीर जखमी झाले. ९१ अपघातांत ४८९ जण किरकोळ जखमी झाले. राज्य महामार्गावर याच दहा महिन्यात झालेल्या १४ अपघातात १२ पुरुष व २ महिलांसह १४ जणांचा मृत्यू झाला. २५ अपघातात ४५ पुरुष व १० महिलांसह ५५ जण गंभीर जखमी झाले. याच कालावधीत राज्य महामार्गावर ८ अपघातात २३ जण किरकोळ जखमी झाले. दहा महिन्यांत ३६ अपघातात ३५ पुरुष व २ महिलांसह ३७ जणांचा बळी गेला. ६० अपघातात ९४ पुरुष व २६ महिलांसह १२० जणांना प्राणास मुकावे लागले.


भीषण अपघाताला कारणीभूत...
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर गेल्या दहा महिन्यात झालेल्या भीषण अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागले. मात्र, चौपदरीकरणाचे कवित्व सुरूच आहे. रस्ते अपघात का घडतात, कसे घडतात, त्यातून संबंधित शासनप्रणालीने या विषयात गंभीर दखल घेऊन यावर योग्य उपाय योजले पाहिजेत. रस्त्यावरील भीषण अपघातानंतर मागे उरलेले सत्य आपण पाहतो. मात्र, हे सत्य जबाबदारी का स्वीकारीत नाहीत, असा प्रश्न विचारला जात असला तरी महामार्गावरील अनेक कारणे अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. अनेक नेत्यांनी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्याच्या घोषणा केल्या. मात्र, त्या कमी प्रमाणात येत आहेत. कोकणी माणसाने यापूर्वी रेल्वेचे स्वप्न पाहिले, अथक प्रयत्नांनंतर व सततच्या रेट्यानंतर ते सत्यात उतरले आहे. आता चौपदरीकरणाला सुरूवात झाली आहे. मात्र, हे काम कधी पूर्ण होणार हा प्रश्न ज्याच्या तोंडी कायम आहे. अधिकारी, पत्रकार, समाजसेवक, लोकप्रतिनिधी, मंत्री यांनी यात जातीने लक्ष घालायलाच हवे, असे मत आता व्यक्त होत ्आहे.


पाच वर्षातील अपघात
वर्ष अपघात मृत्यू
2009948123
2010957169
2011968149
2012901160
2013145 66
2014126143


सावर्डे - येथे सन २००९मध्ये पाचजण ठार झाले होते. खेडमध्ये २०१० साली झालेल्या लक्झरी बस व कार अपघातात दहाजणांचा बळी बळी गेला, तर नोव्हेंबर २0१२मध्ये नीता ट्रॅव्हल्सच्या गाडीला सावर्डे येथे झालेल्या अपघातात सहाजण दगावले होते. देवळे अपघातात पाचजण मृत्यूमुखी पडले होते.