शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

Ratnagiri, Tiware Dam Breach Update : दुर्घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी नेमणार; गिरीश महाजनांची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 11:17 IST

तिवरे धरणाला तडे गेल्याबाबत नागरिकांनी तक्रार केली होती अशी कबुली जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली, लीकेज असताना स्थानिकांना तक्रार दिली होती तरीही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले.

रत्नागिरी - चिपळूणमधील तिवरे धरणाला भगदाड पडल्यामुळे धरण फुटल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 24 जण बेपत्ता झाले असून दुर्घटनेतील सहा जणांचे मृतदेह हाती लागल्याची गिरीश महाजन यांनी माहिती दिली आहे. 

तिवरे धरणाला तडे गेल्याबाबत नागरिकांनी तक्रार केली होती अशी कबुली जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली, लीकेज असताना स्थानिकांना तक्रार दिली होती तरीही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. अधिकाऱ्यांनी दुरुस्ती केली होती असा दावा केला आहे. त्यामुळे या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करणार असल्याची माहिती गिरीश महाजनांनी दिली. रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर हे काही तासात घटनास्थळाची पाहणी करणार आहे. रात्री ही घटना घडली आहे. तिवरे धरणाला तडा गेल्याने ही दुर्घटना घडली. याबाबत स्थानिकांनी याआधीच तक्रार केली होती मात्र त्याकडे ज्यांनी दुर्लक्ष केले त्यांच्यावर योग्य ती कारवाई नक्कीच केली जाईल. मी घटनास्थळासाठी रवाना झालो आहे असं वायकरांनी सांगितले.

 

ताज्या माहितीनुसार घटनेतील 6 जणांचा मृतदेह हाती लागला आहे मात्र परिसरातील अनेक लोक भयभीत अवस्थेत आहेत. पाण्याचा प्रवाह कमी झाला असला तरी या धरणाचं पाणी ज्या नदीत गेलं आहे त्या नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदी काठच्या गावकऱ्यांनाही धोक्याचा इशारा दिला आहे. 

शिवसेना आमदार सदानंद चव्हाण यांनी घटनास्थळाला भेट दिली. मागील चार-सहा महिन्यापासून स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाला याची माहिती दिली होती. मात्र अधिकाऱ्यांनी काम करताना निष्काळजीपणा केला गेला. स्थानिकांनी सांगूनही दुर्लक्ष केले गेले त्यामुळे या घटनेला जबाबदार प्रशासन आहे असा आरोप त्यांनी केला आहे. 

या दुर्घटनेतील बेपत्ता असलेल्या लोकांची नावे

अनंत हरिभाऊ चव्हाण (63)अनिता अनंत चव्हाण (58)रणजित अनंत चव्हाण (15)ऋतुजा अनंत चव्हाण (25)दुर्वा रणजित चव्हाण (1.5)आत्माराम धोंडू चव्हाण (75)लक्ष्मी आत्माराम चव्हाण (72)नंदाराम महादेव चव्हाण (65)पांडुरंग धोंडू चव्हाण (50)रवींद्र तुकाराम चव्हाण (50)रेश्मा रविंद्र चव्हाण (45)दशरथ रविंद्र चव्हाण (20)वैष्णवी रविंद्र चव्हाण (18)अनुसिया सीताराम चव्हाण (70)चंद्रभागा कृष्णा चव्हाण (75)बळीराम कृष्णा चव्हाण (55)शारदा बळीराम चव्हाण (48)संदेश विश्वास धाडवे (18)सुशील विश्वास धाडवे (48)रणजित काजवे (30)राकेश घाणेकर (30) 

 

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनDamधरणRatnagiriरत्नागिरी