शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
2
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
3
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
4
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
5
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
6
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
7
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
8
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात
9
Operation Sindhu: इराण, इस्रायलमधून आणखी १,१०० भारतीय मायदेशात, विमान कंपन्यांची मध्य-पूर्वेतील उड्डाणे थांबली
10
आरोग्यसेवेचे मोल शून्य; राज्यातील ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार थकला
11
एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
12
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
13
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
14
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
15
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
16
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
17
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
18
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
19
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
20
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट

दर्जेदार, गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याकडे शिक्षकांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 16:46 IST

शैक्षणिक अध्यापनाबरोबर विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांची माहिती अवगत व्हावी, यासाठी विविध उपक्रमात सहभागी करून घेत विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक करीत आहेत. शिक्षणाबरोबर कला, क्रीडा क्षेत्रातही शाळेचे विद्यार्थी नैपुण्य प्राप्त करीत आहेत.

ठळक मुद्देदर्जेदार, गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याकडे शिक्षकांचा कल जिल्हा परिषद केंद्रशाळा झरेवाडी, ग्रामस्थ व पालकांचा सहभाग

मेहरून नाकाडेरत्नागिरी : शैक्षणिक अध्यापनाबरोबर विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांची माहिती अवगत व्हावी, यासाठी विविध उपक्रमात सहभागी करून घेत विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक करीत आहेत. शिक्षणाबरोबर कला, क्रीडा क्षेत्रातही शाळेचे विद्यार्थी नैपुण्य प्राप्त करीत आहेत.बाल आनंद मेळाव्यासारख्या उपक्रमातून इंग्रजी कविता पाठांतर स्पर्धा, कार्यानुभवांतर्गत टाकाऊतून टिकाऊ साहित्य निर्मिती, अभिवाचन कार्यक्रम, बागबगीचा संगोपन, नाविन्यपूर्ण प्रयोगशाळेच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लावणे, विविध व्यावसायिकांच्या मुलाखतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे संभाषण कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न ग्रामीण भागातील शाळेत केला जातो.विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने शालेय परिसरात भाजीपाला लागवड केली असून, त्याचा वापर पोषण आहारासाठी केला जात आहे. वनभोजन, शैक्षणिक सहलीबरोबर विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, यासाठी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे.शाळेचे शिक्षक राजेश गोसावी यांनी लेखन, दिग्दर्शन केलेली एकांकिका ह्यसंस्कारह्ण विद्यार्थ्यांनी कणकवली येथे बॅ. नाथ पै राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत सादर करून यश संपादन केले. शालेय विद्यार्थिनी सिध्दी गोताड हिला अभिनयाचे पारितोषिकही मिळाले आहे. याशिवाय दिव्यांग मुलांच्या मदतीसाठी झालेल्या कला आरोग्य बालनाट्य महोत्सवातही एकांकिकेचे सादरीकरण करण्यात आले.

बाल संस्कार नाट्य अकादमी, पुणे आयोजित बालनाट्य स्पर्धेत अमन गोताड याने प्रथम श्रेणी मिळवली. याशिवाय नेहरू युवा संस्कार केंद्रातर्फे आयोजित वक्तृत्व, चित्रकला, बुध्दिमत्ता, निबंध तसेच समूहगीत स्पर्धेतही शाळेच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. प्रत्येक विद्यार्थी घडविण्यावर शिक्षकांचा भर आहे.

विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. वक्तृत्व स्पर्धा असो वा एकांकिका यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला अधिक बळकटी प्राप्त होत आहे.- अ‍ॅड. अवधूत कळंबटे, पालक

एक विद्यार्थी केंद्रित न करता, शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती व्हावी, यासाठी शाळेचे शिक्षक परिश्रम घेत आहेत. शालेय तसेच शाळाबाह्य स्पर्धा परीक्षेस विद्यार्थ्यांना प्रवृत्त केले जात आहे, विद्यार्थीही यश मिळवित आहेत.- डॉ. अस्मिता मजगावकर, केंद्रप्रमुख

टॅग्स :SchoolशाळाRatnagiriरत्नागिरी