शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

नाणारबाबत स्थानिकांची भूमिका तीच आमची : सुनील तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 16:27 IST

sunil tatkare Ratnagiri- रिफायनरी प्रकल्पाबाबत स्थानिकांची जी भूमिका आहे, तीच आमची राहील. प्रकल्प यावेत, रोजगार मिळावेत, या जनतेच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. स्थानिकांच्या विरोधामुळेच राज्य सरकारला प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. परंतु, प्रकल्प व्हावा, अशी इच्छा असणारे लोक जर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा करू इच्छित असतील तर आपण त्यांची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न जरूर करू, असे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.

ठळक मुद्देनाणारबाबत स्थानिकांची भूमिका तीच आमची : सुनील तटकरेशरद पवार यांच्याशी भेट घडवून देऊ

रत्नागिरी : रिफायनरी प्रकल्पाबाबत स्थानिकांची जी भूमिका आहे, तीच आमची राहील. प्रकल्प यावेत, रोजगार मिळावेत, या जनतेच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. स्थानिकांच्या विरोधामुळेच राज्य सरकारला प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. परंतु, प्रकल्प व्हावा, अशी इच्छा असणारे लोक जर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा करू इच्छित असतील तर आपण त्यांची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न जरूर करू, असे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.जिल्हा नियोजन समिती सभेसाठी रत्नागिरीत आले असताना खासदार तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोविड काळात भारत सरकारने राज्य सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता.

निसर्ग वादळामुळे झालेल्या वित्त हानीत महाविकास आघाडी सरकारने आर्थिक मदत दिली. पायाभूत सुविधेसाठी निधी उपलब्ध करून दिला. सागरी महामार्गासाठी निधी मंजूर असून, ग्रीनफिल्ड महामार्गासाठीही प्रयत्न सुरू आहेत. रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून कामाच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा केला जाणार आहे, असे ते म्हणाले.हर्णै, श्रीवर्धन, आगरदंडा येथील बंदर विकासासाठी ६५० कोटींचा प्रस्ताव असून, लवकरच याबाबत बैठक घेण्यात येणार आहे. सागरमाला योजनेंतर्गत त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार असून, सागरी जल वाहतूक वाढीसाठी प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी अत्याधुनिक पध्दतीने जेटी बांधण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.शेतकऱ्यांचे गेले ६० दिवस शांततेत आंदोलन सुरू आहे. प्रजासत्ताक दिनाच्या प्रकाराचे समथन करत नाही, परंतु, पोलिसांनी सत्य शोधून आंदोलनाबाबत गांभीर्य बाळगावे, असेही ते एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आहे. प्रत्येक जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती वेगळी आहे, मात्र तीनही पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आपापसात समन्वय साधावा, असेही त्यांनी सूचित केले. 

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेNanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पRatnagiriरत्नागिरी