शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

कुडली शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळा बंद?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 17:57 IST

गुहागर तालुक्यातील कुडली येथील १२५ पट असलेल्या पूर्ण प्रथमिक जिल्हा परिषद आदर्श शाळा नं.१ मधील अपुऱ्या शिक्षकांमुळे पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. तशाप्रकारचे निवेदन गुहागर गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे.

ठळक मुद्देकुडली शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळा बंद?शिक्षक नसल्याने घेतला निर्णय: विद्यार्थी शाळेत न पाठविण्यावर पालक ठाम

गुहागर : तालुक्यातील कुडली येथील १२५ पट असलेल्या पूर्ण प्रथमिक जिल्हा परिषद आदर्श शाळा नं.१ मधील अपुऱ्या शिक्षकांमुळे पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. तशाप्रकारचे निवेदन गुहागर गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे.गुहागर तालुक्यातील कुडली गावातील शाळा नं.१ ही शाळा स्थापनेपासून उपक्रमशील शाळा म्हणून जिल्ह्यात प्रिसध्द आहे. या शाळेतून बाहेर पडलेले विद्यार्थी आज राज्यभरात विविध पदांवर कार्यरत आहेत. आदर्श शाळा पुरस्कार मिवविणार्या १ ते ७ पर्यंत असणाऱ्या या शाळेमध्ये आजच्याघडीला १२५ विद्यार्थी आहेत.

या शाळेच्या पटावर शिक्षक संख्या ६ आहे. मात्र, प्रत्यक्षात येथे चारच शिक्षक कार्यरत आहेत. १ आॅगस्ट २०११ रोजी पदवीधर शिक्षक म्हणून हजर झालेले कारेकर यांच्या अध्यापनाच्या संदर्भात वारंवार असणाऱ्या मुलांच्या, पालकांच्या व शाळा व्यवस्थापन समितीच्या तक्रारीनुसार २५ जुलै २०१६ रोजी त्यांना भातगाव कोसबी शाळेवर प्रकरणी कामगिरीवर काढण्यात आले .

२८ डिसेंबर २०१६ रोजी खेड तालुक्यातून प्रकरणी बदली होऊन मुख्याध्यापक म्हणून हजर झालेले नलावडे यांच्या चुकीच्या वर्तणुकीमुळे व अध्यापनातील त्रुटींमुळे तक्रारींवरुन त्यांनासुध्दा १९ जून २०१८ रोजी पाचेरीआगर नंबर ३ शाळेवर पुन्हा प्रकरणी कामगिरीवर पाठविण्यात आले. यामुळे पटावर जरी शिक्षक ६ दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र, चारच शिक्षक कार्यरत आहेत.या संदर्भात मागील १ वर्षभर शिक्षक मिळण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती व पालकांच्या माध्यमातून अनेक प्रयत्न केले गेले. मात्र, याबाबत तालुका शिक्षण विभागाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. या अपुऱ्या शिक्षकांमुळे शाळेतील १२५ मुलांचे भवितव्य अंधारमय होत असल्याने व्यवस्थापन समिती व पालकांनी चालू शैक्षणिक वर्षाच्या प्ररंभीच शिक्षकांची व्यवस्था न झाल्यास विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.याबाबतचे लेखी निवेदन गटशिक्षणाधिकारी व गटविकास अधिकारी पंचायत समिती, गुहागर यांना देण्यात आले असून ते आता कोणता निर्णय घेतात याकडे ग्रमस्थांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :SchoolशाळाRatnagiriरत्नागिरी