शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

शिवसेनेच्या नात्यात दरार, भाजप-मनसे जोडीदार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 7:26 PM

Bjp mns ratnagirinews- शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊन महाविकास आघाडी करण्याची शक्यता असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येण्याची शक्यता आहे. या दोन्ही पक्षांचे विरोधक सारखेच असल्याने हे नवीन मेतकूट जुळण्याची तयारी सुरू झाली आहे.

ठळक मुद्देशिवसेनेच्या नात्यात दरार, भाजप-मनसे जोडीदार ? ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मेतकूट जमण्याची शक्यता

मनोज मुळ्येरत्नागिरी : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊन महाविकास आघाडी करण्याची शक्यता असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येण्याची शक्यता आहे. या दोन्ही पक्षांचे विरोधक सारखेच असल्याने हे नवीन मेतकूट जुळण्याची तयारी सुरू झाली आहे.रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेची ताकद सर्वात मोठी आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये शिवसेनेचाच वाटा खूप मोठा आहे. जिल्ह्यात पाचपैकी चार आमदार शिवसेनेचे आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीला सामोरे जाताना शिवसेनेचे पारडे जड आहे. एक आमदार राष्ट्रवादीचा असल्याने राष्ट्रवादीकडेही चांगली ताकद आहे.

भाजपची पंचायत समितीत मर्यादित ताकद आहे. काँग्रेस खूप क्षीण झाली आहे आणि मनसेला अजून राजकीय पातळीवर अपवादात्मक यश मिळाले आहे. या एकूणच राजकीय बलाबलामध्ये शिवसेनेची ताकद मोठी आहे.राज्याच्या सत्तेत शिवसेनेसोबत राष्ट्रवादी आणि काँग्रेसही सहभागी आहे. त्यामुळे जिल्ह्यातही हीच महाविकास आघाडी व्हावी, असे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला वाटते. अशी महाविकास आघाडी करण्याबाबत अजून या पक्षांपैकी कोणीही पुढाकार घेतलेला नाही. मात्र, ही महाविकास आघाडी कोणत्याही क्षणी होऊ शकेल, अशी शक्यता आहे.

अशी आघाडी झाली तर ती भाजप विरोधातच उभी राहील. त्यामुळे भाजपने आतापासूनच जोडीदार म्हणून मनसेकडे हात पुढे केला असल्याचे समजते. जिल्ह्यात ४७९ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. त्यात शक्य तेथे एकमेकांना मदत करुन निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. सर्वच ठिकाणी उमेदवार उभे करण्याचा अट्टाहास करण्यापेक्षा जिथे आशा आहे, अशा ठिकाणी जोर दिला जाण्याची शक्यता आहे.पटवर्धन-चव्हाण मैत्रीभाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्यामध्ये आधीपासूनच मैत्री आहे. त्यामुळे ही मैत्री आता ग्रामपंचायत निवडणुकीत दृढ होण्याची दाट शक्यता आहे. आतापर्यंत कधीही न झालेली ही युती आता होण्याची तयारी सुरू झाली आहे.काहीही घडू शकतंमनसेसोबत युती होणार आहे का, तशी चर्चा सुरू झाली असल्याची माहिती कितपत सत्य आहे, याबाबत बोलताना ह्यराजकारणात कधीही, काहीही घडू शकते, एवढ्या मोजक्याच शब्दात ॲड. दीपक पटवर्धन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. याबाबत येत्या काही दिवसातच सगळे चित्र स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाMNSमनसेRatnagiriरत्नागिरीgram panchayatग्राम पंचायत