शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
2
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
3
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
4
मोठी बातमी! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते...
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामना संपल्यानंतरच्या एका Video मुळे रंगलीये तुफान चर्चा
6
कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी
7
सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' म्हणून घोषित करण्यात यावे! याचिकेवर सर्वोच्च न्यायालय संतप्त; म्हणाले...
8
Dharashiv Crime: 'तुझा काटाच काढतो', २० वर्षाच्या सुजितची काकानेच जमिनीच्या वादातून केली हत्या
9
"बायडन असो वा ट्रम्प, अमेरिकेचं वागणं सारखंच"; इराणने झिडकारला चर्चेचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?
10
Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....
11
Raja Shivaji Trailer: सगळ्यांच्या छाताडावर पाय रोवून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहतोय आम्ही...; छत्रपतींच्या भूमिकेत रितेशची गर्जना, पाहा ट्रेलर
12
मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार...
13
"व्ही.के.सिंग याने कशी अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केली, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
14
३२ धावांमध्ये टिपले ५ बळी... बांगलादेशच्या नाहिद राणाने न्यूझीलंडच्या फलंदाजांचा उधळला 'डाव'
15
'आम्ही डॉलरऐवजी चिनी युआनमध्ये व्यापार करू', UAE चा अमेरिकेला इशारा; युद्धावरून सुनावले
16
Bhuban Badyakar : 'कच्चा बादाम' फेम भुबन बड्याकरची मोठी फसवणूक; मनोरंजन सृष्टीतील लोकांनी स्वप्नं दाखवली अन्...
17
धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार...
18
महामार्गांवर नो पार्किंग; ढाबे आणि हॉटेल्सवरही बंदी; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल!
19
पश्चिम बंगालच्या निवडणुकीआधी वेगळीच खेळी; दारूच्या दुकानांबद्दल झाला मोठा निर्णय
20
डिजिटल लाइफस्टाईलचा धोका; तरुणांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतोय मोठा परिणाम 
Daily Top 2Weekly Top 5

रांगव ग्रामस्थांनी गाळमुक्त करून नदीचा केला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : अभिनेेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंडेशनने जिल्ह्यातील पाणी चळवळीला गती दिली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : अभिनेेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंडेशनने जिल्ह्यातील पाणी चळवळीला गती दिली आहे. अनेक गावांनी या फाऊंडेशनच्या सहाय्याने आपल्या गावामधील नदी-नाले, ओहोळ यामधील गाळ उपसा करून त्यांचा श्वास मोकळा केला आहे. रांगव (ता. संगमेश्वर) ग्रामस्थांनीही गावातील नदीतील गाळ उपसा करून अनेक वर्षे शेतीला पुरापासून होणारा धोका दूर केला आहे.

रांगव गाव तसे दुर्गमच. सात वाड्या असलेल्या या गावाची लोकसंख्या १,२००च्या घरात आहे. बहुतांशी ग्रामस्थांचे मुख्य उत्पन्न शेतीवर आधारलेले. या गावातील धरणाचे काम काही वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते. साधारणत: १९९४ - ९६ या कालावधीत धरणाचे काम पूर्ण झाले. मात्र, या धरणातील गाळ पूर्णपणे रांगव नदीत आला. त्यामुळे या नदीचे पात्र गाळाने पूर्णपणे भरले. त्यातच त्यावर अनावश्यक वनस्पतीही मोठ्या प्रमाणावर उगवल्याने झाडीही मोठ्या प्रमाणावर वाढली होती. नदीची ऑक्सिजन पातळीही खालावली होती.

त्यामुळे दरवर्षीच पावसाळ्यात या नदीतील गाळामुळे पूर यायचा. या गावातील बहुतांश शेती नदीकिनारी दोन्ही बाजूला असल्याने पुराचे पाणी या शेतांमध्ये घुसून दरवर्षीच नुकसानाचा सामना येथील शेतकऱ्यांना करावा लागत होता. यावर काहीतरी मार्ग काढायला हवा, या विचाराने ग्रामस्थांना अस्वस्थ केले.

यातूनच पर्याय मिळाला तो म्हणजे, रांगव गावाच्या दोन्ही बाजूला असलेल्या नदीतील गाळ उपसा करणे, तिची खोली वाढवणे आणि नदीचे पुनर्जीवन करणे. यात महत्त्वाचे योगदान ठरले ते रांगव गावच्या मुंबईस्थित युवा संघटनेचे. या संघटनेचे. ‘एकच ध्यास, गावचा विकास’ हे ब्रीद असलेल्या मौजे रांगव युवा संघटना (ग्रामस्थसह मुंबई) ही संघटना लगेचच कामाला लागली. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ‘नाम’च्या कार्याबद्दल बरेच ऐकले होते. त्यामुळे दोन वर्षांपासून ही संघटना ‘नाम’च्या संपर्कात होती. अखेर ‘नाम’चे कोकण विभागाचे समन्वयक समीर जानवलकर यांच्या माध्यमातून नामने सहकार्याचा हात देऊ केला. जलतज्ज्ञ अविनाश निवते, अमित गोखले यांनी पाहणी करून आराखडा तयार केला. सुमारे २ लाखांचा निधी उभा करणे गरजेचे होते. परंतु, हे आव्हान श्रीकांत सरमोकादम, आशिष सरमोकादम यांच्यासह ग्रामस्थ चंद्रकांत मिरगल, वीरेश कुंभार, महेश साळवी, तुकाराम कदम, लहू कानल, संतोष धामणस्कर, प्रभू रांगणेकर, सूर्यकांत खताते याचबरोबर मौजे रांगव युवा संघटना (ग्रामस्थसह मुंबई)चे सुधीर मिरगल, थोरवशे, सचिन कुंभार, विजय जाधव, विशाल सनगर, प्रशांत रांगणेकर, सत्यवान कुंभार यांनी निधी उभारण्याचे शिवधनुष्य खांद्यावर घेतले आणि ते यशस्वीही केले.

नाम फाऊंडेशनकडून उपलब्ध झालेल्या मशिनरीच्या सहाय्याने एप्रिल २०२१मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली. साधारणत: ४० दिवसांमध्ये गाळ उपशाचे काम पूर्ण झाले. या कालावधीत अडीच किलाेमीटर अंतरातील गाळ उपसा करण्यात आला. त्यामुळे तब्बल ७० लाख लीटर पाणीसाठा तयार झाला. यंदा जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत अनेक गावांमधील शेतीत पाणी शिरले. मात्र गाळमुक्त झालेल्या नदीमुळे रांगवमधील कुठल्याच शेतात पाणी आले नाही. त्यामुळे एवढ्या वर्षानंतर मिळालेल्या या समाधानामुळे ग्रामस्थांनी नाम फाऊंडेशनला धन्यवाद दिले.