शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
3
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
4
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
5
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
8
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
9
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
10
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
11
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
12
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
13
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: राजापुरात नदीकाठचा गाळ पुन्हा नदीत जाण्याचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 18:41 IST

राजापूर नगर परिषद प्रशासनाने नाम फाउंडेशन व महसूल प्रशासनाच्या माध्यमातून अर्जुना व कोदवली नदीपात्रातील गाळ उपशाचे काम हाती घेतले होते

राजापूर : पावसाळ्यात शहरातील पूरस्थितीला कारणीभूत ठरणारा अर्जुना-कोदवली नदीपात्रातील गाळ पाटबंधारे विभागातर्फे उपसण्यात आला. मात्र, उपसा केलेला गाळ नदीकाठावर पिचिंग करून ठेवण्यात आला आहे. पिचिंग केलेला हा गाळ पावसाळ्यामध्ये पुन्हा नदीपात्रामध्ये वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.राजापूर शहरातील पुराच्या समस्येवर मात करण्यासाठी राजापूर नगर परिषद प्रशासनाने नाम फाउंडेशन व महसूल प्रशासनाच्या माध्यमातून अर्जुना व कोदवली नदीपात्रातील गाळ उपशाचे काम हाती घेतले होते. मागील दोन वर्षे लोकसहभागातून अर्जुना व कोदवली नद्यांतील गाळ उपसा करण्यात आला होता. त्यानंतर आमदार किरण सामंत यांनी पुढाकार घेत जिल्हा वार्षिक योजनेतून सुमारे ५२ लाखांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून पाटबंधारे विभागातर्फे गाळ उपशाचे काम सुरू आहे.अर्जुना नदीपात्रातील कोंढेतड पूल ते राजीव गांधी क्रीडांगण या दरम्यान ७७,५३५ घनमीटर गाळापैकी १७,८५० घनमीटर, तर कोदवली नदीपात्रातील जवाहरचौक ते गणेश घाट या भागातील ४९,६६५ घनमीटर गाळापैकी २,८५० घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला आहे.तीन पोकलेन, तीन डोजर आणि पाच डंपर यांच्या साहाय्याने हा गाळ उपसा करण्यात आला. मात्र, हा गाळ नदीकिनारीच पिचिंग करून ठेवण्यात आल्याने पावसाळ्यात हा गाळ पुन्हा नदीत जाण्याचा धाेका आहे. त्यामुळे पुन्हा नदीचे पात्र गाळाने भरण्याची शक्यता आहे.अर्जुना-कोदवली नदीपात्रातील एक लाख २७ हजार २०० घनमीटरपैकी २०,७०० घनमीटर म्हणजे सुमारे १६ टक्के गाळाचा उपसा करण्यात आला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRajapurराजापुरriverनदी