शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

नातं तुटायला वेळ लागणार नाही, जर विवाहीत कपल्स करत असतील 'या' चुका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 12:23 PM

विवाहीत कपल्स नकळतपणे अशा चुका करूनआपलं चांगलं नातं बिघडवतात.

सध्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्यामुळे लोक घरीच बसून आहेत. अशात २४ तास त्याच व्यक्तीसोबत राहिल्यामुळे भांडण होण्याची शक्यता असते.  जे कपल्स एकमेकांपासून लांब आहेत. त्यांची भेट न झाल्यामुळे त्यांच्यात प्रेमाची भावना वाढण्याची शक्यता आहे. पण जे विवाहीत आहेत आणि आपल्या पार्टनरसोबत राहत आहेत. 

अशा कपल्समध्ये काही कारणांमुळे वाद होण्याची शक्यता आहे.  कारण लॉकडाऊनमुळे अनेकांची चिडचिड होत आहे. काहीलोक तो राग आपल्या पार्टनरवर काढतात.  इतरवेळी सुद्धा विवाहीत कपल्स चुका करतात आणि घटस्फोटापर्यंत गोष्ट जाते. आज आम्ही तुम्हाला रिलेशन का  तुटतं याची कारणं सांगणार आहोत.

पार्टनरबद्दल लोकांशी चर्चा

अनेकदा पार्टनरचं वागणं खटकल्यानंतर लोक आपल्या मित्र,मैत्रिणींना, नातेवाईकांना आपल्या पार्टनरच्या पटत नसलेल्या गोष्टी सांगतात. जर तुम्ही वाईट गोष्टी किंवा चुका लोकांना सांगत असाल तर तुम्हाला अनेकदा समोरच्या व्यक्तीकडून सुद्धा तशीच प्रतिक्रिया येऊ शकते. त्यामुळे तुमची पार्टनरबद्दल विचार करण्याची पध्दत नकारात्मक होऊ शकते. त्यातून वादाला तोंड फुटतं

एकमेकांच्या चुका  दाखवणं

भांडण होणं यात नवीन असं काहीही नसतं. पण प्रत्येकवेळी तुम्ही मागील चुका सतत पार्टनरला दाखवून देत असाल तर वाद वाढण्याची शक्यता असते. यासाठी आधी घडलेलं तेव्हाच विसरा. परत त्याच गोष्टी बोलून वाद वाढवू नका.

शांत न बसणं

एकावेळी दोघजणं एकमेकांना उलट बोलत भांडत असतील तर वाद वाढण्याची शक्यता असते. त्यासाठी पार्टनर जर भांडत असेल तर तुम्ही शांत रहा. कारण एकच गोष्ट लांब खेचत राहिल्यामुळे तुमची इच्छा नसाताना सुद्धा राग ओढावून घ्यावा लागेल. तसंच कुठल्याही मुलीला किंवा मुलाला आपल्या कुटुंबियातील व्यक्तींना वाईट साईट बोल्लेलं आवडत नाही. तुम्ही पार्टनरसोबत वाद घालत असताना कुटुंबियाना कधीही मध्ये आणू नका. नेहमी सन्मानपूर्वक बोला.

इतरांशी तुलना करू नका

पार्टनरची इतरांशी तुलना करू नका. कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळे प्लस पॉईंट्स असतात. जरी तुम्हाला  पार्टनरची कोणती गोष्ट आवडली नाही तरी तुलना कधीही करू नका. त्यामुळे पार्टनरला  दुःख होण्याची शक्यता आहे. म्हणून आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी इतरांचे उदाहरण कधीही देऊ नका.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपRelationship Tipsरिलेशनशिप