उद्धव ठाकरेंकडे आता हम तीन इतकेच उरले, रामदास कदम यांनी लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 17:38 IST2025-06-11T17:33:27+5:302025-06-11T17:38:16+5:30

ठाकरे बंधूंची एकत्र येण्याची शक्यता धूसर

Uddhav Thackeray is now left with only three of us Ramdas Kadam's criticism | उद्धव ठाकरेंकडे आता हम तीन इतकेच उरले, रामदास कदम यांनी लगावला टोला

उद्धव ठाकरेंकडे आता हम तीन इतकेच उरले, रामदास कदम यांनी लगावला टोला

खेड : खरा ठाकरे ब्रँड आणि खरी शिवसेना आमच्याकडेच आहे, उद्धव ठाकरेंकडे आता हम तीन इतकेच उरले आहेत, असा टोला माजी मंत्री आणि शिंदेसेनेचे नेते रामदास कदम यांनी खेड येथे पत्रकारांशी बाेलताना लगावला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार नसल्याचे सांगितले.

उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत रामदास कदम म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या मुलाला वरळी मतदारसंघात मदत करणाऱ्या नगरसेवकांना फोडले. मनसेचे सहाही नगरसेवक उद्धव ठाकरे यांनी आपल्याकडे खेचले. अशा लोकांसोबत राज ठाकरे जातील, असे वाटत नाही. 

सध्या राज्यात ठाकरे ब्रँड आणि त्याचे राजकारणातील महत्त्व यावर चर्चा सुरू आहे. मात्र, रामदास कदम यांनी खरा ठाकरे ब्रॅंड आणि खरी शिवसेना आमच्याकडेच असल्याचे सांगत ठाकरे भेटीच्या चर्चांना नवा रंग दिला आहे. यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंची एकत्र येण्याची शक्यता धूसर असल्याचेही सांगितले.

Web Title: Uddhav Thackeray is now left with only three of us Ramdas Kadam's criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.