रत्नागिरी : हवामान खात्याने जिल्ह्यात १५ ते १८ मे या कालावधीत ‘यलो अलर्ट’ दिला आहे. जिल्ह्यात गडगडाट होऊन हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची, वीज चमकण्याची व ताशी ४० ते ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत करण्यात येत आहे.हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या https://mausam.imd.gov.in// या संकेतस्थळावरून घ्या. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कुठल्याही मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्या किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष (02352) 222233 / 226248 किंवा पोलिस हेल्पलाइन क्रमांक 112 वर संपर्क करा.
हवामान विभागाकडून दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले आहे.
..अशी घ्या काळजी
- वीज चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्रोतांपासून अलग करून ठेवावीत.
- दूरध्वनी, भ्रमणध्वनीचा वापर टाळावा.
- वीज चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
- विजेच्या खांबांपासून लांब राहावे. उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये.
- वीज चमकत असताना मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे.
- धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात.
- वीज पडण्याची पूर्वसूचना मिळण्याकरिता आपल्या मोबाइलवर ‘दामिनी ॲप’ डाऊनलोड करून घ्यावे.
- पाऊस पडत असताना वीज चमकत असल्यास नागरिकांनी झाडाखाली उभे राहू नये. पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा.
- अशाप्रसंगी मोबाइलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर राहावे.
आपत्कालीन परिस्थितीत या क्रमांकावर संपर्क कराजिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी ०२३५२- २२६२४८/ २२२२३३.जिल्हा पोलिस नियंत्रण कक्ष ०२३५२-२२२२२२.पोलिस टोल फ्री हेल्पलाइन ११२.जिल्हा शासकीय रुग्णालय ०२३५२-२२२३६३.महावितरण नियंत्रण कक्ष ७८७५७६५०१८
जिल्ह्यातील तहसील कार्यालयेरत्नागिरी ०२३५२- २२३१२७,लांजा ०२३५१- २३००२४,राजापूर ०२३५३- २२२०२७संगमेश्वर ०२३५४- २६००२४चिपळूण ०२३५५- २५२०४४/९६७३२५२०४४खेड ०२३५६- २६३०३१दापोली ०२३५८- २८२०३६गुहागर ०२३५९- २४०२३७मंडणगड ०२३५०- २२५३३६