शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
4
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
5
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
6
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
7
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
8
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
9
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
10
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
11
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
12
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
13
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
14
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
15
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
16
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
17
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
18
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
19
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
20
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीचा निकाल ९४ टक्के

By admin | Updated: June 3, 2014 01:59 IST

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा : सावित्रीच्या लेकी मुलांपेक्षा यंदाही सरस

रत्नागिरी : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी/मार्च २०१४ चा आॅनलाईन निकाल आज जाहीर झाला असून रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल ९४.२४ टक्के लागला आहे. प्रतिवर्षाप्रमाणे मुलींची टक्केवारी यंदाही मुलांच्या तुलनेत जास्त आहे. यावर्षी जुन्या अभ्यासक्रमानुसार झालेल्या परीक्षेचा निकाल मात्र अतिशय कमी म्हणजे ३३.६६ टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमासाठी जिल्ह्यात एकूण २०३७६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १९२०३ विद्यार्थी (९४.२४ टक्के) उत्तीर्ण झाले. यात मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.३५ तर मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.४१ आहे. या परीक्षेसाठी १०,८७३ विद्यार्थी बसले. त्यापैकी १०.०४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर ९५०३ मुलींपैकी ९१६२ (९६.४१ टक्के) मुली उत्तीर्ण झाल्या. रत्नागिरी जिल्ह्यात एम. सी. व्ही. सी. शाखेचा निकाल सर्वाधिक ९७.१३ टक्के लागला असून ७३१ पैकी ७१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याखालोखाल ‘वाणिज्य’चा निकाल ९६.६५ टक्के लागला असून ७६३९ विद्यार्थ्यांपैकी ७३८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ‘विज्ञान’चा निकाल ९३.१६ लागला असून ५१५७ विद्यार्थ्यांपैकी ४८३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर कला शाखेचा निकाल ९२.०७ टक्के लागला. या शाखेतून प्रविष्ठ झालेल्या ६८१९ विद्यार्थ्यांपैकी ६२७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जुन्या अभ्यासक्रमानुसार, जिल्ह्यात एकूण ९२१ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले. त्यापैकी ३१० विद्यार्थी (३३.६६ टक्के) उत्तीर्ण झाले. एकूण ६५३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १९८ (३०.३२ टक्के) उत्तीर्ण झाले, तर एकूण २६८ विद्यार्थिनींपैकी ११२ मुली (४१.७९ टक्के) उत्तीर्ण झाल्या. एम. सी. व्ही. सी. शाखेचा निकाल सर्वाधिक ६२.५० टक्के लागला असून परीक्षेला बसलेल्या ८ पैकी ५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ‘विज्ञान’चा निकाल ३५.३८ टक्के लागला असून परीक्षेला बसलेल्या १९५ विद्यार्थ्यांपैकी ६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ‘कला’चा निकाल ३६.६४ टक्के लागला असून, ३६३ विद्यार्थ्यांपैकी १३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेचा निकाल २९.०१ टक्के लागला. या शाखेतून प्रविष्ठ झालेल्या ३५५ विद्यार्थ्यांपैकी १०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यावर्षी जुन्या अभ्यासक्रमासाठी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आहे. विद्यार्थ्यांची गुणपत्रिका व तपशीलवार गुण दर्शविणार्‍या निकालपत्राचे वाटप दुपारी ३ वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप कनिष्ठ महाविद्यालयातर्फे करण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)