शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

रत्नागिरी : भात विक्रीला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद, आॅनलाईन पेमेंटची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 5:04 PM

महाराष्ट्र स्टेट को - आॅप. मार्केटिंग फेडरेशनतर्फे जिल्ह्यातील १४ केंद्रांना भात खरेदीसाठी यावर्षी २२ हजार क्विंटलचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, शेतकऱ्यांकडून अल्प प्रतिसादामुळे केवळ ७ हजार ९०.०५ क्विंटल खरेदी झाली आहे. यावर्षी आॅनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, तरीही शेतकऱ्यांमध्ये भात विक्रीसाठी अनास्था दिसून येत आहे.

ठळक मुद्देभात विक्रीला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसादआॅनलाईन पेमेंटची सुविधा- आतापर्यंत केवळ ७ हजार क्विंटल भात खरेदी

मेहरून नाकाडेरत्नागिरी : महाराष्ट्र स्टेट को - आॅप. मार्केटिंग फेडरेशनतर्फे जिल्ह्यातील १४ केंद्रांना भात खरेदीसाठी यावर्षी २२ हजार क्विंटलचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, शेतकऱ्यांकडून अल्प प्रतिसादामुळे केवळ ७ हजार ९०.०५ क्विंटल खरेदी झाली आहे. यावर्षी आॅनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, तरीही शेतकऱ्यांमध्ये भात विक्रीसाठी अनास्था दिसून येत आहे.दि महाराष्ट्र स्टेट को - आॅप. मार्केटिंग फेडरेशनतर्फे दरवर्षी भात खरेदी करण्यात येते. यावर्षीसाठी फेडरेशनला २२००० क्विंटल भात खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना १५५० रूपये प्रतिक्विंटल दर निश्चित करण्यात आला आहे.

सन २०१०पासून २०१४ पर्यंत केंद्रांचे गोदामभाडे थकल्यामुळे जिल्ह्यातील १६पैकी पाच केंद्रांवर गतवर्षी भात खरेदी झाली नव्हती. १६पैकी ११ केंद्रांवर ७७७ शेतकऱ्यांकडून एकूण ८ हजार ५५६ क्विंटल भात खरेदी करण्यात आले होते.

गतवर्षी शेतकऱ्यांना क्विंटलला १४७० रूपये दर देण्यात आला होता, शिवाय २०० रूपये बोनस देण्यात आला होता. मात्र, यावर्षी बोनस देण्यात आलेला नाही. आतापर्यंत ७३८ शेतकऱ्यांकडून ७ हजार ९०.०५ क्विंटल भात खरेदी करण्यात आले आहे.खेड तालुका खरेदी - विक्री संघाच्या केंद्रांवर १२९ शेतकऱ्यांनी १ हजार ९६३.२० क्विंटल, गुहागर तालुका खरेदी - विक्री संघाच्या केंद्रावर १११ शेतकऱ्यांनी ६७४ क्विंटल, लांजा तालुका खरेदी - विक्री संघ येथे ६ शेतकऱ्यांकडून २५.६०, रत्नागिरी जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा संघ केंद्रांवर ९९ शेतकऱ्यांकडून ८५८.८० क्विंटल, चिपळूण तालुका सहकारी खरेदी विक्री संघ चिपळूण येथे ७० शेतकऱ्यांकडून ८७०.८० क्विंटल, चिपळूण तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, मिरवणे/मार्गताम्हाणे केंद्रावर ३९ शेतकऱ्यांकडून ३०१.६० क्विंटल, आकले केंद्रावर ३७ शेतकऱ्यांकडून २७८ क्विंटल, शिरळ केंद्रावर १७ शेतकऱ्यांकडून १२२ क्विंटल, शिरगाव विविध कार्य सेवा सोसायटी लि. केंद्रावर १११ शेतकऱ्यांकडून १ हजार ६७.२० क्विंटल भात विक्री झाली आहे.

केळशी परिसर आंबा उत्पादक संघाच्या केंद्रावर ६६ शेतकऱ्यांनी ४६३.२० क्विंटल, राजापूर तालुका खरेदी विक्री संघाच्या केंद्रावर ३ शेतकऱ्यांनी ४३.६५ क्विंटल भात विक्री केली आहे.रास्तदर धान्य दुकानांवर होणार विक्रीमार्चअखेर भातखरेदी करण्यात येणार आहे. खरेदी केलेल्या भाताच्या भरडाईसाठी ई - लिलाव केला जातो. भाताचा टप्प्याटप्प्याने लिलाव केला जात असल्याने २ हजार ७२८ क्विंटल भाताची भरडाई केली असून, १ हजार ५० क्विंटल तांदूळ प्राप्त झाला आहे. रास्तदर धान्य दुकानातून या तांदळाची विक्री केली जाणार आहे.८७ लाख ६४ हजार ६९२ रूपये वितरितभातविक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना आॅनलाईन पेमेंट मिळणार आहे. मात्र, त्यासाठी शेतकऱ्यांनी विक्री करणाऱ्या केंद्रावर सातबारा, शेतकऱ्याचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक शिवाय बँक खाते क्रमांक, आयएफसी कोड आदी माहिती सादर करण्याची सूचना करण्यात आली होती. भात विकणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँकेतील खात्यावर पैसे आॅनलाईन जमा होणार आहेत. शेतकऱ्यांनी केंद्रावर नोंदणी करावी, असे आवाहन करूनही फारसा प्रतिसाद लाभलेला नाही.कमी भात विक्रीगतवर्षी ७७७ शेतकऱ्यांकडून ८ हजार ५५६ क्विंटल भातविक्री करण्यात आली होती. यावर्षीही गतवर्षीचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. यावर्षी २२००० क्विंटल भात खरेदीचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत केवळ ७३८ शेतकºयांकडून ७०९०.०५ क्विंटल इतकेच भात विक्री करण्यात आले आहे.लिलाव प्रक्रिया रखडल्याने विरोध दर्शविला होताभात विक्रीसाठी शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभतो. मात्र, यावर्षी अत्यल्प प्रतिसाद लाभला आहे. २००९-१०मध्ये १५ हजार २४०.७३ क्विंटल, २०१०-११मध्ये १५ हजार २६०.२२ क्विंटल, २०११-१२मध्ये १८ हजार ७३१.७८ क्विंटल, २०१२-१३मध्ये २१ हजार ४८० क्विंटल, २०१३-१४मध्ये २४ हजार ४९८.४६ क्विंटल भात खरेदी करण्यात आली आहे.

२०१४-१५ व २०१५-१६ या दोन वर्षी भात खरेदी झालीच नाही. शासनाकडून लिलाव प्रक्रिया रखडल्यामुळे गोदाम मालकांनीच भात खरेदीसाठी नकार दर्शविला होता. परंतु गतवर्षी शासनाच्या परवानगीने भात खरेदी करण्यात आली. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFarmerशेतकरी