शहरं
Join us  
Trending Stories
1
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
2
CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट
3
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
4
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
5
Latest Marathi News LIVE Updates: "धारावीकरांना हुसकावून लावण्यासाठी ९५ टक्क्यांपेक्षा जास्त...", काँग्रेस खासदारांचा गंभीर आरोप
6
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
7
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
8
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
9
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
10
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
11
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
12
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
13
Vastu Shastra: घरात सुख-समृद्धी हवी आहे? मग एकदा भिंतीवरची चित्र बदलून पाहाच!
14
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
15
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
16
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
17
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
18
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
20
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
Daily Top 2Weekly Top 5

कोयना धरणात अवशेष सापडले

By admin | Updated: July 12, 2014 00:33 IST

भाग्यरेषेवर संकट : १९६२ नंतर प्रथमच इतकी भयावह अवस्थो

सुभाष कदम : चिपळूण , महाराष्ट्राची भाग्यरेषा अशी ओळख असणाऱ्या कोयना धरणामध्ये सध्या १२.७१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे धरण बांधणीच्या काळात पाण्याखाली गेलेल्या गावातील घरांचे, मंदिरांचे अवशेष तसेच पाषाणाच्या मूर्तींचे आता दर्शन होऊ लागले आहे. यावर्षी पावसाने गुंगारा दिल्यामुळे जुलै महिन्याचा दुसरा आठवडा संपायला आला तरी पुरेसा पाऊस पडत नाही. नद्या, नाले कोरडे पडले आहेत. अशातच कोयना धरणाची पातळी कमालीची घटली आहे. पुरेसा पाऊस झाला तर कोयना धरणाच्या जलाशयात १०५ टीएमसी पाणी साठवण्याची क्षमता आहे. हे धरण पुरेसे भरले तर वीजनिर्मिती व पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होते. परंतु, यावर्षी पाऊस लांबल्याने धरणात केवळ १२.७१ टीएमसी पाणी शिल्लक आहे. त्यातच पायथ्याजवळ जलविद्युत प्रकल्पासाठी ३.३० टीएमसी पाणी राखीव करण्यात आले आहे. पावसाच्या अनिश्चिततेमुळे यावर्षी दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. पाण्यावर चालणारा कोयना हा राज्यातील एकमेव वीज प्रकल्प आहे. पाऊस पडला नाही तर राज्यात विजेचाही तुटवडा जाणवणार आहे. पावसामुळे समाधानकारक पीकही न आल्याने लोकांना जगणे अशक्य होणार आहे. सध्या हा टप्पा १ जूनपासून बंद करण्यात आला आहे. धरणात पाणी नसल्याने धरण बांधणीच्या काळात अस्तित्त्वात असलेल्या गावातील घरे, मंदिरे, मोठमोठे दगड यांचे अवशेष दिसत आहेत. तेथील लोकांचे श्रध्दास्थान असलेली पाषाणाच्या मूर्ती, शंकराची पिंडी, नंदी व चौथरे स्पष्टपणे दिसत आहेत. भाविक याचे दर्शन घेत आहेत. पाऊस नियमित पडला नाही तर आणखी अडचण होण्याची शक्यता आहे. पाऊस सुरू झाल्यामुळे दिलासा मिळाला असला तरी तो किती दिवस राहील, याबाबत त्या भागातील नागरिक शंका व्यक्त करीत आहेत.....महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरण परिसरात यंदा पाणीटंचाईने इतकी तीव्रता धारण केली की, धरण निर्मितीच्या काळात बुडालेली गावे, तेथील जुन्या अवशेषांसह मंदिरातील मूर्ती, घरांची कामे करताना वापरलेले साहित्य, घराची रचना या कोरड्या पात्रात स्पष्ट दिसत होती. या सर्व गोष्टींद्वारे गावकऱ्यांनी दुष्काळाचे चित्र समोर उभे केले असतानाच वरूणराजा बरसल्याने पाणीटंचाईचे संकट किमान टळल्यासारखे दिसले. यानिमित्ताने १९६२च्या धरणग्रस्तांच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. पुरातन मंदिरातील मूर्ती आणि शिवपिंडीचे दर्शन झाले. त्या पिंडीचे दर्शन घेऊन या भागातील गावकऱ्यांनी पावसासाठी प्रार्थना केली.