शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोनाचा शिमगा; महिनाभरात रुग्णसंख्येने ओलांडला तीन हजारांचा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:28 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात शिमगोत्सवाला सुरुवात होताच कोरोनाचे हाॅटस्पाॅट असलेल्या मुंबईतून आलेल्या चाकरमान्यांमुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत जलद गतीने वाढ झाली. ...

रत्नागिरी : जिल्ह्यात शिमगोत्सवाला सुरुवात होताच कोरोनाचे हाॅटस्पाॅट असलेल्या मुंबईतून आलेल्या चाकरमान्यांमुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत जलद गतीने वाढ झाली. १६ ते ३१ मार्च या कालावधीत ७८८ रुग्ण वाढले तर १ ते १३ एप्रिल या कालावधीत तब्बल २२६८ नव्या रुग्णांची भर पडली असून महिनाभरातच रुग्णसंख्येने तीन हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली. जानेवारी, फेब्रुवारी आणि १५ मार्चपर्यंत ही संख्या कमी होती. त्यामुळे आता कोरोनाचा संसर्ग कमी होतोय, असा दिलासा नागरिकांबरोबरच आरोग्य यंत्रणेलाही वाटू लागला होता. मात्र, शिमगोत्सवात गावाला येणाऱ्या चाकरमान्यांमुळे हा धोका वाढणार आहे, याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग यांच्याकडून नागरिकांना सातत्याने देण्यात येत होत्या. मात्र, शिमगोत्सवासाठी बाहेरून येणारे आणि जिल्ह्यातीलही नागरिक यांच्याकडून दाखविण्यात आलेल्या बेफिकिरीमुळे कोरोनाचा धोका वाढला. परिणामी, रुग्णसंख्या भरमसाट वाढू लागली. १ ते १५ मार्च या कालावधीत २८७ असलेली संख्या १६ ते ३१ मार्च या कालावधीत ७८८ वर पोहोचली. १५ दिवसांत ५२१ नव्या रुग्णांची भर पडली. तर १ ते १३ एप्रिल या कालावधीत नव्या रुग्णसंख्येने दोन हजारांचाही टप्पा ओलांडला आहे. सध्या रुग्णसंख्येचा चढता आलेख पाहता येत्या दोन दिवसांत ही संख्या अडीच हजारापर्यंत जाण्याचा धोका व्यक्त होत आहे. १८ मार्च २०२० ते १२ एप्रिल २०२१ या कालावधीतील एकूण रुग्णसंख्या १२,९६० झाली असून रुग्णसंख्या अजूनही वेगाने वाढू लागली आहे.

शिमगोत्सवासाठी येणाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने लसीकरण तसेच कोरोना चाचणी करून येणे बंधनकारक केले होते. मात्र, तरीही या नियमांचे उल्लंघन करून आलेले थेट घरात पाेहोचले. त्यामुळे महिनाभरात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर झाला. शिमगोत्सवाच्या काळात कोरोनाचा चढता आलेख पाहता १६ मार्च ते १३ एप्रिल या कालावधीत तब्बल ३,०५६ नवे रुग्ण सापडले आहेत. त्याचबरोबर अजूनही तपासणीसाठी पुढे येणाऱ्यांची संख्या कमी असल्याने कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होऊ लागली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

चौकट

१८ मार्चपासून शिमगोत्सवाला सुरुवात झाली. या उत्सवासाठी आलेल्या चाकरमान्यांकडून कोरोनाचा संसर्ग अधिक वाढला. त्यामुळे १६ ते ३१ मार्च या कालावधीत ७८८ इतकी झाली. तर १ ते १३ एप्रिल या कालावधीत २०५६ वर पोहोचली. १६ मार्चपासून आतापर्यंत तब्बल ३०५६ इतके रुग्ण वाढले.

पाॅइंटर

१ ते ३१ मार्च २०२० : १०५५

१६ ते ३१ मार्च : ७८८

१ ते १३ एप्रिल : २२६८

१६ मार्च ते १३ एप्रिल : ३०५६