शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

चार महिन्यांतच गंगा पुन्हा अवतरली, गोमुखातून पाणी प्रवाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 05:47 IST

हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या राजापूरच्या गंगामाईचे रविवारी पहाटे पुन्हा आगमन झाले आहे. अवघ्या चार महिन्यांतच गंगामाई पुन्हा अवतरल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

राजापूर (जि. रत्नागिरी) - हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या राजापूरच्या गंगामाईचे रविवारी पहाटे पुन्हा आगमन झाले आहे. अवघ्या चार महिन्यांतच गंगामाई पुन्हा अवतरल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.गंगामाईच्या आगमनाचे वृत्त समजताच अनेकांनी गंगाक्षेत्री धाव घेत गंगामाईच्या आगमनाची खात्री करून घेतली.साधारणपणे तीन वर्षांनी अवतरणाऱ्या गंगेच्या गेल्या काही वर्षांत आगमन-निर्गमनाच्या वेळेत आमुलाग्र बदल झाला आहे.यापूर्वी गंगेचे ७ मे २०१७ रोजी आगमन झाले होते. ती १९ जूनरोजी अंतर्धान पावली होती. त्याचवर्षी ६ डिसेंबर २०१७ आगमन व २० मार्च २०१८ रोजी अंतर्धान पावली होती.भूगर्भातील बदलांचा परिणामभूगर्भामध्ये झालेल्या बदलाचा हा परिणाम असल्याची चर्चा आहे. भूगर्भात काही घडामोडी घडल्यानंतर गंगेचे आगमन झाल्याच्या घटना यापूर्वी अनेकवेळा घडल्या आहेत. २६ जानेवारी २००१ मध्ये गुजरातमध्ये मोठा भूकंप झाला होता, त्या वेळी गंगेचे आगमन झाले होते. भारतासह अवघ्या जगताला त्सुनामीचा तडाखा बसला होता. त्यावेळीही गंगा अचानक अवतीर्ण झाली होती.

टॅग्स :Rajapurchi Gangaराजापूरची गंगाRatnagiriरत्नागिरी