शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

रत्नागिरी : प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकांची सुरक्षा रामभरोसे, शिक्षकच नेतात दुचाकीवरून गठ्ठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 1:02 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने सध्या राज्यात दहावी व बारावीच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. या परीक्षेत मोठ्या प्रमाणात गोपनीयता पाळण्याचा प्रयत्न राज्य मंडळाकडून केला जात आहे. परंतु प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकेच्या वाहतूक व्यवस्थेबाबत मोठ्या प्रमाणात असुरक्षितता आहे.

ठळक मुद्देप्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकांची सुरक्षा रामभरोसेपोलीस संरक्षण नाहीच शिक्षकच घेऊन जातात दुचाकीवरून गठ्ठे

सागर पाटीलटेंभ्ये : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने सध्या राज्यात दहावी व बारावीच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. या परीक्षेत मोठ्या प्रमाणात गोपनीयता पाळण्याचा प्रयत्न राज्य मंडळाकडून केला जात आहे. परंतु प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकेच्या वाहतूक व्यवस्थेबाबत मोठ्या प्रमाणात असुरक्षितता आहे.

सहाय्यक परीरक्षक म्हणून काम करणारे शिक्षक अक्षरश: जीव धोक्यात घालून ही वाहतूक करतात. पोलीस यंत्रणेकडून या प्रक्रियेवर आक्षेप घेतला जात आहे. परंतु, शासनस्तरावरुन कोणताही निर्णय घेतला जात नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून हेच चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकेची वाहतूक सुरक्षा राम भरोसेच असल्याचे दिसत आहे.राज्यातील विभागीय शिक्षण मंडळांतर्गत कार्यान्वित असणाऱ्या परीरक्षक कार्यालयााला प्रश्नपत्रिकेचे वितरण व उत्तरपत्रिकेचे संकलन परिस्थितीचे गांभीर्य पटते. परंतु शासन स्तरावरुन कोणताही निर्णय घेतला जात नसल्याने त्यांच्यासमोर प्रश्न निर्माण झाला आहे. ही समस्या शासन स्तरावरुन सोडवणे आवश्यक असल्याने शासन निर्णयाची वाट पाहण्याचे काम मंडळ स्तरावरुन केले जात आहे.प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकेच्या वाहतुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मंडळ स्तरावरुन एका मार्गावरील केंद्रासाठी प्रत्येकी एक सुरक्षित वाहन उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. मंडळ नियमावलीनुसार ही वाहतूक एस. टी. बसमधून होणे आवश्यक आहे. परंतु वेळ व एस. टी.ची वाहतूक व्यवस्था पाहता सर्वच केंद्रांना ही बाब लागू पडत नाही.

या वाहतूक व्यवस्थेबाबत कोकण विभागीय मंडळांतर्गत काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. परंतु, याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य मंडळ व शासनाला असल्याचे विभागीय मंडळातून सांगण्यात येते. परीक्षेदरम्यान गोपनीयतेला प्राधान्य देणाऱ्या राज्य मंडळाने या वाहतूक व्यवस्थेकडे लक्ष देणे आवश्यक आहे.मोटारसायकलवरून वाहतूकरत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या माध्यमातून राज्य मंडळाकडून प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकेच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र गाडी उपलब्ध करुन देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सहाय्यक परीरक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांच्या सुरक्षिततेचा विचार करता मोटरसायकलवरुन पेपरची वाहतूक करणे पूर्णत: चुकीचे असल्याचे मत रत्नागिरी जिल्हाध्यक्ष भारत घुले यांनी व्यक्त केले.

याबाबत अध्यापक संघाच्यावतीने राज्य मंडळ अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांच्याशी चर्चा करण्यात आली असून, याबाबत शक्य तितक्या लवकर निर्णय घेतला जाईल, असे डॉ. काळे यांनी सांगितल्याचे घुले म्हणाले. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीexamपरीक्षाTeacherशिक्षक