शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

वारकऱ्यांच्या बसला चुकला..अन् जीवाला मुकला!; चिपळूणातील रविंद्र मोरे याचा अपघातात मृत्यू

By संदीप बांद्रे | Updated: July 17, 2024 17:22 IST

रस्त्यावरून जाणाऱ्यांना मदतीची याचना करीत होता. परंतू अर्धातास होऊनही मदत मिळाली नाही

चिपळूण : पाऊले चालती पंढरीची वाट.. सुखी संसाराची सोडूनिया गाठ..अशीच काहीशी परिस्थिती चिपळूणातील एका तरूणाच्या बाबतीत घडली आहे. दरवर्षी आषाढी एकादशी निमीत्त विठूरायाच्या दर्शनासाठी जाणारा तालुक्यातील पेढे मोरेवाडी येथील रविंद्र बाळू मोरे या तरूणावर काळाने घाला घातला. दुचाकी अपघातात आटपाडी दिघंजी येथे मंगळवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला आणि आषाढी वारी पुर्ण न करताच विठूरायाच्या दर्शनाआधीच त्याने जगाचा निरोप घेतला. वारकऱ्यांच्या बसमधून काही कारणात्सव प्रवास चुकला आणि आपल्या जीवाला मुकला.गेल्या दहा वर्षापासून रविंद्र मोरे हे आषाढी वारीसाठी पंढरपूरला जात आहेत. याहीवर्षी त्याने पंढरपूरला जाण्याची तयारी केली होती. पेढे मोरेवाडी येथील वारकऱ्यांनी पंढरपूरला जाण्यासाठी खासगी बस केली होती. त्यामुळे या लोकांनी रविंद्रला विचारले होते. मात्र त्यावेळी त्यांनी तुम्ही पुढे व्हा मी मागावून येतो, असे सांगितले. त्यानंतर त्याने आपला मित्र सुधीर शांताराम निवाते (३०, पेठमाप, गणेशवाडी चिपळूण) याला सोबत घेऊन दुचाकीने पंढरीचीवारी मंगळवारी सकाळी सुरू केली. त्यासाठी त्याने स्वतः गाडी ताब्यात घेऊन सुमारे २०० किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास केला. मात्र त्यानंतर त्याने सुधीरला गाडी चालवण्यास दिली. तेथून ५ किलोमिटर अंतरावर दिघंजी येथे पोहोचताच वॅगनार कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये सुधीर हा गाडीजवळच कोसळला. तर रविंद्र मोरे हा रस्त्याबाहेर फेकला गेला. त्यामुळे त्याचे डोके दगडावर आदळले आणि तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर १५ मिनीटे त्याच्या हालचाली जाणवत होत्या. त्याचवेळी निवाते हा रस्त्यावरून जाणाऱ्यांना मदतीची याचना करीत होता. परंतू अर्धातास होऊनही मदत मिळाली नाही. निवाते याच्या दोन्ही पायांना व हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्यालाही मार्ग दिसत नव्हता. अशातच काही वारकरी व वाहतूकदार तेथे आले आणि त्यांना सांगलीतील शासकीय रूग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत रविंद्र मोरे याची प्राणज्योत मालवली होती. याचवेळी आधी पंढरीला गेलेल्या गावकऱ्यांना अपघाताची माहिती मिळाली आणि त्याना धक्काच बसला. यानंतर पंढरपूरात असलेले गावकरी माघारी फिरले आणि घटनास्थळी आले. त्याचवेळी पेढे  ग्रामस्थ देखील तेथे पोहोचले. रात्री उशिरा रविंद्र मोरे याचा मृतदेह ताब्यात मिळाल्यानंतर बुधवारी सकाळी पेढे येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. निवाते याला अधिक उपचारासाठी मुंबईत नेण्यात आले आहे. रविंद्र मोरे याच्या या अचानक जाण्याने तालुक्यातील वारकऱ्यासह ग्रामस्थांमधून शोक व्यक्त होत आहे.

मोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगररविंद्र मोरे हा उत्तम सुवर्ण कारागिर होता. सोने चांदीचे नक्षीदार दागिणे घडविण्यात त्याचा हातखंडा होता. त्याने २० हून अधिक तरूणांना या व्यवसायात आणून त्यांना कारागिर बनवले. आज ते विविध सुवर्णपेढ्यांमध्ये कौशल्य दाखवत आहेत. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असून घरातील कर्ता पुरूष निघून गेल्याने त्यांच्या संपुर्ण कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघातDeathमृत्यू