शहरं
Join us  
Trending Stories
1
IndiGoच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार, सरकारसोबतच्या बैठकीत CEO हात जोडताना दिसले...
2
"इंदिरा गांधी यांनी मतचोरी करूनच रायबरेली जिंकली..."; भाजपा खासदाराचे राहुल गांधींना उत्तर
3
IND vs SA T20I : कटकच्या मैदानात हार्दिक पांड्याची कडक खेळी; सिक्सरच्या 'सेंच्युरी'सह साजरी केली 'फिफ्टी'
4
अनंत अंबानी यांचा आंतरराष्ट्रीय सन्मान! मिळाला प्रतिष्ठेचा 'ग्लोबल ह्यूमॅनिटेरियन' पुरस्कार
5
“उद्धव ठाकरेंच्या हट्टामुळे मला बाहेर काढले, ‘त्या’ भाजपा नेत्याला माफी नाही”: किरीट सोमय्या
6
राज्यात थंडीचा कडाका वाढला! अहिल्यानगरमध्ये ७. ४ सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद
7
"विरोधी पक्षनेते असण्याचा अर्थ असा नाही की..."; राहुल गांधींना संसदेतच ओम बिर्लांनी सुनावलं
8
IND vs SL WT20I :भारतीय संघाची घोषणा; स्मृती मानधना खेळणार; 'या' दोघींना मिळालं मोठं सरप्राइज
9
RSS ला देशातील सर्व संस्थांवर ताबा मिळवायचा आहे; लोकसभेत राहुल गांधी कडाडले...
10
“आम्हाला EVM मशीन एकदा पाहायला हवे”; राहुल गांधींची लोकसभेत मागणी, मतचोरीचा मुद्दा उपस्थित
11
"भाजप काय करतंय हे त्यांनी जगाला दाखवून दिलं"; सुप्रिया सुळेंनी केलं निलेश राणेंचे कौतुक
12
कला केंद्राच्या प्रेमकथेचा भयावह शेवट; नर्तकीसमोरच पत्नीचा फोन आल्याने वाद, तरुणाने स्वतःला संपवले
13
प्रेरणादायी! वडील गमावल्याचं दुःख पण आईची खंबीर साथ; IAS होऊन पूर्ण केलं कुटुंबाचं मोठं स्वप्न
14
हृदयद्रावक! आंघोळीला गेला, जीव गमावला; गीझर बनला सायलेंट किलर, तरुणासोबत घडलं आक्रित
15
Jara Hatke: फुटक्या कवडीची खरी किंमत माहितीय? प्राचीन चलनव्यवस्थेशी आहे थेट संबंध 
16
"हे खूप घाणेरडं... जरा मर्यादा पाळा"; माहिकाच्या Viral Video वरून हार्दिक पांड्या संतापला
17
‘वंदे मातरम्’चे दोन तुकडे केले नसते तर देशाची फाळणी झाली नसती, अमित शाहांची नेहरूंवर टीका 
18
Puja Rituals: उदबत्तीची रक्षा, जळलेल्या वाती तुम्ही कचऱ्यात तर फेकून देत नाही ना? 
19
महिला पडली तरुणाच्या प्रेमात, बकरी चरायला नेण्याच्या बहाण्याने झाली घरातून पसार, त्यानंतर...
20
गोव्यातील 'त्या' क्लब मालकांची अवैध मालमत्ता पाडण्याचे आदेश; कारवाई टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणला होता दबाव
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल साडेदहा कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 14:13 IST

घरे, गोठे, दुकाने, सार्वजनिक मालमत्ता बाधित; तीन बळी, १२ जनावरांचा मृत्यू

रत्नागिरी : मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून सुरू झालेल्या वादळी पावसाने जिल्ह्यात मालमत्ता व शेतीचे नुकसान केले. त्याचप्रमाणे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्याच्या शेवटी सुरू झालेल्या वादळी पावसानेही जिल्ह्यातील घरे, गोठे, जनावरे आणि सार्वजनिक मालमत्ता बाधित झाल्या आहेत. ११९.७३ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. गेल्या साडेतीन महिन्यांत जिल्ह्यात सुमारे १० कोटी ६३ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, तिघांचा बळी गेला आहे. १२ जनावरे दगावली आहेत. यंदा २० मेपासून जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे मे महिन्यातच पडझडीला प्रारंभ झाला होता. जून आणि जुलै महिन्यात पाऊस कमी होता. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून, साधारणत: १३ ऑगस्टपासून पुन्हा वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला आहे.त्यामुळे जून आणि जुलै महिन्यात पाऊस कमी पडला असला तरी मे महिन्यात आणि ऑगस्ट महिन्यात सुरू झालेल्या पावसाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. आताही पावसाचे सातत्य कायम आहे. जोडीला वाऱ्याचा जोर असल्याने घरे, गोठे यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून अजूनही वर्तविली जात आहे.गेल्या साडेतीन महिन्यांत पडलेल्या पावसाने जिल्ह्यात घर, गोठे, दुकाने आणि सार्वजनिक मालमत्तांचे आणि शेतीचे नुकसान केले आहे. ३ व्यक्तींचा बळी गेला. ९ जण जखमी, तर १२ जनावरे दगावली आहेत. तसेच ३९२ शेतकऱ्यांच्या ११९.७३ हेक्टरवरील शेतीचे १० लाख ४९ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आतापर्यंतच्या प्राथमिक अंदाजानुसार ही रक्कम १० कोटी ६२ लाख ५४ हजार ७७९ इतकी आहे.

जिल्ह्यात साडेतीन महिन्यांत झालेले नुकसान

  • बाधित घरे (४३८) : ३,५१,५५,८३३
  • बाधित गोठे (९४) : ४१,७१,८२६
  • सार्वजनिक मालमत्ता (१३५)
  • शाळा (१५) : २७,४०,७००
  • अंगणवाडी (३) : ४,६८,८२५
  • रस्ते व संरक्षक भिंत : (३९) : २,७६,११,०००
  • पूल व मोऱ्या (६) : ६,६०,०००
  • साकव (६) : १,४५,५०,०००
  • इमारती (९) : ५,७२,७५०
  • विहिरी (४) : ७ ५०,०००
  • महावितरण (५६) : १८,६१,०००
  • पोल (५२) : १२,५१,०००
  • रोहित्र (४) : ६,१०,०००
  • शेती (११९.७३ हेक्टर) : १०,४९,०००