शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

पर्यटन सुविधा अत्यावश्यक

By admin | Updated: November 22, 2014 00:17 IST

मिनी महाबळेश्वर दापोली : पायाभूत सोयीसुविधांवर भर देणे आवश्यक --रेंगाळलेलेप्रश्न

शिवाजी गोरे -दापोली तालुक्याला मिनीमहाबळेश्वर म्हणून ब्रिटिशांनी मान्यता दिली. महाबळेश्वरनंतर थंड हवेचे ठिकाण म्हणून ब्रिटिशांनी त्या काळी दापोलीची निवड केली होती. ब्रिटिशकालीन मिनीमहाबळेश्वरला पार्यटक आवर्जून भेट देतात. मात्र, येथील पायाभूत सुविधांचा अभाव पर्यटकांची निराशा करणारा आहे. एकीकडे निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेले निसर्गसौंदर्य, स्वच्छ सुुंदर समुद्रकिनारे, प्राचीन मंदिरे, किल्ले, लेण्या, मस्जीद, चर्च, पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. मात्र, याच ठिकाणी पर्यटकांना पायाभूत सुविधांसाठी झगडावे लागत असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे.दापोली तालुका अलिकडे पर्यटन तालुका म्हणून जगाच्या नकाशावर येऊ पाहात आहे. या थंड हवेमुळे महाबळेश्वरनंतर पर्यटकांची दापोलीला पहिली पसंती आहे. कधीकाळी गोव्याकडे जाणारा पर्यटक दापोलीकडे वळू लागला आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा या शहरांच्या मध्यवर्ती असलेल्या दापोलीत पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी हजारो, लाखो पर्यटक दापोलीत येऊ लागले आहेत. गेल्या काही वर्षांपासून केवळ महाराष्ट्र किंवा देशभरच नाही विदेशी पर्यटकही मिनी महाबळेश्वरच्या मोहात पडू लागले आहेत. पर्यटकांकडून दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे. मात्र, शासन पर्यटकांच्या सुविधांबाबत उदासीन आहे. पर्यटनस्थळांकडे जाणारे रस्ते पर्यटकांची डोकेदुखी बनले आहेत. पर्यटनस्थळी पायाभूत सुविधांचा अभाव आहे. मुरुड, कर्दे, लाडघर, तामसतीर्थ, कोळथरे, दाभोळ, पाळंदे, हर्णै, आंजर्ले, केळशी, आडे, पाडले येथे स्वच्छ समुद्रकिनारा आहे. मात्र, या समुद्र किनाऱ्यांकडे जाणारे रस्ते, पिण्याचे पाणी, कपडे बदलण्यासाठी चेजींग रुम, बसण्यासाठी बैठक व्यवस्था, सुलभ शौचालय, सुरक्षाकार्ड, अनुचित प्रकार घडल्यास किंवा काही दुर्घटना घडल्यास तत्काळ मदत मिळण्याची कोणतीही उपाययोजना नाही. त्यामुळे स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे असुरक्षित बनू पाहात आहेत. या किनाऱ्यांबरोबरच प्राचीन वास्तूंकडे जाणारे रस्ते व पायाभूत सुविधांचा अभाव आहे. सर्व सुविधा पर्यटन वाढीसाठी महत्त्वाच्या आहेत. कित्येक वर्षे मागणी करुनही पर्यटनस्थळांच्या विकासाबद्दल शासन उदासीन आहे.धरणाचे प्रश्न रेंगाळल्यामुळे सिंचन व्यवस्था होऊ शकली नाही. तालुक्यात धरणे आहेत. मात्र, कालवे नाहीत. तालुक्यातील शेतीचे शून्य क्षेत्र ओलिताखाली आले आहे. दापोली तालुक्यातील धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन करुन कालव्याद्वारे शेतीला पाणी देण्याची गरज आहे.येथे कृषी विद्यापीठ आहे. मात्र, तेथील संशोधनाचा फायदा घेण्याची स्थानिक शेतकऱ्यांची मानसिकता नाही. परजिल्ह्यातील शेतकरी सहलीच्या माध्यमातून येथे येऊन माहिती घेत आहेत. परंतु स्थानिक शेतकरी आधुनिक शेतीकडे वळायला तयार नाही. पारंपरिक पद्धतीनेच शेती करण्यावर त्यांचा अधिक भर आहे. त्याला मुख्य प्रवाहात आणण्याचे पझयत्न होणे आवश्यक आहे.तालुक्यात फळप्रक्रिया उद्योगाची गरज आहे. आंबा, काजू, करवंद, जांभूळ यापासून कोकण कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी वाईन तयार केली आहे. अशा प्रक्रिया उद्योगांसाठी शतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याची गरज आहे.मासेमारीवर अवलंबून असणाऱ्या उद्योगाला चालना देण्याची गरज आहे. माशांवर प्रक्रिया करून त्यापासून वेगवेगळी उत्पादने घेण्याचे प्रशिक्षण गरजेचे आहे. मासे प्रक्रिया उद्योगांना चालना द्यायला हवी.उपजिल्हा रुग्णालय आहे, परंतु सुविधा नाहीत. रूग्णालयात असणाऱ्या अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे रुग्णांचे हाल होत आहेत. आरोग्य व्यवस्था हा समाजच्यादृष्टीने सर्वात महत्त्वाचा भाग. मात्र त्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे.दापोलीत मिनी एमआयडीसी आहे. मात्र, एमआयसडीसीत उद्योगच नाहीत. रोजगार निर्मितीचे उद्योग औद्योगिक वसाहतीत यायला हवेत. फळप्रक्रिया उद्योगाला कोकणात चांगली संधी आहे. परंतु शीत साखळी नाही. फळ काढणीपासून, फळ मार्केटला जाईपर्यंत त्याची योग्य हाताळणी होणे गरजेचे आहे. फळप्रक्रिया उद्योगाला चालना देण्याची गरज असून, येथील हंगामी फळांवर बारमाही प्रक्रिया होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.चित्त थरारक अनुभव....जिल्ह्यातील समुद्री पर्यटनक्षेत्र म्हणून दापोली तालुक्याला अनन्यसाधारण महत्व आहे. या भागातील निसर्ग, किनारे, मंदिर पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. मात्र, या भागातील पर्यटनस्थळांकडे जाणारे रस्ते अरूंद असल्याने ते रूंद कधी होणार, असा प्रश्न पर्यटकांमधून होत असून, तो प्रलंबितच आहे.दापोली येथे मिनी महाबळेश्वर अनुभवायला येतात पर्यटक.जिल्ह्यातील पर्यटकांची संख्या वाढतेय. मात्र, मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष.रस्त्यांचे जाळे सुधारणार कधी असा प्रश्न. समुद्रकिनाऱ्यावर भटकंती करायला तरूणाईची दापोलीला अधिक पसंती.पर्यटनस्थळांबद्दल अनास्था नको.