शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
3
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
4
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
5
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
6
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
7
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
8
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
9
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
10
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
11
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
12
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
13
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
14
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
15
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
16
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
17
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
18
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
19
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
20
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन हंगामाला जोर, बीचेस गर्दीने फुलले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 2:09 PM

सध्या जिल्ह्यात पर्यटनाला सुगीचे दिवस आले आहेत. जिल्ह्याच्या पर्यटनस्थळांबरोबरच परिसरातील हॉटेल्स, लॉज सध्या ८५ टक्के आरक्षित झाली असून, हा हंगाम १० जूनपर्यंत कायम राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

ठळक मुद्दे रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन हंगामाला जोर, बीचेस गर्दीने फुलले हॉटेल्स, लॉज १० जूनपर्यंत फुल्ल, रेल्वे, बसगाड्यांनाही गर्दी

रत्नागिरी : सध्या जिल्ह्यात पर्यटनाला सुगीचे दिवस आले आहेत. जिल्ह्याच्या पर्यटनस्थळांबरोबरच परिसरातील हॉटेल्स, लॉज सध्या ८५ टक्के आरक्षित झाली असून, हा हंगाम १० जूनपर्यंत कायम राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.कोकणात हिवाळी आणि उन्हाळी हंगामात पर्यटकांचा ओघ वाढतो. विद्यार्थीवर्गाला दिवाळीची सुटी तशी फारशी नसते. मात्र, उन्हाळी सुटी महिना, दीड महिना असल्याने या कालावधीत बहुतांश लोक कुटुंबासह पर्यटनाला निघतात.ह्यमार्च एंडिंगह्णच्या धावपळीतून बाहेर पडलेला नोकरदारवर्गही रिलॅक्स होण्यासाठी आठ - दहा दिवसांची सुटी काढून फिरायला बाहेर पडतो. कोकणातील समुद्र किनारे आणि वनराजी पर्यटकांना हापूस आंब्याच्या ओढीने बहुतांश पर्यटक या कालावधीत कोकणात येतात.सध्या मे महिना सुरु असल्याने रत्नागिरी जिल्हा हाऊसफुल्ल झाला आहे. रत्नागिरीतील भगवतीबंदर, भाट्ये, मांडवी किनारा, पावस येथील स्वामी स्वरूपानंद समाधी, आरे-वारे किनारा, गणपतीपुळे, मुरूड - दापोली, गुहागर, वेळणेश्वर आदी पर्यटनस्थळे सध्या पर्यटकांनी गजबजलेली आहेत. त्यामुळे या भागातील हॉटेल्स, लॉज सध्या पर्यटकांनी भरलेली आहेत. पर्यटकांच्या संख्येबरोबरच वाहनांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे मार्गांवर आता वाहनांची गर्दी दिसू लागली आहे. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत वाहनांची वर्दळ सुरू असते.या कालावधीत एस. टी. गाड्यांबरोबरच कोकण रेल्वेच्या गाड्यांना गर्दी वाढली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी जादा गाड्या सोडूनही त्या गाड्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. गर्दीचा हंगाम पाहता सध्या एस. टी.तून मुंबई प्रवास ४५० रूपयांत होत असताना खासगी गाड्यांना नॉन एसीसाठी ७०० ते ८००, तर एसी गाड्यांना ९०० ते ११००पर्यंत भाडे मोजावे लागत आहे.गेल्या काही वर्षात रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. यंदा तर पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे पर्यटनाचा हा हंगाम अगदी १० ते १५ जूनपर्यंत राहील, असे मत हॉटेल व्यावसायिक तसेच लॉजधारकांकडून व्यक्त होत आहे.

पर्यटन हंगामात यंदा पर्यटकांची लक्षणीय वाढ झाली आहे. पर्यटकांच्या संख्येबरोबरच वाहनांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे मार्गांवर आता वाहनांची गर्दी दिसू लागली आहे.

 

दरवर्षी रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. याहीवर्षी पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने आताच लॉजचे ८५ टक्के आरक्षण फुल्ल झाले आहे. अगदी ८ ते १० जूनपर्यंतचे आरक्षणही आतापासूनच फुल्ल झाले आहे.- दीपक साळवी,हॉटेल ग्रार्इंड इन, रत्नागिरी.

 

टॅग्स :tourismपर्यटनRatnagiriरत्नागिरी