शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेने वाशिष्ठी पुलावरून फुकटचे श्रेय घेऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:36 IST

भाजप शहराध्यक्ष आशिष खातू यांनी लगावला टोला लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाशिष्ठी नदीवरील ...

भाजप शहराध्यक्ष आशिष खातू यांनी लगावला टोला

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाशिष्ठी नदीवरील नवीन पूल सुरू व्हावा, ही समस्त चिपळूणकर व कोकणवासीयांची मागणी होती. गणेशोत्सवापूर्वी या पुलावरील वाहतूक सुरू झाली, ही आनंदाची बाब आहे. मात्र, यामध्ये शिवसेनेने पुढाकार घेत भाजपला टाळत श्रेयवादाचे राजकारण केले आहे, असे मत भाजपचे शहराध्यक्ष आशिष खातू यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

गेल्या चार वर्षांपासून प्रतीक्षा लागून राहिलेल्या वाशिष्ठी पुलाचे खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. चिपळुणात चौपदरीकरणातील वाशिष्ठी नव्या पुलाचे काही वर्षांपासून काम रखडले होते. त्यातच जुना पूल धोकादायक बनल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे घाईघाईने या पुलाचे अनौपचारिक उद्घाटन शिवसेना खासदार विनायक राऊत, आमदार शेखर निकम, भास्कर जाधव, राष्ट्रवादी तसेच काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मात्र, केंद्रात सत्ता असलेले भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी अनुपस्थित होते.

याबाबत भाजपचे तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर म्हणाले की, सकाळी शिवसेनेचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष बाळा कदम यांनी संपर्क साधून साडेदहा वाजता बहादूरशेख नाका येथील नव्या पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमाला येण्याचे अचानक निमंत्रण दिले. मात्र, आपण कामानिमित्त शहराबाहेर असल्याने तत्काळ त्याठिकाणी पोहोचू शकलो नाही. दि. ४ सप्टेंबरला अनौपचारिक उद्घाटन करण्याचे सेना पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी ठरवले होते. त्याआधी २ सप्टेंबरला उद्घाटन करण्याचे त्यांचे नियोजन होते. मात्र, काही कारणास्तव ते लांबणीवर गेले. भाजपला टाळून त्यांना उद्घाटन करायचे होते, त्यामुळेच आयत्यावेळी आम्हाला उद्घाटन कार्यक्रमाचा निरोप देण्यात आला.

शहराध्यक्ष आशिष खातू म्हणाले की, वाशिष्ठी नदीवरील ब्रिटीशकालीन जुना पूल धोकादायक झाल्याने नवीन पुलावरील वाहतूक तातडीने सुरू होण्याची आवश्यकता होती. गणेशोत्सवापूर्वी हा पूल सार्वजनिक वाहतुकीसाठी सुरू झाला ही चांगली गोष्ट आहे. मात्र, इतक्या घाईगडबडीत श्रेयवादासाठी पुढाकार घेऊन उद्घाटन करण्याची शिवसेनेला गरज नव्हती. मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग त्वरित पूर्ण व्हावा, यासाठी भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मोठ्या प्रमाणात मेहनत घेत आहेत. वाशिष्ठीच्या नवीन पुलासाठीही गडकरी यांचे मोठे योगदान आहे, हे जनतेलाही ज्ञात आहे. त्यामुळे शिवसेनेने कितीही श्रेयवाद करण्याचा प्रयत्न केला तरी शिवसेनेने या पुलावरून फुकटचे श्रेय घेऊ नये, असा टोलाही खातू यांनी लगावला.