शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

तिवरे धरण फुटीतील आणखी ११ कुटुंबांचे पुनर्वसन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:36 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : तिवरे धरण फुटीतील बाधित कुटुंबांच्या पुनर्वसनाच्या कामाला वेग आला असून, आतापर्यंत २४ कुटुंबांचे पुनर्वसन ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : तिवरे धरण फुटीतील बाधित कुटुंबांच्या पुनर्वसनाच्या कामाला वेग आला असून, आतापर्यंत २४ कुटुंबांचे पुनर्वसन अलोरे येथे करण्यात आले आहे. उर्वरित १३ कुटुंबांचे तिवरे गावातच पुनर्वसन हाेणार आहे, तर अन्य १४ कुटुंबांचे अलाेरे येथे पुनर्वसन केले जाणार आहे. आता तिवरेसह रिक्टोली, ओवळी, नांदिवसे, पेढांबे, पेढे, कोळकेवाडी येथील दरडग्रस्त भागातून पुनर्वसनाची मागणी जाेर धरू लागली आहे. या कुटुंबांना एकाच गृहप्रकल्पात सामावून घेण्यासाठी जागेचा शोध सुरू करण्यात आला आहे.

तालुक्यातील तिवरे येथील धरण फुटीच्या घटनेत बाधित झालेल्या कुटुंबांसाठी पेढांबे येथे पुनर्वसनअंतर्गत घरे उभारण्यात आली आहेत. अलोरे येथील पाटबंधारे विभागाच्या जागेत पहिल्या टप्प्यात २४ घरे उभारली असून याआधी १३, तर आता ११ कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण करण्यात आले. अजून १४ कुटुंबांचे अलोरे येथे पुनर्वसन केले जाणार आहे. उर्वरित १३ कुटुंबांचे गावातच पुनर्वसन होणार आहे.

शहरातील गोवळकोट-कदमवाडी येथील १५ कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायम आहे. त्याच जोडीला आता दरडग्रस्त भागातील कुटुंबांकडून पुनर्वसनाची मागणी होऊ लागली आहे. त्यासाठी त्या-त्या भागात भूगर्भतज्ज्ञांतर्फे तपासणी करून त्याचा अहवाल मागवण्यात आला आहे. त्यानंतरच पुनर्वसनाचा निर्णय घेतला जाणार आहे.

-------------------------

एकाच ठिकाणी पुनर्वसन

पुनर्वसनाबाबत नुकत्याच झालेल्या बैठकीत आमदार भास्कर जाधव यांनी सर्वांचे वेगवेगळ्या ठिकाणी पुनर्वसन करण्यापेक्षा एकाच ठिकाणी मोठा गृहसंकुल प्रकल्प उभारण्यात यावा, अशी सूचना केली. त्यासाठी कमी जागा लागेल. शिवाय पुनर्वसनावरील खर्चही कमी होईल. त्यानुसार तातडीने शासकीय जागेचा शोध घेऊन तसा प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

-------------------------

सहा वर्षे शाळेत वास्तव्य

शहरातील गोवळकोट कदम बौद्धवाडी येथील पंधरा कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायम आहे. या कुटुंबाचे तात्पुरते पुनर्वसन गोवळकोट जिल्हा परिषद शाळेत केले आहे. सहा वर्षे ते याचठिकाणी वास्तव्याला असून पुनर्वसनाचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी केली जात आहे.

---------------------------

सध्या दरडग्रस्त कुटुंबांच्या संख्येत वाढ हाेत आहे. त्यामुळे आता प्रत्येक ठिकाणाहून पुनर्वसनाची मागणी होऊ लागली आहे. मात्र, जोपर्यंत भूगर्भतज्ज्ञांचा अहवाल येत नाही, तोपर्यंत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. या अहवालानंतरच पुनर्वसन प्रकल्पाविषयी निर्णय होणार आहे.

- तानाजी शेजाळ, नायब तहसीलदार, चिपळूण.

----------------------

अलोरे येथे कुटुंबांचे पुनर्वसन योग्य पद्धतीने झाले असून, ते एक मॉडेल स्वरूपात आहे. शासकीय यंत्रणेने योग्य पद्धतीने सोडत राबवून प्रत्येकाला योग्य तो न्याय दिला आहे. याच धर्तीवर तालुक्यात पुनर्वसन प्रकल्प उभारावेत.

- तानाजी चव्हाण, लाभार्थी, चिपळूण.