शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

तिवरे धरण फुटीतील आणखी ११ कुटुंबांचे पुनर्वसन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:36 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : तिवरे धरण फुटीतील बाधित कुटुंबांच्या पुनर्वसनाच्या कामाला वेग आला असून, आतापर्यंत २४ कुटुंबांचे पुनर्वसन ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : तिवरे धरण फुटीतील बाधित कुटुंबांच्या पुनर्वसनाच्या कामाला वेग आला असून, आतापर्यंत २४ कुटुंबांचे पुनर्वसन अलोरे येथे करण्यात आले आहे. उर्वरित १३ कुटुंबांचे तिवरे गावातच पुनर्वसन हाेणार आहे, तर अन्य १४ कुटुंबांचे अलाेरे येथे पुनर्वसन केले जाणार आहे. आता तिवरेसह रिक्टोली, ओवळी, नांदिवसे, पेढांबे, पेढे, कोळकेवाडी येथील दरडग्रस्त भागातून पुनर्वसनाची मागणी जाेर धरू लागली आहे. या कुटुंबांना एकाच गृहप्रकल्पात सामावून घेण्यासाठी जागेचा शोध सुरू करण्यात आला आहे.

तालुक्यातील तिवरे येथील धरण फुटीच्या घटनेत बाधित झालेल्या कुटुंबांसाठी पेढांबे येथे पुनर्वसनअंतर्गत घरे उभारण्यात आली आहेत. अलोरे येथील पाटबंधारे विभागाच्या जागेत पहिल्या टप्प्यात २४ घरे उभारली असून याआधी १३, तर आता ११ कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण करण्यात आले. अजून १४ कुटुंबांचे अलोरे येथे पुनर्वसन केले जाणार आहे. उर्वरित १३ कुटुंबांचे गावातच पुनर्वसन होणार आहे.

शहरातील गोवळकोट-कदमवाडी येथील १५ कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायम आहे. त्याच जोडीला आता दरडग्रस्त भागातील कुटुंबांकडून पुनर्वसनाची मागणी होऊ लागली आहे. त्यासाठी त्या-त्या भागात भूगर्भतज्ज्ञांतर्फे तपासणी करून त्याचा अहवाल मागवण्यात आला आहे. त्यानंतरच पुनर्वसनाचा निर्णय घेतला जाणार आहे.

-------------------------

एकाच ठिकाणी पुनर्वसन

पुनर्वसनाबाबत नुकत्याच झालेल्या बैठकीत आमदार भास्कर जाधव यांनी सर्वांचे वेगवेगळ्या ठिकाणी पुनर्वसन करण्यापेक्षा एकाच ठिकाणी मोठा गृहसंकुल प्रकल्प उभारण्यात यावा, अशी सूचना केली. त्यासाठी कमी जागा लागेल. शिवाय पुनर्वसनावरील खर्चही कमी होईल. त्यानुसार तातडीने शासकीय जागेचा शोध घेऊन तसा प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

-------------------------

सहा वर्षे शाळेत वास्तव्य

शहरातील गोवळकोट कदम बौद्धवाडी येथील पंधरा कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायम आहे. या कुटुंबाचे तात्पुरते पुनर्वसन गोवळकोट जिल्हा परिषद शाळेत केले आहे. सहा वर्षे ते याचठिकाणी वास्तव्याला असून पुनर्वसनाचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी केली जात आहे.

---------------------------

सध्या दरडग्रस्त कुटुंबांच्या संख्येत वाढ हाेत आहे. त्यामुळे आता प्रत्येक ठिकाणाहून पुनर्वसनाची मागणी होऊ लागली आहे. मात्र, जोपर्यंत भूगर्भतज्ज्ञांचा अहवाल येत नाही, तोपर्यंत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. या अहवालानंतरच पुनर्वसन प्रकल्पाविषयी निर्णय होणार आहे.

- तानाजी शेजाळ, नायब तहसीलदार, चिपळूण.

----------------------

अलोरे येथे कुटुंबांचे पुनर्वसन योग्य पद्धतीने झाले असून, ते एक मॉडेल स्वरूपात आहे. शासकीय यंत्रणेने योग्य पद्धतीने सोडत राबवून प्रत्येकाला योग्य तो न्याय दिला आहे. याच धर्तीवर तालुक्यात पुनर्वसन प्रकल्प उभारावेत.

- तानाजी चव्हाण, लाभार्थी, चिपळूण.