शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

VidhanSabha Election 2024: रत्नागिरी जिल्ह्यात ऐन दिवाळीत राजकीय शिमगा रंगणार

By मनोज मुळ्ये | Updated: October 16, 2024 16:35 IST

भाजपची आक्रमक भूमिका किती टिकणार?

मनोज मुळ्येरत्नागिरी : बदलत्या राजकारणामुळे सर्वाधिक लक्ष लागून राहिलेली विधानसभा निवडणूक अखेर जाहीर झाली आणि ऐन दिवाळीत जोरदार राजकीय शिमगा होणार असल्याचे स्पष्ट झाले. कागदावर ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी दिसत असली तरी रत्नागिरी जिल्ह्यात मात्र ही लढाई दोन्ही शिवसेनांमधील वर्चस्वाची लढाई ठरणार आहे. जिल्ह्यात शिंदेसेना मोठी की उद्धवसेना मोठी याचाच निवाडा या निवडणुकीतून होणार आहे.गेल्या पाच वर्षात राजकारण सतत बदलत राहिले. राजकीय पक्षांचे मित्र बदलले आणि नवनवी समीकरणे उदयास आली. रत्नागिरी जिल्ह्यावर, कोकणावर एकहाती वर्चस्व असलेल्या शिवसेनेचे दोन भाग झाले. त्यामुळे आता कोणती शिवसेना अधिक ताकदवान हे या निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे.जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये शिंदेसेनेचे दोन, उद्धवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचा एक असे पाच आमदार आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात महायुतीचे वर्चस्व आहे. हे वर्चस्व कायम राहणार की महाविकास आघाडी त्याला छेद देणार, हे येणारा काळच ठरवेल. अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीने जागा वाटप जाहीर केले नसले तरी विद्यमान आमदार पुन्हा रिंगणात असतील, हे निश्चित आहे.यांची प्रतिष्ठा पणालाआमदार उदय सामंतराज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून उदय सामंत यांच्याकडे पूर्ण जिल्ह्याची जबाबदारी आहे. कोट्यवधी रुपयांची कामे ही त्यांची प्रमुख जमेची बाजू आहे. त्याचवेळी भाजपला सोबत घेणे ही कसोटी ठरणार आहे.आमदार राजन साळवीराजापूर मतदारसंघात उद्धवसेनेची ताकद लोकसभा मतदारसंघात दिसली असली तरी शिंदेसेनेने उद्धवसेनेतील अनेकांना आपल्याकडे वळवले आहे. त्यात या जागेची अपेक्षा असलेल्या काँग्रेसची भूमिका काय असेल, हेही गुलदस्त्यात आहे.आमदार शेखर निकमजिल्ह्यातील एकमेव राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या शेखर निकम यांनी केलेली कामे ही मोठी जमेची बाजू आहे. मात्र राष्ट्रवादीने केलेली तयारी आणि या मतदारसंघात महायुतीतील अन्य दोन्ही पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.आमदार भास्कर जाधवस्वत:चा मतदारसंघ नसतानाही भास्कर जाधव यांनी सलग तीनवेळा गुहागरमध्ये विजय मिळवला आहे. त्यांच्याविरुद्ध शिंदेसेना असेल की भाजप हे अजून अधिकृत जाहीर झालेले नाही. तरीही शिवसेनेतील फूट त्यांची कसाेटी पाहू शकते.आमदार योगेश कदमदापोली, मंडणगडमध्ये विकास कामांमधून छाप पाडणा या योगेश कदम यांचे मित्रपक्षातील भाजपशी असलेले शीतयुद्ध आता उघड झाले आहे. दोन्ही बाजूने झालेले आरोप प्रत्यारोप पाहता निवडणुकीत त्याचे पडसाद उमटणार, हे नक्की आहे.

रत्नागिरीत उद्धवसेनेचा उमेदवार नक्की कोण?निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला तरी रत्नागिरीमधील उद्धवसेनेचा उमेदवार अजून जाहीर झालेला नाही. गेल्या वर्ष-दीड वर्षात चर्चा बरीच झाली. अनेकांची नावे पुढे आली. पण अजूनही त्याला अंतिम स्वरुप नाही. त्यामुळे पक्षातील व्यक्तीलाच उमेदवारी देणार की अन्य पक्षातील उमेदवाराला उद्धवसेनेत घेऊन उमेदवारी देणार, याबाबतच्या शंकेला वाव निर्माण झाला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे.

काँग्रेसच्या वाट्याला मतदारसंघ नाही?काँग्रेसच्या रत्नागिरीतील एका बैठकीत राजापूर, रत्नागिरी आणि चिपळूण या तीन मतदारसंघांची मागणी करण्यात आली होती. मात्र आतापर्यंत सुरू असलेल्या चर्चेनुसार जिल्ह्यातील एकही मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला येण्याची शक्यता नाही. जिल्ह्यात पाच मतदारसंघांपैकी चार मतदारसंघ उद्धवसेनेला तर एक राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाला जाण्याची शक्यता आहे.भाजपची आक्रमक भूमिका किती टिकणार?लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात भाजपपेक्षा उद्धवसेनेला मते अधिक मिळाली. तेव्हापासून भाजपने शिंदेसेनेविरोधात काहीशी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातही रत्नागिरी आणि दापोली या दोन ठिकाणी जेथे शिंदेसेनेचे आमदार आहेत, तेथे भाजप शिंदेसेनेविरुद्ध आक्रमक असल्याचे दिसत आहे. ही भूमिका प्रचारादरम्यानही कायम राहणार की वरिष्ठ यात लक्ष घालणार, यावर पुढील गणिते अवलंबून आहेत.

राजकारणाची होणार फेरमांडणी

  • २०१९ साली विधानसभा निवडणूक झाली, तेव्हा शिवसेना - भाजप आणि राष्ट्रवादी - काँग्रेस अशी पारंपरिक समीकरणे होती.
  • निवडणूक निकालानंतर शिवसेनेने भाजपशी नाते तोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी केली. त्यावेळी जिल्ह्यातील सर्व आमदार सत्ताधारी महाविकास आघाडीतील होते.
  • २०२१ साली एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार सोबत घेत भाजपशी युती केली. त्यानंतर राष्ट्रवादीचे अजित पवार हेही युतीमध्ये दाखल झाले आणि ती महायुती झाली.
  • या बदलानंतर जिल्ह्यातील तीन आमदार सत्तेत आणि दोन विरोधी पक्षात असे चित्र झाले. तेही आता बदलण्याची शक्यता आहे.

संभाव्य लढतीरत्नागिरी : उदय सामंत (शिंदेसेना) विरुद्ध उद्धवसेना (उमेदवार निश्चित नाही.)राजापूर : राजन साळवी (उद्धवसेना) विरुद्ध किरण सामंत (शिंदेसेना)चिपळूण : शेखर निकम (राष्ट्रवादी अजित पवार) विरुद्ध प्रशांत यादव (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार)गुहागर : भास्कर जाधव (उद्धवसेना) विरुद्ध शिंदेसेना (उमेदवार निश्चित नाही.)दापोली : योगेश कदम (शिंदेसेना) विरुद्ध संजय कदम (उद्धवसेना)

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ratnagiri-acरत्नागिरीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीUday Samantउदय सामंतBhaskar Jadhavभास्कर जाधवRajan Salviराजन साळवीYogesh Kadamयोगेश कदमthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024