शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

गोड बोलणं, विनम्र वागणं आरोग्यासाठीही फायद्याचं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 11:15 AM

असे म्हटले जाते की, लहान मुलं ही मातीसारखी असतात, त्यांना संवेदनशील करण्यासाठी त्यांचे आई-वडील आणि परिवारातील सदस्य संवेदनशील असणं गरजेचं आहे.

(Image Credit : tripsavvy.com)

असे म्हटले जाते की, लहान मुलं ही मातीसारखी असतात, त्यांना संवेदनशील करण्यासाठी त्यांचे आई-वडील आणि परिवारातील सदस्य संवेदनशील असणं गरजेचं आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये थॅंक्स गिवींग डे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागे संवेदशीलतेचं महत्त्व जाणून घेणे, दुसऱ्यांचे आभार मानने, मदत करे, विनम्र होणे आणि संवेदलशीलता शिकवतात. पण विनम्र असण्याची अनेक फायदे होताना बघायला मिळतात. विनम्र असणे तुमच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. चला जाणून घेऊ विनम्र असण्याचे फायदे.

१) तणावापासून बचाव

विनम्र किंवा संवेदनशील असण्याचा मोठा फायदा म्हणजे तुम्ही स्वत:ला शांत ठेवू शकता आणि या कारणाने तुमचा ताणही वाढत नाही. क्लिनिकल सायकॉलॉजीकल सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित एका अभ्यासात ही बाब स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ज्या लोकांनी वागणूक विनम्र असते, त्यांचे खूपसारे मित्र असतात. सोबतच या लोकांना एकटेपणा आणि तणाव कमी जाणवतो. 

२) मूड राहतो चांगला

लोक म्हणतात की, कर्म करा फळाची चिंता करु नका. पण हेच कर्म तुमच्या कामी येतं. जेव्हा तुम्ही लोकांसोबत चांगलं वागता, त्या बदलत्यात समोरची लोकंही तुमच्याशी चांगलं वागतात. यातून तुम्हाला तुमचं महत्त्व आणि प्रेमाची जाणीव होते. जेव्हा आपण दुसऱ्यांप्रति दया दाखवतो तेव्हा आपला मेंदु एंडोर्फिन हार्मोन्स रिलीज करण्याचा संकेत देतो. या हार्मोन्समुळे आनंदी आणि चांगलं जाणवतं. सोबतच सेरोटेनिन केमिकलचीही निर्मिती होते, जे तुम्हाला संतुष्ट झाल्याची जाणीव करुन देतं.  

३) ब्लड प्रेशरवर नियंत्रण

विनम्र असण्याचा प्रभाव तुमच्या आरोग्यावरही दिसतो. इंटरनॅशनल जर्नल ऑफ सायकोफिजिओलॉजीमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, जे लोक इतरांना सामाजिक रुपाने सपोर्ट करतात, त्यांचं ब्लड प्रेशर इतर लोकांच्या तुलनेत कमी असतं. म्हणजे विनम्र असल्याने तुमचा तणाव वाढत नाही, त्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतो. 

४) जास्त आयुष्य

विनम्र असण्याचा मोठा फायदा असाही आहे की, तुम्ही जास्त आयुष्य जगता. काही शोधांमधून हे सिद्ध झालं आहे की, जे लोक दुसऱ्यांप्रति संवेदनशील असतात ते जास्त आयुष्य जगतात. कारण विनम्र लोकांना आनंदी कसं रहावं याचीही कल्पना अधिक असते, ते फार जास्त तणाव घेत नाहीत. त्यामुळे अर्थातच त्याचं आयुष्य वाढतं. 

५) समाजात प्रतिष्ठा

विनम्र आणि संवेदनशील लोकांना समाजात नेहमीच चांगलं म्हटलं जातं. त्यांना लोकांकडून फार महत्त्व मिळतं. कोणत्याही मोठा निर्णय घेताना त्यांना सल्ला विचारला जातो. तसेच त्यांच्याकडे मदतीसाठी सर्वातआधी धाव घेतली जाते. त्यामुळे त्यांची समाजात एक वेगळीच प्रतिष्ठा तयार होते.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सrelationshipरिलेशनशिप