शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

साकवदुरुस्तीस दमडीही नाही

By admin | Updated: March 7, 2016 00:48 IST

धोकादायक स्थिती : जिल्ह्यातील गावा-गावातील संपर्क तुटणार!

रहिम दलाल-- रत्नागिरी  जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ६०० साकव मोडकळीस आले असून, ते धोकादायक स्थितीत आहेत. त्यामुळे डोंगराळ भागातील ग्रामस्थांना जीव मुठीत धरुन त्या साकवांवरुन प्रवास करावा लागत आहे. या साकवांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव गेली अडीच वर्षे शासनाकडे पडून आहे. त्यानंतर पुन्हा जिल्हा परिषद बांधकाम विभागाने मोडकळीस आलेल्या साकवांची तालुक्यातून माहिती मागवली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्ता नसलेल्या अडचणीच्या ठिाकणी डोंगरदऱ्या, नदीनाले यावर ग्रामस्थांच्या सोयीसाठी साकव बांधण्यात आले आहेत. जिल्ह्यात हजारो साकव आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या साकवांच्या डागडुजीकडे दुर्लक्ष करण्यात आले. हे साकव मोडकळीस आल्याने जीव हातात घेऊन ग्रामस्थ त्यावरून ये-जा करतात.तीन वर्षांपूर्वी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने मोडकळीस आलेल्या साकवांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव ग्रामपंचायतींकडे मागवले होते. जिल्हाभरातून ६०० साकवांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे दुरुस्तीसाठी आले होते. या साकवांच्या दुरुस्तीसाठी ८ कोटी ७८ लाख रुपयांचा प्रस्ताव जिल्हा परिषद बांधकाम विभागाने तयार केला होता. मात्र, जिल्हा नियोजन विभागाकडे साकवांच्या दुरुस्तीसाठी तरतूदच नसल्याने त्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न निर्माण झाला होता.त्यानंतर अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे एप्रिल, २०१३ मध्ये जिल्हा परिषदेने साकव दुरुस्तीचा प्रस्ताव सादर केला होता. अडीच वर्षे उलटली तरी हा दुरुस्तीचा प्रस्ताव धूळखात पडून आहे. जिल्हा परिषदेने शासनाच्या जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे सादर केला होता. तरीही अद्याप साकव दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. ग्रामीण भागातील ६०० साकव मोडकळीस आलेले आहेत. त्यांना शासनाकडून दमडीही मिळालेली नाही. तरीही जिल्हा परिषद बांधकाम विभाग मोडकळीस आलेल्या साकवांची प्रत्येक तालुक्यातून माहिती गोळा करीत आहे. आधीच नादुरुस्त व मोडकळीस आलेल्या साकवांना शासनाकडून निधी मिळालेला नसताना आणखी नादुरुस्त साकवांची माहिती घेऊन ती शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. मात्र, आधीच मोडकळीस आलेल्या साकवांना दुरुस्तीसाठी अद्याप निधी मिळालेला नाही. त्यानंतर आणखी नादुरुस्त झालेल्या साकवांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी उपलब्ध होईल का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. बांधकाम विभाग : तालुक्यातून मागवली माहितीजिल्ह्यातील दुर्गम गावांमध्ये ओढ्यांवर बांधलेले साकव हाच एकमेव संपर्काचे माध्यम होऊन जाते. त्यामुळे पावसाळ्यात या साकवांना खूपच महत्व येते. जिल्ह्यातील जवळपास ६०० साकव मोडकळीस आल्याने ही यंत्रणाच यंदाच्या पावसात बंद पडण्याची भीती आहे. आता जिल्हा परिषद बांधकाम विभागाने तालुक्यातून या साकवांची माहिती मागवली आहे.तालुका नादुरुस्त साकवमंडणगड २२दापोली ४३खेड ८३चिपळूण ९२गुहागर ४९संगमेश्वर ६०रत्नागिरी ४४लांजा१०६राजापूर ७१एकूण साकव ६००