शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

ब्रेकअप के बाद! या टिप्सच्या माध्यमातून तुमच्या एक्सला करा जीवनातून 'आऊट'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 11:34 AM

अनेकजण स्वत:ला समजावण्याचा प्रयत्न करत असतात की, सगळं काही ठिक होईल. काहीजण हे सगळं विसरुन पुढे जातात पण काहींना हे जमत नाही. त्यामुळे अशांसाठी आम्ही काही खास टिप्स घेऊन आलो आहोत. 

प्रेमाच्या नात्यात छोटी-छोटी भांडणं फार त्रासदायक नसतात. पण मोठे वाद हे नात्याला वेगळ्याच वळणावर घेऊन जातात. एकदा गमावलेल्या प्रेमात आणि नात्यात पुन्हा तोच गोडवा मिळवणे तसं कठिणच आहे. राग, विश्वासाची कमतरता, संशय घेणे यांसारख्या कारणांमुळे गर्लफ्रेन्ड-बॉयफ्रेन्ड ब्रेकअप करतात. कारण काहीही असो पण काहींसाठी ब्रेकअपनंतर स्वत:ला सांभाळणं सोपं नसतं. एकदा घेतलेल्या निर्णयानंतर अनेकजण स्वत:ला समजावण्याचा प्रयत्न करत असतात की, सगळं काही ठिक होईल. काहीजण हे सगळं विसरुन पुढे जातात पण काहींना हे जमत नाही. त्यामुळे अशांसाठी आम्ही काही खास टिप्स घेऊन आलो आहोत. 

1) ब्लॉक करा

ब्रेकअप तुमच्याकडून झालं असो वा समोरच्या व्यक्तीकडून एकदा जर तुम्ही लाइफमध्ये पुढे जाण्याचा निर्णय घेतला असेल तर मागे वळून पाहणे योग्य नाही. पण तरीही तुमचा भूतकाळ तुम्हाला त्रास देत असेल तर त्याला दूर करण्यासाठी मनाची तयारी केली पाहिजे. सर्वातआधी तुम्ही त्या व्यक्तीला तुमच्या सोशल मीडियाच्या फ्रेन्ड लिस्टमधून काढलं  पाहिजे. असे केल्यास तुम्हा दोघांमध्ये बोलणं होणार नाही, बोलायची इच्छा होणार नाही आणि दु:खं वाढणार नाहीत. 

2) नंबर डिलीट करा

जर सगळं संपलं आहेच तर मग एकमेकांच्या संपर्काच्या पद्धतीही बंद करायला हव्यात. तुमच्या फोनमधून त्यांचा/तिचा नंबर डिलिट करा. मुळात प्रेम कधी विसरता येत नाही. त्या आठवणी सतत येत असतात. अशात तुम्ही पुन्हा त्या व्यक्तीला संपर्क करण्याचा प्रयत्न करु शकता. त्यामुळे फोन नंबर डिलिट करायला हवा. एकदा घेतलेल्या निर्णयावर ठाम राहा. 

3) फोटो, व्हिडीओही करा डिलिट

भलेही तुम्ही सोबत काढलेले फोटो, व्हिडीओ तुम्ही सोबत घालवलेल्या सुंदर क्षणांची आठवण करुन देत असतील, पण ब्रेकअपनंतर आठवणी केवळ दु:खं देतात. काहींसाठी हे सामान्यही असेल पण काही लोकांना हे हॅन्डल करणं फार कठिण जातं. त्यामुळे त्या आठवणी न ठेवलेल्याच बऱ्या.

4) भूतकाळात डोकावणे बंद करा 

जर तुम्हाला खरंच तुमच्या एक्सला विसरायचं असेल तर सर्वातआधी तुमच्या मनाला समजवा आणि आपल्या भूतकाळात डोकावणे बंद करा. काही लोक हे ब्रेकअपनंतरही आपल्या एक्सचे प्रोफाईल आणि एक्सच्या मित्राचे सोशल मीडिया प्रोफाईल चेक करतात. पण याने काहाही मिळणार नाहीये. उलट तुमचा त्रास वाढेल. 

5) स्वत:ला बिझी ठेवा

आपण स्वत:ला जितकं रिकामं ठेवू तितके जास्त तेच तेच विचार तुमच्या मनात येत राहतील. अशात आलेला एकटेपणा तुम्हाला फारच त्रायदायक ठरु शकतो. त्यामुळे स्वत:ला सतत बिझी ठेवा. जेणेकरुन ते विचार तुमच्या मनात येणार नाहीत. लाइफस्टाईलमध्येही बदल केल्यास तुम्हाला फायदा होईल. 

6) मित्रांना भेटा

काही लोक ब्रेकअपनंतर स्वत: एकटं करुन घेतात. ते कुणाशीही बोलत नाहीत. कुणातही मिसळत नाहीत. पण हे फारच चुकीचं आहे. तुम्ही घराबाहेर पडायला हवं. मित्रांना भेटायला हवं. त्यांच्यासोबत फिरायला जायलं हवा. असे केल्यास तुम्ही जुन्या गोष्टींना लवकर मागे सोडू शकाल.

7) नवीन मित्र बनवा

काही लोक हे आपल्या रिलेशनशिपच्या गोष्टी आपल्या मित्रांकडे शेअर करतात. अशात ब्रेकअपनंतर सतत त्या गोष्टी करणे तुम्हाला त्रास देऊ शकतात. त्यामुळे काही लोक आपल्या मित्रांना भेटणेही बंद करतात. अशावेळी नव्या ठिकाणी जा, नवीन मित्र बनवा. याने तुम्हाला नव्या गोष्टींचा अनुभव घेता येईल. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट