शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

दर्जेदार, गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याकडे शिक्षकांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 16:46 IST

शैक्षणिक अध्यापनाबरोबर विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांची माहिती अवगत व्हावी, यासाठी विविध उपक्रमात सहभागी करून घेत विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक करीत आहेत. शिक्षणाबरोबर कला, क्रीडा क्षेत्रातही शाळेचे विद्यार्थी नैपुण्य प्राप्त करीत आहेत.

ठळक मुद्देदर्जेदार, गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याकडे शिक्षकांचा कल जिल्हा परिषद केंद्रशाळा झरेवाडी, ग्रामस्थ व पालकांचा सहभाग

मेहरून नाकाडेरत्नागिरी : शैक्षणिक अध्यापनाबरोबर विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांची माहिती अवगत व्हावी, यासाठी विविध उपक्रमात सहभागी करून घेत विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक करीत आहेत. शिक्षणाबरोबर कला, क्रीडा क्षेत्रातही शाळेचे विद्यार्थी नैपुण्य प्राप्त करीत आहेत.बाल आनंद मेळाव्यासारख्या उपक्रमातून इंग्रजी कविता पाठांतर स्पर्धा, कार्यानुभवांतर्गत टाकाऊतून टिकाऊ साहित्य निर्मिती, अभिवाचन कार्यक्रम, बागबगीचा संगोपन, नाविन्यपूर्ण प्रयोगशाळेच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लावणे, विविध व्यावसायिकांच्या मुलाखतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे संभाषण कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न ग्रामीण भागातील शाळेत केला जातो.विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने शालेय परिसरात भाजीपाला लागवड केली असून, त्याचा वापर पोषण आहारासाठी केला जात आहे. वनभोजन, शैक्षणिक सहलीबरोबर विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, यासाठी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे.शाळेचे शिक्षक राजेश गोसावी यांनी लेखन, दिग्दर्शन केलेली एकांकिका ह्यसंस्कारह्ण विद्यार्थ्यांनी कणकवली येथे बॅ. नाथ पै राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत सादर करून यश संपादन केले. शालेय विद्यार्थिनी सिध्दी गोताड हिला अभिनयाचे पारितोषिकही मिळाले आहे. याशिवाय दिव्यांग मुलांच्या मदतीसाठी झालेल्या कला आरोग्य बालनाट्य महोत्सवातही एकांकिकेचे सादरीकरण करण्यात आले.

बाल संस्कार नाट्य अकादमी, पुणे आयोजित बालनाट्य स्पर्धेत अमन गोताड याने प्रथम श्रेणी मिळवली. याशिवाय नेहरू युवा संस्कार केंद्रातर्फे आयोजित वक्तृत्व, चित्रकला, बुध्दिमत्ता, निबंध तसेच समूहगीत स्पर्धेतही शाळेच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. प्रत्येक विद्यार्थी घडविण्यावर शिक्षकांचा भर आहे.

विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. वक्तृत्व स्पर्धा असो वा एकांकिका यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला अधिक बळकटी प्राप्त होत आहे.- अ‍ॅड. अवधूत कळंबटे, पालक

एक विद्यार्थी केंद्रित न करता, शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती व्हावी, यासाठी शाळेचे शिक्षक परिश्रम घेत आहेत. शालेय तसेच शाळाबाह्य स्पर्धा परीक्षेस विद्यार्थ्यांना प्रवृत्त केले जात आहे, विद्यार्थीही यश मिळवित आहेत.- डॉ. अस्मिता मजगावकर, केंद्रप्रमुख

टॅग्स :SchoolशाळाRatnagiriरत्नागिरी