शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नाणारबाबत स्थानिकांची भूमिका तीच आमची : सुनील तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 16:27 IST

sunil tatkare Ratnagiri- रिफायनरी प्रकल्पाबाबत स्थानिकांची जी भूमिका आहे, तीच आमची राहील. प्रकल्प यावेत, रोजगार मिळावेत, या जनतेच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. स्थानिकांच्या विरोधामुळेच राज्य सरकारला प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. परंतु, प्रकल्प व्हावा, अशी इच्छा असणारे लोक जर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा करू इच्छित असतील तर आपण त्यांची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न जरूर करू, असे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.

ठळक मुद्देनाणारबाबत स्थानिकांची भूमिका तीच आमची : सुनील तटकरेशरद पवार यांच्याशी भेट घडवून देऊ

रत्नागिरी : रिफायनरी प्रकल्पाबाबत स्थानिकांची जी भूमिका आहे, तीच आमची राहील. प्रकल्प यावेत, रोजगार मिळावेत, या जनतेच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. स्थानिकांच्या विरोधामुळेच राज्य सरकारला प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. परंतु, प्रकल्प व्हावा, अशी इच्छा असणारे लोक जर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा करू इच्छित असतील तर आपण त्यांची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न जरूर करू, असे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.जिल्हा नियोजन समिती सभेसाठी रत्नागिरीत आले असताना खासदार तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोविड काळात भारत सरकारने राज्य सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता.

निसर्ग वादळामुळे झालेल्या वित्त हानीत महाविकास आघाडी सरकारने आर्थिक मदत दिली. पायाभूत सुविधेसाठी निधी उपलब्ध करून दिला. सागरी महामार्गासाठी निधी मंजूर असून, ग्रीनफिल्ड महामार्गासाठीही प्रयत्न सुरू आहेत. रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून कामाच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा केला जाणार आहे, असे ते म्हणाले.हर्णै, श्रीवर्धन, आगरदंडा येथील बंदर विकासासाठी ६५० कोटींचा प्रस्ताव असून, लवकरच याबाबत बैठक घेण्यात येणार आहे. सागरमाला योजनेंतर्गत त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार असून, सागरी जल वाहतूक वाढीसाठी प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी अत्याधुनिक पध्दतीने जेटी बांधण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.शेतकऱ्यांचे गेले ६० दिवस शांततेत आंदोलन सुरू आहे. प्रजासत्ताक दिनाच्या प्रकाराचे समथन करत नाही, परंतु, पोलिसांनी सत्य शोधून आंदोलनाबाबत गांभीर्य बाळगावे, असेही ते एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आहे. प्रत्येक जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती वेगळी आहे, मात्र तीनही पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आपापसात समन्वय साधावा, असेही त्यांनी सूचित केले. 

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेNanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पRatnagiriरत्नागिरी