शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
2
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
3
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?
4
"भाजपा हा महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष"; कोंढरे प्रकरणावर चित्रा वाघ यांचे ट्विट
5
NASA मध्ये किती प्रकारच्या नोकऱ्या असतात? निवड कशी होते? पगार किती मिळतो? जाणून घ्या...
6
ना टेस्ला, ना सुझुकी...! जगात दर दिवशी १०० देशांत ७०० युनिट विकली जातेय ही कार..., भारतातही...
7
Axiom-4 Mission: अंतराळ स्थानकात राहण्यासाठी शुभांशू शुक्लांना किती पैसे मिळणार?
8
Chaturmas 2025: २६ जून ते ६ जुलै घ्या आषाढ तळणीचा आनंद, नंतर मात्र चातुर्मासाचे पाळा बंधन!
9
तीन जणांना फाशी, ७०० अटकेत, युद्धविरामानंतर इराणची मोसादच्या हेरांवर कठोर कारवाई
10
IND vs ENG: कसोटीत टीम इंडियाची खराब कामगिरी, ११ पैकी ७ सामने गमावले; गंभीरच्या प्रशिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह
11
लिस्ट होताच शेअर विकण्यासाठी रांग; IPO नं पहिल्याच दिवशी करवलं नुकसान, ₹२०० वर आली किंमत
12
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...
13
विमान अपघातानंतर मोठा बदल! एन. चंद्रशेखरन आता एअर इंडियाचे 'कॅप्टन'! का घेतला निर्णय?
14
Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
15
भारतासोबतचा पंगा तुर्कस्तानच्या अंगलट आला! एक महिन्यात कोट्यवधीच नुकसान झालं
16
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  
17
नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा
18
मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, असे करायचे काम
19
ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!
20
Guru Purnima 2025: प्रत्येकाने आयुष्यात गुरु का केले पाहिजे? त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान जाणून घ्या!

वारकऱ्यांच्या बसला चुकला..अन् जीवाला मुकला!; चिपळूणातील रविंद्र मोरे याचा अपघातात मृत्यू

By संदीप बांद्रे | Updated: July 17, 2024 17:22 IST

रस्त्यावरून जाणाऱ्यांना मदतीची याचना करीत होता. परंतू अर्धातास होऊनही मदत मिळाली नाही

चिपळूण : पाऊले चालती पंढरीची वाट.. सुखी संसाराची सोडूनिया गाठ..अशीच काहीशी परिस्थिती चिपळूणातील एका तरूणाच्या बाबतीत घडली आहे. दरवर्षी आषाढी एकादशी निमीत्त विठूरायाच्या दर्शनासाठी जाणारा तालुक्यातील पेढे मोरेवाडी येथील रविंद्र बाळू मोरे या तरूणावर काळाने घाला घातला. दुचाकी अपघातात आटपाडी दिघंजी येथे मंगळवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला आणि आषाढी वारी पुर्ण न करताच विठूरायाच्या दर्शनाआधीच त्याने जगाचा निरोप घेतला. वारकऱ्यांच्या बसमधून काही कारणात्सव प्रवास चुकला आणि आपल्या जीवाला मुकला.गेल्या दहा वर्षापासून रविंद्र मोरे हे आषाढी वारीसाठी पंढरपूरला जात आहेत. याहीवर्षी त्याने पंढरपूरला जाण्याची तयारी केली होती. पेढे मोरेवाडी येथील वारकऱ्यांनी पंढरपूरला जाण्यासाठी खासगी बस केली होती. त्यामुळे या लोकांनी रविंद्रला विचारले होते. मात्र त्यावेळी त्यांनी तुम्ही पुढे व्हा मी मागावून येतो, असे सांगितले. त्यानंतर त्याने आपला मित्र सुधीर शांताराम निवाते (३०, पेठमाप, गणेशवाडी चिपळूण) याला सोबत घेऊन दुचाकीने पंढरीचीवारी मंगळवारी सकाळी सुरू केली. त्यासाठी त्याने स्वतः गाडी ताब्यात घेऊन सुमारे २०० किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास केला. मात्र त्यानंतर त्याने सुधीरला गाडी चालवण्यास दिली. तेथून ५ किलोमिटर अंतरावर दिघंजी येथे पोहोचताच वॅगनार कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये सुधीर हा गाडीजवळच कोसळला. तर रविंद्र मोरे हा रस्त्याबाहेर फेकला गेला. त्यामुळे त्याचे डोके दगडावर आदळले आणि तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर १५ मिनीटे त्याच्या हालचाली जाणवत होत्या. त्याचवेळी निवाते हा रस्त्यावरून जाणाऱ्यांना मदतीची याचना करीत होता. परंतू अर्धातास होऊनही मदत मिळाली नाही. निवाते याच्या दोन्ही पायांना व हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्यालाही मार्ग दिसत नव्हता. अशातच काही वारकरी व वाहतूकदार तेथे आले आणि त्यांना सांगलीतील शासकीय रूग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत रविंद्र मोरे याची प्राणज्योत मालवली होती. याचवेळी आधी पंढरीला गेलेल्या गावकऱ्यांना अपघाताची माहिती मिळाली आणि त्याना धक्काच बसला. यानंतर पंढरपूरात असलेले गावकरी माघारी फिरले आणि घटनास्थळी आले. त्याचवेळी पेढे  ग्रामस्थ देखील तेथे पोहोचले. रात्री उशिरा रविंद्र मोरे याचा मृतदेह ताब्यात मिळाल्यानंतर बुधवारी सकाळी पेढे येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. निवाते याला अधिक उपचारासाठी मुंबईत नेण्यात आले आहे. रविंद्र मोरे याच्या या अचानक जाण्याने तालुक्यातील वारकऱ्यासह ग्रामस्थांमधून शोक व्यक्त होत आहे.

मोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगररविंद्र मोरे हा उत्तम सुवर्ण कारागिर होता. सोने चांदीचे नक्षीदार दागिणे घडविण्यात त्याचा हातखंडा होता. त्याने २० हून अधिक तरूणांना या व्यवसायात आणून त्यांना कारागिर बनवले. आज ते विविध सुवर्णपेढ्यांमध्ये कौशल्य दाखवत आहेत. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असून घरातील कर्ता पुरूष निघून गेल्याने त्यांच्या संपुर्ण कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघातDeathमृत्यू