शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
बॉक्सर नीरजनं विचालं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
5
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
6
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
7
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
8
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
9
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
10
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
11
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
12
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
13
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
14
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
15
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
16
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
17
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
18
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
19
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
20
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

वारकऱ्यांच्या बसला चुकला..अन् जीवाला मुकला!; चिपळूणातील रविंद्र मोरे याचा अपघातात मृत्यू

By संदीप बांद्रे | Updated: July 17, 2024 17:22 IST

रस्त्यावरून जाणाऱ्यांना मदतीची याचना करीत होता. परंतू अर्धातास होऊनही मदत मिळाली नाही

चिपळूण : पाऊले चालती पंढरीची वाट.. सुखी संसाराची सोडूनिया गाठ..अशीच काहीशी परिस्थिती चिपळूणातील एका तरूणाच्या बाबतीत घडली आहे. दरवर्षी आषाढी एकादशी निमीत्त विठूरायाच्या दर्शनासाठी जाणारा तालुक्यातील पेढे मोरेवाडी येथील रविंद्र बाळू मोरे या तरूणावर काळाने घाला घातला. दुचाकी अपघातात आटपाडी दिघंजी येथे मंगळवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला आणि आषाढी वारी पुर्ण न करताच विठूरायाच्या दर्शनाआधीच त्याने जगाचा निरोप घेतला. वारकऱ्यांच्या बसमधून काही कारणात्सव प्रवास चुकला आणि आपल्या जीवाला मुकला.गेल्या दहा वर्षापासून रविंद्र मोरे हे आषाढी वारीसाठी पंढरपूरला जात आहेत. याहीवर्षी त्याने पंढरपूरला जाण्याची तयारी केली होती. पेढे मोरेवाडी येथील वारकऱ्यांनी पंढरपूरला जाण्यासाठी खासगी बस केली होती. त्यामुळे या लोकांनी रविंद्रला विचारले होते. मात्र त्यावेळी त्यांनी तुम्ही पुढे व्हा मी मागावून येतो, असे सांगितले. त्यानंतर त्याने आपला मित्र सुधीर शांताराम निवाते (३०, पेठमाप, गणेशवाडी चिपळूण) याला सोबत घेऊन दुचाकीने पंढरीचीवारी मंगळवारी सकाळी सुरू केली. त्यासाठी त्याने स्वतः गाडी ताब्यात घेऊन सुमारे २०० किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास केला. मात्र त्यानंतर त्याने सुधीरला गाडी चालवण्यास दिली. तेथून ५ किलोमिटर अंतरावर दिघंजी येथे पोहोचताच वॅगनार कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये सुधीर हा गाडीजवळच कोसळला. तर रविंद्र मोरे हा रस्त्याबाहेर फेकला गेला. त्यामुळे त्याचे डोके दगडावर आदळले आणि तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर १५ मिनीटे त्याच्या हालचाली जाणवत होत्या. त्याचवेळी निवाते हा रस्त्यावरून जाणाऱ्यांना मदतीची याचना करीत होता. परंतू अर्धातास होऊनही मदत मिळाली नाही. निवाते याच्या दोन्ही पायांना व हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्यालाही मार्ग दिसत नव्हता. अशातच काही वारकरी व वाहतूकदार तेथे आले आणि त्यांना सांगलीतील शासकीय रूग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत रविंद्र मोरे याची प्राणज्योत मालवली होती. याचवेळी आधी पंढरीला गेलेल्या गावकऱ्यांना अपघाताची माहिती मिळाली आणि त्याना धक्काच बसला. यानंतर पंढरपूरात असलेले गावकरी माघारी फिरले आणि घटनास्थळी आले. त्याचवेळी पेढे  ग्रामस्थ देखील तेथे पोहोचले. रात्री उशिरा रविंद्र मोरे याचा मृतदेह ताब्यात मिळाल्यानंतर बुधवारी सकाळी पेढे येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. निवाते याला अधिक उपचारासाठी मुंबईत नेण्यात आले आहे. रविंद्र मोरे याच्या या अचानक जाण्याने तालुक्यातील वारकऱ्यासह ग्रामस्थांमधून शोक व्यक्त होत आहे.

मोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगररविंद्र मोरे हा उत्तम सुवर्ण कारागिर होता. सोने चांदीचे नक्षीदार दागिणे घडविण्यात त्याचा हातखंडा होता. त्याने २० हून अधिक तरूणांना या व्यवसायात आणून त्यांना कारागिर बनवले. आज ते विविध सुवर्णपेढ्यांमध्ये कौशल्य दाखवत आहेत. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असून घरातील कर्ता पुरूष निघून गेल्याने त्यांच्या संपुर्ण कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघातDeathमृत्यू