शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

चक्क नाेकरदारांनीच घेतले रिक्षा परवाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:25 IST

तालुकाअध्यक्ष अभिजित गुरव यांची कारवाईची मागणी लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : शासनाने रिक्षा परवाने मुक्त केले आहेत. हे परवाने ...

तालुकाअध्यक्ष अभिजित गुरव यांची कारवाईची मागणी

लाेकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : शासनाने रिक्षा परवाने मुक्त केले आहेत. हे परवाने नियमाप्रमाणे कायद्याने बेरोजगार व्यक्तींनीच घेणे क्रमप्राप्त होते. परंतु, माहिती लपवून खोटे सत्य प्रतिज्ञापत्र सादर करून राज्य केंद्र सरकारी नोकरदारांनी रिक्षा परवाने घेतल्याची माहिती राजापूर तालुका रिक्षाचालक मालक संघटनेने दिली आहे. त्यामुळे परिवहन प्रशासनाने परवानाधारक ऑनलाईन फॉर्म माहिती पडताळणी करून सखोल चौकशी करून नोकरदार रिक्षा परवानाधारकांवर फौजदारी गुन्हे दाखल करून रिक्षा जप्त करून कारवाई करावी, अशी मागणी राजापूर तालुका रिक्षाचालक मालक संघटनेचे अध्यक्ष अभिजीत गुरव यांनी केली आहे.

आर्थिक सुबत्ता चांगली असतानाही रेल्वे, बँक, एसटी महामंडळ , इतर महामंडळे, नगरपालिका, मल्टिनॅशनल कंपनी व इतर खासगी कंपनीमध्ये कामाला असताना अनेक नोकरदारांनी मोठ्या संख्येने रिक्षा परवाने व रिक्षा घेतल्या व भाड्याने विनालायसन्स बॅच अप्‌प्रवृत्ती चालकांना चालवायला दिल्या जात आहेत. त्यामुळे गरज नसताना रिक्षांची संख्या वाढली आहे. त्यातून गुन्हेगारी वाढली, तक्रारी वाढल्या आहेत. अप्‌प्रवृत्तीमुळे प्रामाणिक रिक्षावाला व रिक्षा व्यवसाय बदनाम झाल्याचे संघटनेने म्हटले आहे.

शासन घोषित परवानाधारक रिक्षाचालकांना १५०० रुपये अनुदान प्राप्ती आहे. ऑनलाईन अर्ज भरताना खोटी माहिती देऊन रिक्षा परमिट काढलेल्या नोकरदारांचे पितळ उघडे पडेल म्हणून अनेक नोकरदार परमिटधारक अर्थसाहाय्य अर्ज भरत नाहीत. शासकीय नोकरदारांची प्रायव्हेट फंड व माहिती ऑनलाईन असल्यामुळे जाहीर होईल. परिवहन प्रशासन आरटीओने परवानाधारक ऑनलाईन अर्ज माहिती पडताळणी करून सखोल चौकशी करून नोकरदार रिक्षापरवानाधारक यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून रिक्षा जप्त करून कारवाई करावी. व सदर रिक्षा व परमीट लायसन्स बॅच असलेल्या गरजू बेरोजगारास द्यावी जेणेकरून बजबजपुरी व अप्‌प्रवृत्तीला आळा बसेल, अशी मागणी करण्यात आली आहे.

याबाबत योग्य ती कारवाई न झाल्यास राजापूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राजापूर तालुका रिक्षाचालक मालक संघटनेचे अध्यक्ष अभिजीत गुरव व सचिव संतोष सातोसे यांनी दिला आहे.