शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यातील १०९ गावांमध्ये पोहोचले घराघरात पाणी; ‘जल जीवन मिशन’अंतर्गत ७६ टक्के काम पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 13:27 IST

रत्नागिरी : ‘जल जीवन मिशन’अंतर्गत जिल्ह्यातील १०० टक्के वैयक्तिक आणि संस्थात्मक नळ जोडणीची प्रक्रिया १०९ गावांमध्ये पूर्ण करण्यात आली ...

रत्नागिरी : ‘जल जीवन मिशन’अंतर्गत जिल्ह्यातील १०० टक्के वैयक्तिक आणि संस्थात्मक नळ जोडणीची प्रक्रिया १०९ गावांमध्ये पूर्ण करण्यात आली आहे, तर जिल्हाभरातील ३ लाख ३४ हजार ३६९ घरगुती नळजोडणी करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात घरगुती स्तरावर नळजोडणी देण्याचे ७६.३६ टक्के पूर्ण झाले आहे.जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला घरगुती स्तरावर नळाद्वारे नियमित, शुद्ध आणि ५५ लिटर प्रति माणसी पाणी उपलब्ध करण्यासाठी केंद्र शासनाने ‘जल जीवन मिशन’ची सुरुवात केली आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावातील १०० टक्के कुटुंबांना नळजोडणी देऊन शाश्वत पाणीपुरवठा करण्यासह गावातील सर्व शाळा, अंगणवाडी, संस्था, सार्वजनिक ठिकाण यांना नळाद्वारे पाणीपुरवठा करावयाचा आहे.

नियमित कामाचा आढावाजिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत ‘जल जीवन मिशन’अंतर्गत जिल्ह्यातील गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून ‘जल जीवन मिशन’अंतर्गत सुरू असलेली कामे वेळेवर पूर्ण व्हावीत, यासाठी नियमितपणे आढावाही घेण्याचे काम सुरू आहे.

९६५ योजना प्रगतिपथावर‘जलजीवन मिशन’अंतर्गत जिल्ह्यात १,४७५ पैकी १,३४१ कामांना कार्यादेश देण्यात आलेली आहे. त्यापैकी ९६५ योजना प्रगतिपथावर आहे, तर २३६ योजनांची कामे १०० टक्के भौतिकदृष्ट्या पूर्ण झाली असून, १०९ गावांना या योजनेंतर्गत १०० टक्के नळजोडणी देण्यात आलेली आहे.

९१० कोटी अपेक्षितमागणी नसलेल्या आणि जीवन प्राधिकरण विभागाकडे वर्ग केल्यामुळे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून १,३५५ योजनांना मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यासाठी सुमारे ९१० कोटी रुपये निधी अपेक्षित आहे.

  • एकूण घरगुती नळजोडण्या - ४,४९,६६७
  • घरगुती नळजोडण्या पूर्ण - ३,३४,३६९
  • काम पूर्ण - ७४.३६ टक्के

एकूण योजना - १,४७५कार्यादेश दिलेल्या योजना- १,३५५प्रगती पथावरील योजना- ९६५भौतिकदृष्ट्या पूर्ण- २३६नळजोडणी पूर्ण योजना- १०९

१०० टक्के नळजोडणी तालुकेतालुका - योजनामंडणगड - १४दापाेली - ३३खेड - १४गुहागर - ०१चिपळूण - १६संगमेश्वर - १२लांजा - ०७रत्नागिरी - ०७राजापूर - ०५

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणी